शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जनावरांना लसीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST

रेल्वेच्या कामाला गती कडा : आष्टी तालुक्यातील खुंटफळ ते आष्टी दरम्यान बहुसंख्य ठिकाणी रेल्वे पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. ...

रेल्वेच्या कामाला गती

कडा : आष्टी तालुक्यातील खुंटफळ ते आष्टी दरम्यान बहुसंख्य ठिकाणी रेल्वे पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी किरकोळ भूसंपादनाचे काम रखडले आहे. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे काम सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी कामाला गती असल्याचे दिसून येत आहे.

....

जुन्या तलावांची गळती थांबवा

बीड : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाझर तलाव आहेत. या तलावात गाळ साठला आहे, तर अनेक तलावांच्या भिंतीचा काही भाग जुनाट झाला आहे. पावसाळ्यात अनेक तलावांना गळती लागते. तलाव पूर्ण भरला तरी दोन महिन्यांत तलावातील पाणी संपते. तरी जुन्या तलावांची दुरुस्तीची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

.....

पाऊस लांबल्याने पिके सुकू लागली

पाटोदा : तालुक्यातील धनगर जवळका परिसरात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु गेल्या दहा, बारा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

.......

म्हसोबावाडी फाट्यावर पेट्रोल पंपाची मागणी

धानोरा : कल्याण-नगर-बीड मार्गावरील म्हसोबावाडी दरम्यान पेट्रोल पंपाची मागणी होत आहे. धामणगाव येथे पंप आहे. परंतु, धानोरा-सावरगाव-पाथर्डी येथे जाण्यासाठी जवळपास पेट्रोल पंप नाही. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना पेट्रोल संपल्यानंतर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. यामुळे म्हसोबावाडी दरम्यान पेट्रोल पंप झाल्यास गैरसोय दूर होईल.

.......

पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

आष्टी : तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. १५ जुलै ही विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. यामुळे विमा भरण्यासाठी सातबारा, आठ अ साठी शेतकरी तलाठ्यांकडे विचारणा करीत आहेत.

.....

तलावांनी गाठला तळ

आष्टी : तालुक्यातील मेहेकरी, दादेगाव, भोजेवाडी, सावरगाव, उंदरखेल, धानोरा येथील तलावांनी तळ गाठला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तलावात यंदा उन्हाळ्यातही पाणीसाठा होता. यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. तरी आष्टी तालुक्यात मोठा पाऊस पडला नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तलावातील पाण्यानेही तळ गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

.......

साईडपट्ट्यांची साफसफाई करण्याची मागणी

बीड : जिल्ह्यातील जवळपास सर्वच महामार्गावर साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. गावांजवळ, तर साईडपट्ट्यावर अतिक्रमण झाले आहे, तर इतर ठिकाणी मात्र पावसाने गवत उगवल्याने त्या दिसत नाहीत. तरी या साईडपट्ट्यावरील गवत जेसीबीने काढावे. जेणेकरून वाहतुकीस अडथळा येणार नाही.