शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला; बीडमध्ये ढोल वाजवत मोर्चा

By सोमनाथ खताळ | Updated: December 26, 2022 16:09 IST

अनेक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत, परंतू आरक्षणाबाबत कोणीच बोलत नाही.

बीड : धनगर आरक्षणासाठी सरकार केवळ अश्वासने देत आहेत. परंतू ठोस भूमिका घेतली जात नाही. याच अनुषंगाने समाज बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांना घेऊन यशवंत सेना आक्रमक झाली होती. ढोल, झांज वाजवत समाज बांधवांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवू, असा इशारा धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी दिला. यावेळी खा.गावीत यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.

आतापर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेना व इतर संघटनांनी अनेकदा मोर्चे काढले. आंदोलने केली. वेगवेळे अनोखे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले. असे असतानाही सरकारने केवळ अश्वासने दिली. भाजप सरकारने अश्वासने दिल्यानंतर सत्ता गेली. नंतर विरोधात गेल्यावर सध्याचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यावर आरक्षण देऊ असे अश्वासन बारामती येथील सभेत दिले होते. आता भाजप-शिंदे सरकार आले आहे. यात अनेक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत. परंतू आरक्षणाबाबत कोणीच बोलत नाही. खा.सुप्रिया सुळे यांनी याबाबत आवाज उठवताच खा.गावीत यांनी याला विरोध केला. त्यामुळे गावीत यांच्याविरोधातही समाजामध्ये प्रचंड रोष आहे. गावीत यांचा निषेध करण्यासह धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, आरक्षण मिळेपर्यंत ज्या २२ योजना लागू करण्यात आलेल्या आहेत, त्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची भरीव तरतूद करावी, तसेच याला चालू अधिवेशनात मंजूरी घ्यावी, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. भारत सोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात गणेश सातपुते, कैलास निर्मळ, रामनाथ यमगर, उमेश निर्मळ, साईनाथ कैतके यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहनशिलतेचा अंत पाहू नका - सोन्नरमागील अनेक वर्षांपासून सामाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेना लढा देत आहे. अनेकदा अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. आताचे सत्तेतील मंत्री हे विरोधात असताना सत्ता आल्यावर आरक्षण देऊ, असे अश्वासन देतात. परंतू सत्ता आल्यावर त्यांना याचा विसर पडतो. आता धनगर समाजाची फसवणूक असून समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी मोर्चातून दिला आहे.

टॅग्स :Beedबीडreservationआरक्षण