शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवरही विसंवाद; तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 16:57 IST

राज्यात महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या २७ आमदारांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अशाच तक्रारी जिल्ह्यातदेखील आहेत.

- अनिल लगड

बीड : राज्यात भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले; परंतु सत्तास्थापनेपासून राज्यात तिन्ही पक्षांत अनेक कारणांवरून मतभेद दिसून येत आहेत. असेच चित्र बीड जिल्ह्यात जिल्हापातळीपासून गावपातळीपर्यंत पाहायला मिळत आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्याही जास्त आहे. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व दिसून येत आहे. महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या शिवसेनेला कुठेच स्थान मिळत नाही, असा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी जाहीरपणे करताना आहेत; तर जिल्ह्यात काँग्रेसकडे राज्यसभेत रजनी पाटील यांच्या रूपाने खासदारपद आहे. तरीही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांत स्थानिक पातळीवर नाराजीचे चित्र आहे. फक्त सत्ता आपल्याही पक्षाची आहे, एवढेच समाधान मानून ‘तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना,’ असेच राजकीय चित्र जिल्ह्यात आघाडीत दिसत आहे.

राज्यात महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या २७ आमदारांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अशाच तक्रारी जिल्ह्यातदेखील आहेत. पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीत कुठेही महाविकास आघाडी एकत्र लढली नाही. बीड शहरात शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यांतील आरोप-प्रत्यारोप जाहीरपणे पाहायला मिळाले. माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचा सवतासुभा पाहायला मिळत आहे. गेवराईत राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांचाच गजर सुरू आहे. येथेही काँग्रेस, सेनेत अस्वस्थता दिसत आहे. आष्टी-पाटोद्यात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे सत्तेत असूनही त्यांना काँग्रेस, सेनेचे पाठबळ दिसत नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी निधी मिळविण्यात व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागत आहे.

तक्रारी कोणाच्या काय?

काँग्रेस: राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहेत. त्यांनी आपल्याच मतदासंघात विकासाचा निधी वळविला आहे. यामुळे पालकमंत्र्यांकडून अन्याय होत आहे. आता त्यांचे पोट भरलेय. त्यांनी मन मोठं करून काँग्रेस, सेनेच्या सेवेसाठी निधी द्यावा. सत्तेत काँग्रेसचाही वाटा आहे; परंतु आमच्या कार्यकर्त्याला स्थानिक पातळीवर कामे करताना दुजाभाव केला जातो. यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जातो.

राष्ट्रवादी: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जादूमुळे काँग्रेस सत्तेत आली आहे. सत्ता नसली की काय होते हे काँग्रेस, राष्ट्रवादीने पाहिले आहे. रस्ते, पाणी या प्रश्नांवर कोणतेही मतभेद नाहीत; परंतु स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्षाचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांच्या ‘इगो’चा प्रश्न आहे. जिल्ह्यात सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत; परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नाला बगल दिली जात आहे.

शिवसेना: काँग्रेसच्या आमदारांची नाराजी काँग्रेसच्या मंत्र्यांवर आहे. आघाडीवर किंवा मुख्यमंत्र्यांबाबत नाही. सत्ता स्थापन करताना जो शिवसेनेचा हिस्सा आहे, त्याप्रमाणे कमिट्या व निधीचा वाटा मिळाला पाहिजे; याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे, असे सेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी

एकंदरीत जिल्ह्यात सत्तेत राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. यामुळे जे सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणे सर्वच ठिकाणी सेना, काँग्रेसला वाटा मिळाला पाहिजे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. याबाबत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत. वरिष्ठ काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBeedबीड