शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांना लसीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST

रेल्वेच्या कामाला गती कडा : आष्टी तालुक्यातील खुंटफळ ते आष्टी दरम्यान बहुसंख्य ठिकाणी रेल्वे पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. ...

रेल्वेच्या कामाला गती

कडा : आष्टी तालुक्यातील खुंटफळ ते आष्टी दरम्यान बहुसंख्य ठिकाणी रेल्वे पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी किरकोळ भूसंपादनाचे काम रखडले आहे. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे काम सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी कामाला गती असल्याचे दिसून येत आहे.

....

जुन्या तलावांची गळती थांबवा

बीड : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाझर तलाव आहेत. या तलावात गाळ साठला आहे, तर अनेक तलावांच्या भिंतीचा काही भाग जुनाट झाला आहे. पावसाळ्यात अनेक तलावांना गळती लागते. तलाव पूर्ण भरला तरी दोन महिन्यांत तलावातील पाणी संपते. तरी जुन्या तलावांची दुरुस्तीची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

.....

पाऊस लांबल्याने पिके सुकू लागली

पाटोदा : तालुक्यातील धनगर जवळका परिसरात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु गेल्या दहा, बारा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

.......

म्हसोबावाडी फाट्यावर पेट्रोल पंपाची मागणी

धानोरा : कल्याण-नगर-बीड मार्गावरील म्हसोबावाडी दरम्यान पेट्रोल पंपाची मागणी होत आहे. धामणगाव येथे पंप आहे. परंतु, धानोरा-सावरगाव-पाथर्डी येथे जाण्यासाठी जवळपास पेट्रोल पंप नाही. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना पेट्रोल संपल्यानंतर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. यामुळे म्हसोबावाडी दरम्यान पेट्रोल पंप झाल्यास गैरसोय दूर होईल.

.......

पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

आष्टी : तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. १५ जुलै ही विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. यामुळे विमा भरण्यासाठी सातबारा, आठ अ साठी शेतकरी तलाठ्यांकडे विचारणा करीत आहेत.

.....

तलावांनी गाठला तळ

आष्टी : तालुक्यातील मेहेकरी, दादेगाव, भोजेवाडी, सावरगाव, उंदरखेल, धानोरा येथील तलावांनी तळ गाठला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तलावात यंदा उन्हाळ्यातही पाणीसाठा होता. यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. तरी आष्टी तालुक्यात मोठा पाऊस पडला नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तलावातील पाण्यानेही तळ गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

.......

साईडपट्ट्यांची साफसफाई करण्याची मागणी

बीड : जिल्ह्यातील जवळपास सर्वच महामार्गावर साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. गावांजवळ, तर साईडपट्ट्यावर अतिक्रमण झाले आहे, तर इतर ठिकाणी मात्र पावसाने गवत उगवल्याने त्या दिसत नाहीत. तरी या साईडपट्ट्यावरील गवत जेसीबीने काढावे. जेणेकरून वाहतुकीस अडथळा येणार नाही.