शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खरीप पेरणीसाठी अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : राज्यातील शेतकरी कोरोनामुळे पूर्णतः आर्थिकदृष्ट्या खचून गेलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना राबविली; ...

अंबाजोगाई : राज्यातील शेतकरी कोरोनामुळे पूर्णतः आर्थिकदृष्ट्या खचून गेलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना राबविली; पण चालू बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान अजूनही दिलेले नाही. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत होईल, यासाठी प्रोत्साहनपर तत्काळ द्या, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख सुनील जगताप यांनी केली आहे.

-----------------------------

चिखलातून वाहने चालविताना कसरत

अंबाजोगाई : हा रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. या रस्त्यावर शनिमंदिरासमोरच मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून, या ठिकाणाहून वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर पाणी आणि चिखल झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. नगरपालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

-----------------------------

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

अंबाजोगाई : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा फळ व भाजी विक्रेत्यांकडून सर्रास वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ही मोहीम बंद असल्याने दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत.

-----------------------

ग्रामीण भागासाठी बससेवा सुरू करा

अंबाजोगाई : शहरी भागातील मोठ्या गावांसाठी एस. टी. बससेवा सुरू झाली असून, ग्रामीण भागातील बससेवा कधी सुरू होईल, असा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवाशांनी उपस्थित केला आहे. बससेवा सुरू नसल्याने ग्रामीण प्रवाशांना अद्यापही खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या कमी होते. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी केली आहे.

-------------------------------

विधवा महिलांना योजनांचा लाभ द्या

अंबाजोगाई : कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ देण्याची मागणी येथील सामाजिक संघटनांनी केली आहे.

---------------------------

वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

अंबाजोगाई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात येत्या १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे वसतिगृह अधीक्षकांचे मानधन १० हजार रुपये, स्वयंपाक्यांचे मानधन आठ हजार रुपये, मदतनीस आणि चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये होणार आहे.