शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

अनुदानाची रक्कम वाटपास सोमवारपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी १४४ कोटी १८ लाख ८३ हजार रुपयांचा मदत निधी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावर प्राप्त झाला आहे. हा निधी तात्काळ शेतक-यापर्यंत पोहचावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर पाठवला आहे.

ठळक मुद्देबीड जिल्हा प्रशासन घेणार प्रत्येक आठवड्याला वाटप रकमेचा अहवाल

बीड : जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी १४४ कोटी १८ लाख ८३ हजार रुपयांचा मदत निधी पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावर प्राप्त झाला आहे. हा निधी तात्काळ शेतक-यापर्यंत पोहचावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर पाठवला आहे. अनुदानाची रक्कम खात्यावर जमा करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना तात्काळ प्रक्रिया पूर्ण करुन खात्यावर पैसे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्ह्यात जवळपास ८ लाख २४ हजार ७५९ शेतकरी अतिवृष्टीबाधित आहेत. मागील दोन वर्षांमध्ये पडलेला कोरडा दुष्काळ आणि त्यानंतर खरीप हंगामातील पिके काढणीच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून, आर्थिक अडचणीचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतक-यांना शासनाकडून नुकसान भरपाई अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी ५१४ कोटी ८१ लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १४४ कोटी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. त्याचे वितरण तालुकास्तरावर करण्यात आले असून, येथे बाधित शेतकºयांची यादी अंतिम करुन त्यांच्या खात्यावर सोमवारपासून अनुदान रक्कम वाटपास सुरुवात होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी सर्व संबंधित अधिकाºयांना तात्काळ शेतकºयांची अंतिम यादी तयार करुन त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.रक्कम बँकेत पडून राहिल्यास कारवाईतहसीलदारांनी त्यांना वितरित रकमेचे वाटप झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी पूर्ण माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी. तसेच निधी वाटप न करता पडून राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.त्यानंतर देखील अनुदानाची रक्कम बँकेत ठेवल्याचे निदर्शनास आल्यास हा तात्पुरता अपहार समजून संबंधित अधिका-यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.अनेकवेळा लाभार्थ्याचे नाव, खाते क्रमांक जुळत नाही अशा तांत्रिक कारणास्तव परत आलेला निधी हा संबंधित शेतकºयाच्या खात्यावर जमा होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास ती रक्कम शासनाकडे जमा व्हावी या संदर्भात दर आठवड्याला वाटप करण्यात आलेल्या रकमेचा ताळमेळ घेण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र