शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रमाणपत्राअभावी खचतेय ‘मनोधैर्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:19 IST

शिरूर कासार तालुक्यातील बारगजवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरी अद्याप दोषारोपपत्र दाखल न झाल्याने मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत आहे. केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे त्रांगडे झाले आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यानंतरही दोषारोपपत्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : तालुक्यातील बारगजवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरी अद्याप दोषारोपपत्र दाखल न झाल्याने मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत आहे. केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे त्रांगडे झाले आहे.

बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल झाल्यानंतर पीडित कुटुंबियांनी संस्थेची मदत मागितल्याने ग्रामीण विकास केंद्रसंस्थेचे अध्यक्ष समीर पठाण यांनी या प्रकरणी शिरूर पोलिसांनी काय कारवाई केली ? या बाबत ९ नोव्हेंबर रोजी माहितीस्तव अहवाल मागितला होता. त्या नुसार शिरूर कासार पोलिसांनी दिलेल्या अहवालात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.

पीडित मुलीला तिच्या आई वडिलांनी ३० जुलै रोजी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. तेथील डॉक्टरांनी तिला अहमदनगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात रेफर केले. त्यानुसार तेथे अत्याचारा बाबतच्या सर्व तपासण्या व उपचार करण्यात आले आहेत.

परंतु, तेथील वैद्यकीय प्रमाणपत्र पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय आणि नगरच्या जिल्हा रुग्णालयाकडून मिळत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाथर्डी व अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ होत आहे.

जिल्हाधिका-यांकडे अहवाल सादरसमीर पठाण यांनी दखल घेत २४ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील निवासी जिल्हाधिका-यांना भेटून सदर पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. तिची कौटुंबिक परिस्थिती गरीबीची आहे. पीडितेवर अगोदरच मोठा आघात व अत्याचार झालेला असून, अहमदनगर आरोग्य विभागाकडून तिच्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ होत आहे. पीडित मुलीचे वैद्यकीय प्रमाणपत्र तात्काळ देण्याची तसेच अहमदनगर आरोग्य विभागातील कामचुकार अधिका-यांवर कारवाईची मागणी समीर पठाण यांनी केली आहे. या संदर्भात बीड व अहमदनगर येथील जिल्हाधिका-यांनाही समीर पठाण यांनी अहवाल सादर केला आहे.