शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

गावात खरंच एवढ्या पाण्याच्या टँकर खेपा झाल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST

लोकप्रतिनिधी, गुत्तेदाराने गावाला एवढे पाणी पाजले का? शेतकऱ्यांनो, अधिग्रहणाचे पैसे येऊ लागले, ते कुणालाही देऊ नका अमोल जाधव ...

लोकप्रतिनिधी, गुत्तेदाराने गावाला एवढे पाणी पाजले का? शेतकऱ्यांनो, अधिग्रहणाचे पैसे येऊ लागले, ते कुणालाही देऊ नका

अमोल जाधव

नांदुरघाट : २०१९ मध्ये काही गावात पाणीटंचाइ लक्षात घेता पाणी टँकर सुरू केले होते. त्यासाठी गावातील बोर, विहीर अधिग्रहण करून तेथून पाणी गावाला दिले होते; परंतु वास्तवात त्या ठिकाणाहून किंवा गावात एवढ्या टँकरच्या खेपा खरंच केल्या आहेत की नाही, हे जनतेने ठरवायचे. आपल्या पुढाऱ्यांनी गुत्तेदाराच्या संगनमताने गावाला पाणी पाजण्याऐवजी पळवले का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. २०१९ मध्ये काही टंचाईच्या काळात शेतकऱ्यांचे बोर व विहीर शासनाने अधिग्रहण केले होते. प्रतिदिन सहाशे रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे येऊ लागले आहेत. काही रक्कम सुरुवातीला मिळाली आहे; परंतु जवळपास ८० टक्के रक्कम तशीच शासनाकडे होती. त्यातील बहुतांश रक्कम येऊ लागली आहे परंतु गाव पुढारी व मध्यस्थी दलाल हे तो चेक घेऊन परस्पर उचलण्याचा प्रकार होऊ शकतो. तसेच चेक निघण्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत.

महत्त्वाचे म्हणजे गावात टँकरने खरंच तेवढ्या खेपा केल्या आहेत का, हे प्रत्येक गावातील सुजाण नागरिकांनी पाहिले पाहिजे. जर गावात टँकर न येता पैसे उचलत असतील तर जनतेनेच त्या गाव पुढाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.

आलेल्या रक्कमा पुढीलप्रमाणे नांदुरघाटमध्ये १९ एप्रिल २०१९ पासून टॅंकर सुरू केले. ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत सुरू होते. म्हणजे जवळपास सहा महिन्याचा कालावधी टॅंकरने गावाला पाणीपुरवठा होता म्हणजे १६५ दिवस ५ टँकरने पाणीपुरवठा केला. हे टँकर भरण्यासाठी पाच शेतकऱ्यांचे बोर, विहीर अधिग्रहण केले होते. यामध्ये हरी राम जाधव (९९,००० रुपये), भागवत खोमणे (९९,००० रुपये), दत्तू सागरे (९७,२०० रुपये), दिलावर शेख (९६,००० रुपये), शेख नसीर बशीर (९४,२०० रुपये, सर्व रा. नांदुरघाट) या शेतकऱ्यांना टँकर भरून दिले म्हणून पाण्याचे पैसे त्यांच्या खात्यावर काही आले व येऊ लागले.

तसेच नांदुरघाट सर्कलमधील हंगेवाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी १४६ दिवस दोन टँकर पाणीपुरवठा केला. त्यासाठी उद्धवराव रामभाऊ जाधव (६९,०००) व सोमीनाथ शाहू हंगे (८७,६००) यांचे अधिग्रहण केले. त्यांना एवढी रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे.

तसेच माळेवाडीत मधुकर अभिमान गदळे (८८,२०० रु), सांगवीत मच्छींद्र दत्तात्रेय धस (९१,८००), नारेवाडीत त्रिंबक ज्ञानोबा शेळके (१३,८००) असे पैसे आहेत. नाहोली येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यासाठी गहिनीनाथ बाबुराव बिक्कड ६४,२००, दत्तात्रेय मुळे दैठणा १५,६००, नवनाथ भीमा केदार ४३,२०० असे पैसे आहेत.

नाहोली येथे १०७ दिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला. तसेच शिरूर घाट येथे विशेष म्हणजे एकाच टॅंकरने (MHEB 7624) सर्व सात उद्‌भवावरून खेपा केल्याचे दिसून आले. यामध्ये श्यामराव सुखदेव सांगळे १,२००, कुमराबाई श्रीरंग कदम राजेगाव १६,२००, प्रभाकर आश्रुबा शिंदे ३८,४००, संदिपान रामभाऊ फाटक ३,६००, अण्णासाहेब गोपीनाथ केदार ३७,२००, सुषेन नारायण गीते ६९,०००, महादेव भगवान केदार ४९,८०० या सात ठिकाणाहून शिरूरघाटला एकाच टॅंकरने पाणीपुरवठा केला. वरील सर्व रक्कम शेतकऱ्यांना टँकर भरले म्हणून पाण्याचे पैसे आले आहेत. यातील काही रक्कम सुरुवातीला देण्यात आली; परंतु बहुतांश रक्कम राहिली आहे. ती लवकरच मिळायला सुरुवात होणार आहे व चालू झाली आहे. वरील शेतकऱ्यांनी आपली रक्कम कोणालाही देऊ नये. तसेच गावकऱ्यांनी त्या गावात खरंच एवढ्या टँकरच्या खेपा झाल्या होत्या का, याचे परीक्षण करणे गरजेचे आहे.