शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

गाडी जपून चालवा; जिवघेणी ३० ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:47 IST

बीड : रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी वाढत आहे. दरम्यान, वाहनांचे अपघात होणाऱे ३० ब्लॅक स्पॉट पोलीस प्रशासनाने ...

बीड : रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी वाढत आहे. दरम्यान, वाहनांचे अपघात होणाऱे ३० ब्लॅक स्पॉट पोलीस प्रशासनाने शोधून काढले आहेत. दरम्यान, याठिकाणी काय-काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात संबंधित विभागास कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अनेकवेळा अपघात झालेले व अपघातात मृत्यूचे वाढलेले प्रमाण अशा रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट जिल्हा वाहतूक शाखा व रस्ते वाहतूक सुरक्षा समितीने शोधले आहेत. त्याठिकाणी अपघात का होतात, त्याची कारणे व ते होऊ नयेत यासाठी उपाययोजना याचा अहवाल तयार केला आहे. तो अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उपययोजना करणे गरजेचे असल्याचे सुचविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट, मंजेरी फाटा, रांजणी फाटा, गेवराई शहरात प्रवेश करताना, बाग पिंपळगाव, रानमळा शिवार गेवराई, तळेवाडी फाटा, मादळमोही रोड- सावरगाव, कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील साठेवाडी फाटा, शिरसदेवी, डोईठाणा शिवार, माळेवाडी फाटा, अंभोरा पोलीस हद्दीतील साबलखेड, आष्टी तालुक्यातील धामणगाव शिवार-पोकरी फाटा, अंबाजोगाई टी-पॉईंट, माजलगाव गॅस गोदामासमोर आणि धारूर घाट यासह इतर असे प्रमुख ब्लॅक स्पॉट असून, याठिकाणी होणाऱ्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच या अपघातात मागील दोन वर्षात जवळपास ६० ते ६५ जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज घेऊन तसेच वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट - ३०

२०२० मध्ये याठिकाणी झालेले अपघात ६७

अपघाताली मृत्यूची संख्या ६०

मागीलवर्षी अपघातांची संख्या

जानेवारी ६२

फेब्रुवारी ५०

मार्च ४२

एप्रिल ०७

मे २६

जून ४२

जुलै ४७

ऑगस्ट ४७

सप्टेंबर ५४

ऑक्टोबर ५७

नोव्हेंबर ५६

डिसेंबर ६०

याठिकाणी गाडी जपून चालवावी

प्रामुख्याने अपघात होणारी विविध ठिकाणे जिल्हाभरात आहेत. यामध्ये मांजरसुंबा घाट, धारूर घाट, कल्याण-विशाखापट्टणम महामार्ग व इतर ठिकाणी वाहने जपून व नियमांचे पालन करावे, जेणेकरून अपघात होण्यापासून बचाव होईल.

प्रतिक्रिया

रस्ते चांगले असल्यामुळे अनेकवेळा वाहन चालवताना गती वाढू न देता नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच सीटबेल्ट, हेल्मेट वापरावे, मद्य प्राशन करून वाहन चालवणेदेखील जिवावर बेतू शकते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कैलास भारती, सपोनि वाहतूक शाखा प्रमुख, बीड

ही आहेत कारणे

बहुतांश ब्लॅक स्पॉटवर रस्ता बांधकामाच्या चुका असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रत्याकडेला असलेल्या झाडांच्या फाद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, रस्त्याच्या साईडपट्ट्या कंत्राटदारांनी भरलेल्या नाहीत. तसेच ज्या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे त्याठिकाणी ते नाहीत. महामार्गावरील जढ-उतार अचानक असल्यामुळेदेखील अपघात झाले आहेत. यासह इतर कारणे अपघात होण्याची आहेत. त्यामुळे याठिकाणी होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागांकडून उपाययोजना करणे गरजेचे आहे.