शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

घोषणा होऊनही अद्याप कामगारांना मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:34 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम मजूर, ऑटोचालक तसेच इतर ...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम मजूर, ऑटोचालक तसेच इतर घटकांना मदत करण्याचे जाहीर करण्यात आले होते. यातील अनेक घटकांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी. संचारबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. परिणामी, हातावर पोट असणाऱ्या मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने मदत केल्यास त्यांना आधार मिळणार आहे. अजूनही अनेक कामगारांच्या नोंदणीचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे शासनाने सर्वांना सरसगट मदत करावी, अशी मागणी कामगारवर्ग करत आहे.

कामगारांसोबतच समाजात अनेक वंचित घटक आहेत. त्यांनाही मदतीची गरज आहे. ज्यांना मदत जाहीर झाली, त्या घटकात अनेकांची नोंदणी नाही. अनेक नोंदणी कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे वाहने बंद आहेत. तर नोंदणीच्या कार्यालयात एकाच वेळी काम होईल अशीही स्थिती नाही. परिणामी अनेकांची नोंदणी रखडली. यासाठी शासनाने सरसगट मदत करावी, याबाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुभाष शिंदे यांनी केली आहे.