शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

गावात खरंच एवढ्या पाण्याच्या टँकर खेपा झाल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST

अमोल जाधव नांदुरघाट : २०१९ मध्ये काही गावात पाणीटंचाइ लक्षात घेता पाणी टँकर सुरू केले होते. त्यासाठी गावातील बोर, ...

अमोल जाधव

नांदुरघाट : २०१९ मध्ये काही गावात पाणीटंचाइ लक्षात घेता पाणी टँकर सुरू केले होते. त्यासाठी गावातील बोर, विहीर अधिग्रहण करून तेथून पाणी गावाला दिले होते; परंतु वास्तवात त्या ठिकाणाहून किंवा गावात एवढ्या टँकरच्या खेपा खरंच केल्या आहेत की नाही, हे जनतेने ठरवायचे. आपल्या पुढाऱ्यांनी गुत्तेदाराच्या संगनमताने गावाला पाणी पाजण्याऐवजी पळवले का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

२०१९ मध्ये काही टंचाईच्या काळात शेतकऱ्यांचे बोर व विहीर शासनाने अधिग्रहण केले होते. प्रतिदिन सहाशे रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे येऊ लागले आहेत. काही रक्कम सुरुवातीला मिळाली आहे; परंतु जवळपास ८० टक्के रक्कम तशीच शासनाकडे होती. त्यातील बहुतांश रक्कम येऊ लागली आहे परंतु गाव पुढारी व मध्यस्थी दलाल हे तो चेक घेऊन परस्पर उचलण्याचा प्रकार होऊ शकतो. तसेच चेक निघण्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत.

महत्त्वाचे म्हणजे गावात टँकरने खरंच तेवढ्या खेपा केल्या आहेत का, हे प्रत्येक गावातील सुजाण नागरिकांनी पाहिले पाहिजे. जर गावात टँकर न येता पैसे उचलत असतील तर जनतेनेच त्या गाव पुढाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.

आलेल्या रक्कमा पुढीलप्रमाणे

नांदुरघाटमध्ये १९ एप्रिल २०१९ पासून टॅंकर सुरू केले. ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत सुरू होते. म्हणजे जवळपास सहा महिन्याचा कालावधी टॅंकरने गावाला पाणीपुरवठा होता म्हणजे १६५ दिवस ५ टँकरने पाणीपुरवठा केला. हे टँकर भरण्यासाठी पाच शेतकऱ्यांचे बोर, विहीर अधिग्रहण केले होते. यामध्ये हरी राम जाधव (९९,००० रुपये), भागवत खोमणे (९९,००० रुपये), दत्तू सागरे (९७,२०० रुपये), दिलावर शेख (९६,००० रुपये), शेख नसीर बशीर (९४,२०० रुपये, सर्व रा. नांदुरघाट) या शेतकऱ्यांना टँकर भरून दिले म्हणून पाण्याचे पैसे त्यांच्या खात्यावर काही आले व येऊ लागले.

तसेच नांदुरघाट सर्कलमधील हंगेवाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी १४६ दिवस दोन टँकर पाणीपुरवठा केला. त्यासाठी उद्धवराव रामभाऊ जाधव (६९,०००) व सोमीनाथ शाहू हंगे (८७,६००) यांचे अधिग्रहण केले. त्यांना एवढी रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे.

तसेच माळेवाडीत मधुकर अभिमान गदळे (८८,२०० रु), सांगवीत मच्छींद्र दत्तात्रेय धस (९१,८००), नारेवाडीत त्रिंबक ज्ञानोबा शेळके (१३,८००) असे पैसे आहेत. नाहोली येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यासाठी गहिनीनाथ बाबुराव बिक्कड ६४,२००, दत्तात्रेय मुळे दैठणा १५,६००, नवनाथ भीमा केदार ४३,२०० असे पैसे आहेत.

नाहोली येथे १०७ दिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला. तसेच शिरूर घाट येथे विशेष म्हणजे एकाच टॅंकरने (MHEB 7624) सर्व सात उद्‌भवावरून खेपा केल्याचे दिसून आले. यामध्ये श्यामराव सुखदेव सांगळे १,२००, कुमराबाई श्रीरंग कदम राजेगाव १६,२००, प्रभाकर आश्रुबा शिंदे ३८,४००, संदिपान रामभाऊ फाटक ३,६००, अण्णासाहेब गोपीनाथ केदार ३७,२००, सुषेन नारायण गीते ६९,०००, महादेव भगवान केदार ४९,८०० या सात ठिकाणाहून शिरूरघाटला एकाच टॅंकरने पाणीपुरवठा केला. वरील सर्व रक्कम शेतकऱ्यांना टँकर भरले म्हणून पाण्याचे पैसे आले आहेत. यातील काही रक्कम सुरुवातीला देण्यात आली; परंतु बहुतांश रक्कम राहिली आहे. ती लवकरच मिळायला सुरुवात होणार आहे व चालू झाली आहे. वरील शेतकऱ्यांनी आपली रक्कम कोणालाही देऊ नये. तसेच गावकऱ्यांनी त्या गावात खरंच एवढ्या टँकरच्या खेपा झाल्या होत्या का, याचे परीक्षण करणे गरजेचे आहे.