शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

पीकविम्यासाठी वंचित शेतकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST

परळी : बीड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सादर केलेल्या २१ हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे. तरीही ...

परळी : बीड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सादर केलेल्या २१ हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे. तरीही बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत.

सन २०२० चा पीक विमा मंजूर करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवारी (दि. ३०) पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉ. अजय बुरांडे यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०२० च्या पीक विम्यापोटी ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा हप्ता भरलेला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल दिला होता. त्या अहवालामुळेच शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे अनुदान मिळालेले आहेत. बीड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सादर केलेल्या २१ हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे. तरीही हे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत.

सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा देण्यात यावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी, शर्तींचा फेरविचार करून शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळण्यास सुलभ करावी, या दोन मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येो मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. पी. एस. घाडगे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब, कॉ, बालासाहेब कडभाने, कॉ. काशीनाथ सिरसाट, कॉ. सुभाष डाके यांनी केले आहे.