शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अपात्रतेची सुनावणी की भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी का थांबली?

By शिरीष शिंदे | Updated: September 25, 2023 18:50 IST

सूचना नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून नाही कोणतेच नियोजन

बीड : ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार परळी येथे येणार असल्याची चर्चा २७ ऑगस्टपासून वेळोवेळी केली जात होती; परंतु शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी, स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध व कार्यक्रमासाठी २ कोटी २१ लाख रुपये खर्च होणार असल्याच्या टीकांमुळे हा कार्यक्रम घेण्यासंदर्भाने कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याने प्रशासकीय स्तरावरून तयारी थांबली आहे.

सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत अशी ओरड होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी; तसेच इतर सुविधा देण्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यांत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार अहमदनगर, कोल्हापूर, जेजुरी, परभणीसह इतर ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्यानुसार जिल्हा प्रशासन कामाला लागले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी विविध कार्यालयीन प्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेत प्रमाणपत्र व शासकीय योजनांच्या प्रदर्शनाची तयारी केली होती. २४ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार असल्याने यासाठी २ कोटी २१ लाख रुपये ९० हजार रुपये खर्च होणार असल्याचे समोर आले. त्यामुळे विरोधकांनी सडकून टीकाही केली.

असे होते नियोजन परळी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागविण्यात आली. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार तर साइड मंडपासाठी ६० लाख १४ हजार रुपयांचा उल्लेख त्या निविदेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. मोजक्या शब्दांत सोशल मीडियावर एक्सद्वारे (ट्विटर) सरकारवर टीकाही केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

राजकीय वातावरणही अस्थिरसर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीमुळे राजकीय वातावरण अस्थिर आहे. यासह इतर कारणांमुळे ‘शासन आपल्या दारी’ येण्याची तयारी सध्या तरी थांबली आहे.

भाजप नेत्यांचा विरोधपरळी येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. या कार्यक्रमास येऊ नये, असा निरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला होता. तेव्हापासूनच हा कार्यक्रम घेतला जाईल की नाही यावर शंका घेतली जात होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेState Governmentराज्य सरकार