शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गाडी जपून चालवा; जिवघेणी ३० ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:47 IST

बीड : रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी वाढत आहे. दरम्यान, वाहनांचे अपघात होणाऱे ३० ब्लॅक स्पॉट पोलीस प्रशासनाने ...

बीड : रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी वाढत आहे. दरम्यान, वाहनांचे अपघात होणाऱे ३० ब्लॅक स्पॉट पोलीस प्रशासनाने शोधून काढले आहेत. दरम्यान, याठिकाणी काय-काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात संबंधित विभागास कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अनेकवेळा अपघात झालेले व अपघातात मृत्यूचे वाढलेले प्रमाण अशा रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट जिल्हा वाहतूक शाखा व रस्ते वाहतूक सुरक्षा समितीने शोधले आहेत. त्याठिकाणी अपघात का होतात, त्याची कारणे व ते होऊ नयेत यासाठी उपाययोजना याचा अहवाल तयार केला आहे. तो अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उपययोजना करणे गरजेचे असल्याचे सुचविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट, मंजेरी फाटा, रांजणी फाटा, गेवराई शहरात प्रवेश करताना, बाग पिंपळगाव, रानमळा शिवार गेवराई, तळेवाडी फाटा, मादळमोही रोड- सावरगाव, कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील साठेवाडी फाटा, शिरसदेवी, डोईठाणा शिवार, माळेवाडी फाटा, अंभोरा पोलीस हद्दीतील साबलखेड, आष्टी तालुक्यातील धामणगाव शिवार-पोकरी फाटा, अंबाजोगाई टी-पॉईंट, माजलगाव गॅस गोदामासमोर आणि धारूर घाट यासह इतर असे प्रमुख ब्लॅक स्पॉट असून, याठिकाणी होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच या अपघातात मागील दोन वर्षात जवळपास ६० ते ६५ जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज घेऊन तसेच वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट - ३०

२०२० मध्ये याठिकाणी झालेले अपघात ६७

अपघाताली मृत्यूची संख्या ६०

मागीलवर्षी अपघातांची संख्या

जानेवारी ६२

फेब्रुवारी ५०

मार्च ४२

एप्रिल ०७

मे २६

जून ४२

जुलै ४७

ऑगस्ट ४७

सप्टेंबर ५४

ऑक्टोबर ५७

नोव्हेंबर ५६

डिसेंबर ६०

याठिकाणी गाडी जपून चालवावी

प्रामुख्याने अपघात होणारी विविध ठिकाणे जिल्हाभरात आहेत. यामध्ये मांजरसुंबा घाट, धारूर घाट, कल्याण-विशाखापट्टणम महामार्ग व इतर ठिकाणी वाहने जपून व नियमांचे पालन करावे, जेणेकरून अपघात होण्यापासून बचाव होईल.

प्रतिक्रिया

रस्ते चांगले असल्यामुळे अनेकवेळा वाहन चालवताना गती वाढू न देता नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच सीटबेल्ट, हेल्मेट वापरावे, मद्य प्राशन करून वाहन चालवणेदेखील जिवावर बेतू शकते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कैलास भारती, सपोनि वाहतूक शाखा प्रमुख, बीड

ही आहेत कारणे

बहुतांश ब्लॅक स्पॉटवर रस्ता बांधकामाच्या चुका असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रत्याकडेला असलेल्या झाडांच्या फाद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, रस्त्याच्या साईडपट्ट्या कंत्राटदारांनी भरलेल्या नाहीत. तसेच ज्या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे त्याठिकाणी ते नाहीत. महामार्गावरील जढ-उतार अचानक असल्यामुळेदेखील अपघात झाले आहेत. यासह इतर कारणे अपघात होण्याची आहेत. त्यामुळे याठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागांकडून उपाययोजना करणे गरजेचे आहे.