शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

श्री क्षेत्र भगवानगडावर भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या ५४ व्या पुण्यतिथीसाठी सोमवारी राज्यभरातून भगवान भक्तांची मांदियाळी गडावर ...

ठळक मुद्देलाखो मस्तक भगवानबाबांच्या चरणी झुकले : रुबाबदार अश्व, बाबांच्या पादुकांसह प्रतिमेची प्रदक्षिणा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या ५४ व्या पुण्यतिथीसाठी सोमवारी राज्यभरातून भगवान भक्तांची मांदियाळी गडावर दाखल झाली होती. लाखो मस्तक बाबांच्या समाधीवर नतमस्तक झाले तर सकाळपासूनच गडाचे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते समाधीचा महाभिषेक केला गेला. तर गडाचा रुबाबदार अश्व, बाबांच्या पादुकासह प्रतिमेची प्रदक्षिणा व कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्याचे काम भगवान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.बाबा त्या काळी घोड्याच्या टांग्यात प्रवास करायचे तो टांगा आज संभाळून ठेवला. त्याचे कारण सांगताना या टांग्याने संपूर्ण महाराष्ट्र जागा केल्याचे सांगितले. आईचा मोठेपणा लहान मुलाला कळत नाही तसेच संताचा मोठेपणा कळत नसल्याचे सांगितले. संतांना जवळच्यांनीच त्रास दिला तीच परंपरा आजही चालू आहे. पण संत त्या त्रासाला समोर हसत खेळत सामोरे जातात म्हणूनच ते गेल्यानंतर आपण त्यांचे स्मरण ठेवतो आणि त्यांच्यावरच्या श्रध्देनेच कल्याण होते हा विश्वास डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केला.या वेळी आचार्य नारायण स्वामी, सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, भगवान महाराज रजपूत (वडवणी), राधाताई महाराज (पाटोदा), रामगिरी महाराज (येळी) बाबासाहेब महाराज बडे आदींची उपस्थिती व लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.पुढील पुण्यतिथीसाठी अनेकांनी आपले योगदान जाहीर केले. गादीघर ते समाधीस्थळ आकर्षक रांगोळीने सजवले गेले होते. बाबांच्या दर्शनानंतर भाविक कृतार्थ झाले होते.नामदेव शास्त्री : दुसऱ्याची निंदा करू नकाकीर्तनप्रसंगी ‘संताचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकाचे काम नाही येथे ।।’ या अभंगावर बोलताना डॉ. नामदेव शास्त्री यांनी संतांचा महिमा सांगितला.आपला मेंदू दुसºयाची निंदा करण्यासाठी व्यर्थ घालू नका. ज्ञानेश्वरांनी वाळवंटात कीर्तन करुन जातीपातीच्या शृंखला तोडल्या. तेच काम संत भगवान बाबांनी केले. संपूर्ण आयुष्य ज्ञानेश्वरीसाठी जगले त्यांचे नाव भगवानबाबा. म्हणूनच गडावर ज्ञानेश्वरीचे अध्ययन सुरु आहे. चाळीस मुलांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली हे भगवान बाबांचे वैभव आहे, असे असे डॉ. नामदेवशास्त्री म्हणाले.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम