शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

पांढऱ्या सोन्याला यंदा दुष्काळाचा गंज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:22 IST

तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील परिस्थिती : २५ गावांत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; कापसाच्या उत्पादनात घट

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील २५ गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे.गेवराई तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील पेरणीलायक १ लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील गेवराई, रेवकी, तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाचेगाव, मादळमोही, चकलांबा, उमापूर, धोंडराई या दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी कापूस ७४ हजार हेक्टर, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका सह आदी खरीपातील पेरण्या जवळपास ९८ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आल्या होत्या. सुरुवातीलाच पाऊस कमी प्रमाणात पडल्याने तालुक्यातील सर्व पिके ही सलाईनवर होती. कोणत्याही पिकाची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक पिकेच वाया गेली असून, अत्यल्प प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान, शेतकºयांनी उधार उसनवारी करून केलेला खर्च निघणे सुद्धा कठीण झाले आहे.गेवराई तालुका कापसाच्या उत्पादनासाठी मराठवाड्यात एक क्रमांकाचा तालुका मानला जातो. तालुक्यातील विविध भागात जवळपास २५ जिनिंग उभ्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, मागील वर्षी कापसाच्या उत्पादनात ५० टक्के जवळपास घट झाली होती. यावेळी जवळपास ८० टक्के कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.गेवराई तालुक्यातील विविध भागात दमदार पाऊसच झाला नसल्यामुळे तालुक्यातील गोविंदवाडी, मादळमोही, जव्हारवाडी, शिंदेवाडी, खडकी, चकलांबा, बंगाली पिंपळा येथील लघुप्रकल्पातील पाणीसाठा शून्य झाला आहे. परतीच्या पावसाने जर मेहरबानी केली तर हे लघुप्रकल्प भरू शकतील.गेवराई तालुक्यातील दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे तालुक्यात नदी, नाले, भरले नाहीत. त्यामुळे सध्या विहिरी आणि बोअरने तळ गाठला असल्याने तालुक्यातील जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाळ्यातच उन्हाळा : पिके करपू लागलीगेवराई तालुक्यातील हलक्या व भारी जमिनीतील कापसाच्या पिकानी माना टाकल्या असून पावसाची नितांत आवश्यकता आहे. गोदावरीच्या व उजव्या कालव्याच्या धोंडराई, तळणेवाडी, राक्षसभुवन, सुरळेगाव, सावळेश्वर, माळस पिंपळगाव, कोल्हेर, लुखामसला, भोजगाव व इतर ठिकाणी उसाचे जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, अनेक दिवसांपासून पाउसच नसल्यामुळे ऊस करपायाला लागले आहेत.तालुक्यातील शेतकºयांनी परतीचा पाऊस पडल्यावर ज्वारीचे पिके घ्यावीत. कारण यामुळे ज्वारी तर मिळेल; पण जनावरांना चारा देखील उपलब्ध होईल. तसेच तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यात शेतकºयांच्या क्षेत्रीय भेटी सुरु असल्याचे कृषी मंडळ अधिकारी संतोष घसिंग म्हणालेतालुक्यात एकूण पर्जन्यमान ६७५ पैकी फक्त २७५ मि. मी. झाल्याची नोंद आहे. तालुक्यात भर पावसाळ्यात उन्हाळाच असल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र