शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

गाडी जपून चालवा; जिवघेणी ३० ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:47 IST

बीड : रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी वाढत आहे. दरम्यान, वाहनांचे अपघात होणाऱे ३० ब्लॅक स्पॉट पोलीस प्रशासनाने ...

बीड : रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी वाढत आहे. दरम्यान, वाहनांचे अपघात होणाऱे ३० ब्लॅक स्पॉट पोलीस प्रशासनाने शोधून काढले आहेत. दरम्यान, याठिकाणी काय-काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात संबंधित विभागास कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अनेकवेळा अपघात झालेले व अपघातात मृत्यूचे वाढलेले प्रमाण अशा रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट जिल्हा वाहतूक शाखा व रस्ते वाहतूक सुरक्षा समितीने शोधले आहेत. त्याठिकाणी अपघात का होतात, त्याची कारणे व ते होऊ नयेत यासाठी उपाययोजना याचा अहवाल तयार केला आहे. तो अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उपययोजना करणे गरजेचे असल्याचे सुचविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट, मंजेरी फाटा, रांजणी फाटा, गेवराई शहरात प्रवेश करताना, बाग पिंपळगाव, रानमळा शिवार गेवराई, तळेवाडी फाटा, मादळमोही रोड- सावरगाव, कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील साठेवाडी फाटा, शिरसदेवी, डोईठाणा शिवार, माळेवाडी फाटा, अंभोरा पोलीस हद्दीतील साबलखेड, आष्टी तालुक्यातील धामणगाव शिवार-पोकरी फाटा, अंबाजोगाई टी-पॉईंट, माजलगाव गॅस गोदामासमोर आणि धारूर घाट यासह इतर असे प्रमुख ब्लॅक स्पॉट असून, याठिकाणी होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच या अपघातात मागील दोन वर्षात जवळपास ६० ते ६५ जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज घेऊन तसेच वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट - ३०

२०२० मध्ये याठिकाणी झालेले अपघात ६७

अपघाताली मृत्यूची संख्या ६०

मागीलवर्षी अपघातांची संख्या

जानेवारी ६२

फेब्रुवारी ५०

मार्च ४२

एप्रिल ०७

मे २६

जून ४२

जुलै ४७

ऑगस्ट ४७

सप्टेंबर ५४

ऑक्टोबर ५७

नोव्हेंबर ५६

डिसेंबर ६०

याठिकाणी गाडी जपून चालवावी

प्रामुख्याने अपघात होणारी विविध ठिकाणे जिल्हाभरात आहेत. यामध्ये मांजरसुंबा घाट, धारूर घाट, कल्याण-विशाखापट्टणम महामार्ग व इतर ठिकाणी वाहने जपून व नियमांचे पालन करावे, जेणेकरून अपघात होण्यापासून बचाव होईल.

प्रतिक्रिया

रस्ते चांगले असल्यामुळे अनेकवेळा वाहन चालवताना गती वाढू न देता नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच सीटबेल्ट, हेल्मेट वापरावे, मद्य प्राशन करून वाहन चालवणेदेखील जिवावर बेतू शकते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कैलास भारती, सपोनि वाहतूक शाखा प्रमुख, बीड

ही आहेत कारणे

बहुतांश ब्लॅक स्पॉटवर रस्ता बांधकामाच्या चुका असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रत्याकडेला असलेल्या झाडांच्या फाद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, रस्त्याच्या साईडपट्ट्या कंत्राटदारांनी भरलेल्या नाहीत. तसेच ज्या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे त्याठिकाणी ते नाहीत. महामार्गावरील जढ-उतार अचानक असल्यामुळेदेखील अपघात झाले आहेत. यासह इतर कारणे अपघात होण्याची आहेत. त्यामुळे याठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागांकडून उपाययोजना करणे गरजेचे आहे.