शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रतेची सुनावणी की भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी का थांबली?

By शिरीष शिंदे | Updated: September 25, 2023 18:50 IST

सूचना नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून नाही कोणतेच नियोजन

बीड : ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार परळी येथे येणार असल्याची चर्चा २७ ऑगस्टपासून वेळोवेळी केली जात होती; परंतु शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी, स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध व कार्यक्रमासाठी २ कोटी २१ लाख रुपये खर्च होणार असल्याच्या टीकांमुळे हा कार्यक्रम घेण्यासंदर्भाने कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याने प्रशासकीय स्तरावरून तयारी थांबली आहे.

सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत अशी ओरड होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी; तसेच इतर सुविधा देण्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यांत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार अहमदनगर, कोल्हापूर, जेजुरी, परभणीसह इतर ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्यानुसार जिल्हा प्रशासन कामाला लागले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी विविध कार्यालयीन प्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेत प्रमाणपत्र व शासकीय योजनांच्या प्रदर्शनाची तयारी केली होती. २४ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार असल्याने यासाठी २ कोटी २१ लाख रुपये ९० हजार रुपये खर्च होणार असल्याचे समोर आले. त्यामुळे विरोधकांनी सडकून टीकाही केली.

असे होते नियोजन परळी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागविण्यात आली. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार तर साइड मंडपासाठी ६० लाख १४ हजार रुपयांचा उल्लेख त्या निविदेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. मोजक्या शब्दांत सोशल मीडियावर एक्सद्वारे (ट्विटर) सरकारवर टीकाही केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

राजकीय वातावरणही अस्थिरसर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीमुळे राजकीय वातावरण अस्थिर आहे. यासह इतर कारणांमुळे ‘शासन आपल्या दारी’ येण्याची तयारी सध्या तरी थांबली आहे.

भाजप नेत्यांचा विरोधपरळी येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. या कार्यक्रमास येऊ नये, असा निरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला होता. तेव्हापासूनच हा कार्यक्रम घेतला जाईल की नाही यावर शंका घेतली जात होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेState Governmentराज्य सरकार