शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गावात खरंच एवढ्या पाण्याच्या टँकर खेपा झाल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST

अमोल जाधव नांदुरघाट : २०१९ मध्ये काही गावात पाणीटंचाइ लक्षात घेता पाणी टँकर सुरू केले होते. त्यासाठी गावातील बोर, ...

अमोल जाधव

नांदुरघाट : २०१९ मध्ये काही गावात पाणीटंचाइ लक्षात घेता पाणी टँकर सुरू केले होते. त्यासाठी गावातील बोर, विहीर अधिग्रहण करून तेथून पाणी गावाला दिले होते; परंतु वास्तवात त्या ठिकाणाहून किंवा गावात एवढ्या टँकरच्या खेपा खरंच केल्या आहेत की नाही, हे जनतेने ठरवायचे. आपल्या पुढाऱ्यांनी गुत्तेदाराच्या संगनमताने गावाला पाणी पाजण्याऐवजी पळवले का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

२०१९ मध्ये काही टंचाईच्या काळात शेतकऱ्यांचे बोर व विहीर शासनाने अधिग्रहण केले होते. प्रतिदिन सहाशे रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे येऊ लागले आहेत. काही रक्कम सुरुवातीला मिळाली आहे; परंतु जवळपास ८० टक्के रक्कम तशीच शासनाकडे होती. त्यातील बहुतांश रक्कम येऊ लागली आहे परंतु गाव पुढारी व मध्यस्थी दलाल हे तो चेक घेऊन परस्पर उचलण्याचा प्रकार होऊ शकतो. तसेच चेक निघण्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत.

महत्त्वाचे म्हणजे गावात टँकरने खरंच तेवढ्या खेपा केल्या आहेत का, हे प्रत्येक गावातील सुजाण नागरिकांनी पाहिले पाहिजे. जर गावात टँकर न येता पैसे उचलत असतील तर जनतेनेच त्या गाव पुढाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.

आलेल्या रक्कमा पुढीलप्रमाणे

नांदुरघाटमध्ये १९ एप्रिल २०१९ पासून टॅंकर सुरू केले. ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत सुरू होते. म्हणजे जवळपास सहा महिन्याचा कालावधी टॅंकरने गावाला पाणीपुरवठा होता म्हणजे १६५ दिवस ५ टँकरने पाणीपुरवठा केला. हे टँकर भरण्यासाठी पाच शेतकऱ्यांचे बोर, विहीर अधिग्रहण केले होते. यामध्ये हरी राम जाधव (९९,००० रुपये), भागवत खोमणे (९९,००० रुपये), दत्तू सागरे (९७,२०० रुपये), दिलावर शेख (९६,००० रुपये), शेख नसीर बशीर (९४,२०० रुपये, सर्व रा. नांदुरघाट) या शेतकऱ्यांना टँकर भरून दिले म्हणून पाण्याचे पैसे त्यांच्या खात्यावर काही आले व येऊ लागले.

तसेच नांदुरघाट सर्कलमधील हंगेवाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी १४६ दिवस दोन टँकर पाणीपुरवठा केला. त्यासाठी उद्धवराव रामभाऊ जाधव (६९,०००) व सोमीनाथ शाहू हंगे (८७,६००) यांचे अधिग्रहण केले. त्यांना एवढी रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे.

तसेच माळेवाडीत मधुकर अभिमान गदळे (८८,२०० रु), सांगवीत मच्छींद्र दत्तात्रेय धस (९१,८००), नारेवाडीत त्रिंबक ज्ञानोबा शेळके (१३,८००) असे पैसे आहेत. नाहोली येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यासाठी गहिनीनाथ बाबुराव बिक्कड ६४,२००, दत्तात्रेय मुळे दैठणा १५,६००, नवनाथ भीमा केदार ४३,२०० असे पैसे आहेत.

नाहोली येथे १०७ दिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला. तसेच शिरूर घाट येथे विशेष म्हणजे एकाच टॅंकरने (MHEB 7624) सर्व सात उद्‌भवावरून खेपा केल्याचे दिसून आले. यामध्ये श्यामराव सुखदेव सांगळे १,२००, कुमराबाई श्रीरंग कदम राजेगाव १६,२००, प्रभाकर आश्रुबा शिंदे ३८,४००, संदिपान रामभाऊ फाटक ३,६००, अण्णासाहेब गोपीनाथ केदार ३७,२००, सुषेन नारायण गीते ६९,०००, महादेव भगवान केदार ४९,८०० या सात ठिकाणाहून शिरूरघाटला एकाच टॅंकरने पाणीपुरवठा केला. वरील सर्व रक्कम शेतकऱ्यांना टँकर भरले म्हणून पाण्याचे पैसे आले आहेत. यातील काही रक्कम सुरुवातीला देण्यात आली; परंतु बहुतांश रक्कम राहिली आहे. ती लवकरच मिळायला सुरुवात होणार आहे व चालू झाली आहे. वरील शेतकऱ्यांनी आपली रक्कम कोणालाही देऊ नये. तसेच गावकऱ्यांनी त्या गावात खरंच एवढ्या टँकरच्या खेपा झाल्या होत्या का, याचे परीक्षण करणे गरजेचे आहे.