शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अपात्रतेची सुनावणी की भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी का थांबली?

By शिरीष शिंदे | Updated: September 25, 2023 18:50 IST

सूचना नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून नाही कोणतेच नियोजन

बीड : ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार परळी येथे येणार असल्याची चर्चा २७ ऑगस्टपासून वेळोवेळी केली जात होती; परंतु शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी, स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध व कार्यक्रमासाठी २ कोटी २१ लाख रुपये खर्च होणार असल्याच्या टीकांमुळे हा कार्यक्रम घेण्यासंदर्भाने कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याने प्रशासकीय स्तरावरून तयारी थांबली आहे.

सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत अशी ओरड होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी; तसेच इतर सुविधा देण्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यांत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार अहमदनगर, कोल्हापूर, जेजुरी, परभणीसह इतर ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्यानुसार जिल्हा प्रशासन कामाला लागले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी विविध कार्यालयीन प्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेत प्रमाणपत्र व शासकीय योजनांच्या प्रदर्शनाची तयारी केली होती. २४ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार असल्याने यासाठी २ कोटी २१ लाख रुपये ९० हजार रुपये खर्च होणार असल्याचे समोर आले. त्यामुळे विरोधकांनी सडकून टीकाही केली.

असे होते नियोजन परळी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागविण्यात आली. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार तर साइड मंडपासाठी ६० लाख १४ हजार रुपयांचा उल्लेख त्या निविदेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. मोजक्या शब्दांत सोशल मीडियावर एक्सद्वारे (ट्विटर) सरकारवर टीकाही केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

राजकीय वातावरणही अस्थिरसर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीमुळे राजकीय वातावरण अस्थिर आहे. यासह इतर कारणांमुळे ‘शासन आपल्या दारी’ येण्याची तयारी सध्या तरी थांबली आहे.

भाजप नेत्यांचा विरोधपरळी येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. या कार्यक्रमास येऊ नये, असा निरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला होता. तेव्हापासूनच हा कार्यक्रम घेतला जाईल की नाही यावर शंका घेतली जात होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेState Governmentराज्य सरकार