शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

दात्यांचे योगदान, तालखेडचे शांतिधाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:36 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येच्या तालखेडमध्ये स्मशानभूमी काळाची गरज होती. एखादी व्यक्ती मरण पावली तर बाभळीची ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येच्या तालखेडमध्ये स्मशानभूमी काळाची गरज होती. एखादी व्यक्ती मरण पावली तर बाभळीची झाडे तोडण्यापासून जागा स्वच्छ करण्यापर्यंतची सर्व कामे गावकऱ्यांनाच करावी लागत होती. ही मुख्य अडचण लक्षात घेत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश मुंदडा यांनी स्मशानभूमीचा प्रश्न समोर ठेवला. गावाच्या या सुविधेसाठी हवी ती मदत करण्याची तयारी दर्शविली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती युद्धाजीत पंडित यांच्याकडे या प्रश्नाची तीव्रता मांडण्यात आली. त्यांनीही दखल घेत जिल्हा परिषदेच्या दहन व दफन योजनेतून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. त्याअंतर्गत अंत्यविधी शेड व निवारा शेडचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. परंतु अंत्यविधीची जागा शासकीय मालकीची नसल्यामुळे अधिकृत बांधकाम करण्याची अडचणी होती. त्यामुळे शेड बांधकाम करायचे कोठे, हा प्रश्न होता. ही बाब ओळखून गावातील किसनराव रणंजकर पाटील यांनी रोडलगत असलेली जागा दानपत्र करून स्मशानभूमीसाठी होत असलेल्या गावकऱ्यांच्या प्रयत्नांना बळ दिले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली. स्मशानभूमीला सुरक्षा व्यवस्था असावी. त्यामध्ये नीटनेटकेपणा असला पाहिजे, अशी इच्छा जयप्रकाश मुंदडा यांच्या मनात आली. त्यांनी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना बोलावून आपली भावना मांडली. दिवंगत वडील स्व. मिठ्ठूलाल मुंदडा यांच्या स्मृतीनिमित्त स्मशानभूमीसाठी पाच लाख रुपये दान करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयाची ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी स्वागत करीत कामाची आखणी केली. स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत, कमान, निवारा शेडमधील बैठक व्यवस्था, पेव्हर ब्लॉक, हातपंप आणि परिसरात झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले. या भूमीला शेवटची विश्रांती म्हणून ‘शांतिधाम’ असे नामकरण करण्यात आले. जयप्रकाश मुंदडा यांच्या सकारात्मक विचारांना दाद देत निवृत्त शिक्षक वसंतराव टिळे, रंगनाथराव ठोंबरे व ग्रामस्थही प्रतिसाद देतात. त्यामुळे तालखेडमधील मूलभूत सुविधांना आकार लाभत आहे.

तालखेडला दिशा देणारे जयप्रकाश मुंदडा

गावचे भूमिपुत्र जयप्रकाश मुंदडा यांना १९७१ ते ७४ या कालावधीत शिक्षक म्हणून नवी पिढी घडविण्यासाठी सेवा दिली. परंतु कुटुंब मोठे आणि उत्पन्न पाहता एकट्याने नोकरी करून जमणार नाही, या इच्छेतून भावांना सोबत घेत व्यापार क्षेत्रात पाऊल ठेवले. परंतु शाळा आणि विद्यार्थी यांच्यापासून ते दूर गेले नाहीत. १९८० पासून ५० गरजू शाळकरी मुलांसाठी गणवेश, फी व इतर शैक्षणिक मदत सुरू केली. मदतीच्या या कार्याची माहिती घेत मुंदडा यांची तळमळ लक्षात घेऊन परभणी येथे साने गुरुजी व्याख्यानमालेच्या आयोजकांच्या वतीने सामाजिक कार्यासाठी जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. १९९७ मध्ये एक लाख रुपये देणगी देत आई चंपाबाई मिठ्ठूलाल मुंदडा यांच्या नावाने माजलगावच्या सिद्धेश्वर विद्यालयात बालवाडीचा श्रीगणेशा केला. मुंदडा यांचे दातृत्व इथेच थांबलेले नाही. मागील २० वर्षांपासून दर महिन्याला ३५ ते ४० निराधारांना प्रत्येकी सहा किलो धान्य वाटपाचा मानवतावादी उपक्रम आजतागायत सुरू आहे. दरवर्षी ३० नोव्हेंबरला या निराधारांना वस्त्रदान करीत सामाजिक पातळीवर आधार देतात.

250921\25bed_4_25092021_14.jpg