शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे माजलगावात घाणीचे साम्राज्य, शहरात साथरोगांचे थैमान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 18:46 IST

केवळ एकाच वर्षातील नगर पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त  झाले आहेत. 

ठळक मुद्देशहरात गल्ल्या बोळांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केवळ नियोजना अभावी शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे. 

माजलगांव ( बीड ) : शहरात गल्ल्या बोळांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. केवळ एकाच वर्षातील नगर पालिकेच्या  या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त  झाले आहेत. 

माजलगांव नगर पालिकेचा कारभार कोणत्याही पक्षाकडे असो शहराची स्थितीत मात्र काहीच बदल दिसत नाही. सहाल चाऊस हे अध्यक्षपदी निवडल्यानंतर कांहीतरी बदल होईल अशा अपेक्षेने माजलगांवकरांना होत्या. मात्र, चाऊस यांच्या सत्तेचे नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर शहराची परिस्थिती पहिल्या सारखीच बकाल झाली आहे. 

नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्यात विसंवाद चाउस यानी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांचे आणि मुख्याधिकारी यांचे न पटल्याने शहराचा विकास खंडीत झाला. साध्या मुलभुत गरजा पुरविण्यात देखील पालिकेला अपयश आले. दोन महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी बी.सी. गावित यांची बदली झाल्यानंतर वडवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे येथील प्रभार आला आहे. मात्र, ते केवळ केवळ कार्यालयीन कामकाजावरच भर देत आहेत.

शहरभर घाणीचे साम्राज्य मुख्य रस्त्यासह गल्लीबोळांमध्ये जागोजागी कच-यांचे ढिगारे साचलेले आहेत. नाल्या तुंबलेल्या असुन घाण पाणी रस्त्यांवरुन वाहात आहे. साचलेले कच-याचे ढिगारे उचलणे, नाले सफाई व पाईपलाईन लिकेज काढण्यात नगर पालिका असमर्थ ठरत आहे. यामुळे डासांचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून शहरात साथीचे रोग वाढले आहेत. याबाबत येथील मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. 

सफाई कर्मचा-यांवर होतो लाखोंचा खर्च नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती डामाडौल असतांना कायम व रोजंदारी कर्मचा-यांवर नगर परिषद दर महिन्याला लाखोरुपयांचा खर्च करते. सध्या पालिकेत 65 कायमस्वरुपी व रांजंदारीवरील 35 असे कर्मचारी सफाई व स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. असे असतानाही केवळ प्रशासकीय नियोजना अभावी शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे.