शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ७२ लाभार्थ्यांना धनादेश वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:00 IST

प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, २०२२ पर्यंत या योजनेतून सगळ्यांना घर दिले जाईल. बीडमधील प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीस स्वत:च्या हक्काचे घरकुल देण्याचे काम यातून केले जात असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : प्रत्येक गरीब व्यक्तीस स्वत:चे घरकुल मिळणार

बीड : प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, २०२२ पर्यंत या योजनेतून सगळ्यांना घर दिले जाईल. बीडमधील प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीस स्वत:च्या हक्काचे घरकुल देण्याचे काम यातून केले जात असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.बीड नगरपरिषदेच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक विजय नाईक, मध्यवर्ती बँकेचे दिलीप परदेशी, क्र ेडाईचे समीर काझी, न.प.चे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून आज १०९ पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळत असला तरीही अजून १९०० लाभार्थ्यांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यांना येत्या आठ ते दहा दिवसांत लाभ दिला जाईल. याचबरोबर शहराच्या खंडेश्वरी, धानोरा रस्ता आदी भागांवर आवास योजनेतून घरकुल बांधण्यासाठी नियोजन केले जात आहे. सध्या ड्रेनेज पाणीपुरवठा आणि रस्त्यांची कामे सुरू असून त्याचा शहराला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.मुख्याधिकारी दोरकुळकर यांनी प्रास्ताविक करताना लाभार्थ्यांच्या मंजूर लाभातील ४० हजारांचा पहिला हप्ता दिला जात असल्याचे सांगितले.याप्रसंगी क्षीरसागर यांच्या हस्ते ७२ पात्र लाभार्थ्यांपैकी ५ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण केले व इतर पात्र व्यक्तींना कार्यक्रमानंतर धनादेश देण्याची कार्यवाही सुरु केली होती. शहरातील ५ हजार नागरिकांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १०९ कर्ज मंजूर लाभ देण्यात येत असून याव्यतिरिक्त १९०० अर्ज शासनाकडून मंजूर झाले आहेत. यामध्ये प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा लाभ मंजूर आहे. त्यापैकी लक्ष्मीकांत आडाणे, गणेश ओव्हाळ, अल्ताफ इब्राहिम बागवान, कस्तुराबाई शिंदे व अंकुश चित्रे यांना रोहयो व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.

टॅग्स :BeedबीडPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर