शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पांढऱ्या सोन्याला यंदा दुष्काळाचा गंज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:22 IST

तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील परिस्थिती : २५ गावांत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; कापसाच्या उत्पादनात घट

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील २५ गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे.गेवराई तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील पेरणीलायक १ लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील गेवराई, रेवकी, तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाचेगाव, मादळमोही, चकलांबा, उमापूर, धोंडराई या दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी कापूस ७४ हजार हेक्टर, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका सह आदी खरीपातील पेरण्या जवळपास ९८ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आल्या होत्या. सुरुवातीलाच पाऊस कमी प्रमाणात पडल्याने तालुक्यातील सर्व पिके ही सलाईनवर होती. कोणत्याही पिकाची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक पिकेच वाया गेली असून, अत्यल्प प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान, शेतकºयांनी उधार उसनवारी करून केलेला खर्च निघणे सुद्धा कठीण झाले आहे.गेवराई तालुका कापसाच्या उत्पादनासाठी मराठवाड्यात एक क्रमांकाचा तालुका मानला जातो. तालुक्यातील विविध भागात जवळपास २५ जिनिंग उभ्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, मागील वर्षी कापसाच्या उत्पादनात ५० टक्के जवळपास घट झाली होती. यावेळी जवळपास ८० टक्के कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.गेवराई तालुक्यातील विविध भागात दमदार पाऊसच झाला नसल्यामुळे तालुक्यातील गोविंदवाडी, मादळमोही, जव्हारवाडी, शिंदेवाडी, खडकी, चकलांबा, बंगाली पिंपळा येथील लघुप्रकल्पातील पाणीसाठा शून्य झाला आहे. परतीच्या पावसाने जर मेहरबानी केली तर हे लघुप्रकल्प भरू शकतील.गेवराई तालुक्यातील दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे तालुक्यात नदी, नाले, भरले नाहीत. त्यामुळे सध्या विहिरी आणि बोअरने तळ गाठला असल्याने तालुक्यातील जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाळ्यातच उन्हाळा : पिके करपू लागलीगेवराई तालुक्यातील हलक्या व भारी जमिनीतील कापसाच्या पिकानी माना टाकल्या असून पावसाची नितांत आवश्यकता आहे. गोदावरीच्या व उजव्या कालव्याच्या धोंडराई, तळणेवाडी, राक्षसभुवन, सुरळेगाव, सावळेश्वर, माळस पिंपळगाव, कोल्हेर, लुखामसला, भोजगाव व इतर ठिकाणी उसाचे जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, अनेक दिवसांपासून पाउसच नसल्यामुळे ऊस करपायाला लागले आहेत.तालुक्यातील शेतकºयांनी परतीचा पाऊस पडल्यावर ज्वारीचे पिके घ्यावीत. कारण यामुळे ज्वारी तर मिळेल; पण जनावरांना चारा देखील उपलब्ध होईल. तसेच तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यात शेतकºयांच्या क्षेत्रीय भेटी सुरु असल्याचे कृषी मंडळ अधिकारी संतोष घसिंग म्हणालेतालुक्यात एकूण पर्जन्यमान ६७५ पैकी फक्त २७५ मि. मी. झाल्याची नोंद आहे. तालुक्यात भर पावसाळ्यात उन्हाळाच असल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र