शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वैद्यकीय प्रमाणपत्राअभावी खचतेय ‘मनोधैर्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:19 IST

शिरूर कासार तालुक्यातील बारगजवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरी अद्याप दोषारोपपत्र दाखल न झाल्याने मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत आहे. केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे त्रांगडे झाले आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यानंतरही दोषारोपपत्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : तालुक्यातील बारगजवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरी अद्याप दोषारोपपत्र दाखल न झाल्याने मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत आहे. केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे त्रांगडे झाले आहे.

बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल झाल्यानंतर पीडित कुटुंबियांनी संस्थेची मदत मागितल्याने ग्रामीण विकास केंद्रसंस्थेचे अध्यक्ष समीर पठाण यांनी या प्रकरणी शिरूर पोलिसांनी काय कारवाई केली ? या बाबत ९ नोव्हेंबर रोजी माहितीस्तव अहवाल मागितला होता. त्या नुसार शिरूर कासार पोलिसांनी दिलेल्या अहवालात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.

पीडित मुलीला तिच्या आई वडिलांनी ३० जुलै रोजी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. तेथील डॉक्टरांनी तिला अहमदनगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात रेफर केले. त्यानुसार तेथे अत्याचारा बाबतच्या सर्व तपासण्या व उपचार करण्यात आले आहेत.

परंतु, तेथील वैद्यकीय प्रमाणपत्र पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय आणि नगरच्या जिल्हा रुग्णालयाकडून मिळत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाथर्डी व अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ होत आहे.

जिल्हाधिका-यांकडे अहवाल सादरसमीर पठाण यांनी दखल घेत २४ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील निवासी जिल्हाधिका-यांना भेटून सदर पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. तिची कौटुंबिक परिस्थिती गरीबीची आहे. पीडितेवर अगोदरच मोठा आघात व अत्याचार झालेला असून, अहमदनगर आरोग्य विभागाकडून तिच्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ होत आहे. पीडित मुलीचे वैद्यकीय प्रमाणपत्र तात्काळ देण्याची तसेच अहमदनगर आरोग्य विभागातील कामचुकार अधिका-यांवर कारवाईची मागणी समीर पठाण यांनी केली आहे. या संदर्भात बीड व अहमदनगर येथील जिल्हाधिका-यांनाही समीर पठाण यांनी अहवाल सादर केला आहे.