शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

थकबाकीमुळे ११ गावांचा पाणीपुरवठा तोडला; भर उन्हात ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:30 IST

माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे.

माजलगाव (बीड ) : माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे. पाणी पुरवठ्याची थकबाकी या गावांकडे आहे. याच्या वसुलीसाठी पालिकेने आज या गावांचा  पाणी पुरवठा खंडित केला. यामुळे येथील ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

माजलगाव धरणाच्या निर्मितीसाठी तालुक्यातील २२ गावांतील ग्रामस्थांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांच्या त्यागामुळे माजलगाव धरण उभारले. यामुळे आज तीन जिल्ह्यातील ८५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. तसेच यामुळे बीड, माजलगाव शहरासह ११ पुनर्वसित गावच्या नागरिकांची तहान भागते. 

माजलगाव शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या ११ पुनर्वसित गावांसाठी वीस वर्षापूर्वी संयुक्त पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्रासह सुरु झाली. तेव्हांपासून या गावांना नगरपालिका पाणीपुरवठा करते. यासाठीचा कर मागील काही वर्षांपासून या गावांकडे थकीत आहे. मागील १५ वर्षांपासून याबाबत काही कारवाई झाली नाही. मात्र, याबाबत नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी अचानक निर्णय घेत थकबाकी वसुलीसाठी या गावांचा पाणी पुरवठा खंडीत केला. यामुळे भर उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही यामुळे ज्या धरणासाठी सर्वस्व दिले तेथील पाण्यासाठीच या ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे. 

पालिकेने किती सहन करायचे पालिकेला महिन्याकाठी लाखो रुपयाचे वीजबिल भरावे लागते. पालिकेने एकट्यानेच हा भुर्दंड का सहन करायचा ? यापुढे पैसे भरल्याशिवाय पाणी सुरु करणार नाहीत.- सहाल चाऊस, नगराध्यक्ष.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMajalgaon Damमाजलगाव धरणWomenमहिलाMuncipal Corporationनगर पालिका