शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पेरणीसाठी अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : राज्यातील शेतकरी कोरोनामुळे पूर्णतः आर्थिकदृष्ट्या खचून गेलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना राबविली; ...

अंबाजोगाई : राज्यातील शेतकरी कोरोनामुळे पूर्णतः आर्थिकदृष्ट्या खचून गेलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना राबविली; पण चालू बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान अजूनही दिलेले नाही. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत होईल, यासाठी प्रोत्साहनपर तत्काळ द्या, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख सुनील जगताप यांनी केली आहे.

-----------------------------

चिखलातून वाहने चालविताना कसरत

अंबाजोगाई : हा रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. या रस्त्यावर शनिमंदिरासमोरच मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून, या ठिकाणाहून वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर पाणी आणि चिखल झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. नगरपालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

-----------------------------

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

अंबाजोगाई : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा फळ व भाजी विक्रेत्यांकडून सर्रास वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ही मोहीम बंद असल्याने दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत.

-----------------------

ग्रामीण भागासाठी बससेवा सुरू करा

अंबाजोगाई : शहरी भागातील मोठ्या गावांसाठी एस. टी. बससेवा सुरू झाली असून, ग्रामीण भागातील बससेवा कधी सुरू होईल, असा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवाशांनी उपस्थित केला आहे. बससेवा सुरू नसल्याने ग्रामीण प्रवाशांना अद्यापही खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या कमी होते. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी केली आहे.

-------------------------------

विधवा महिलांना योजनांचा लाभ द्या

अंबाजोगाई : कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ देण्याची मागणी येथील सामाजिक संघटनांनी केली आहे.

---------------------------

वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

अंबाजोगाई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात येत्या १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे वसतिगृह अधीक्षकांचे मानधन १० हजार रुपये, स्वयंपाक्यांचे मानधन आठ हजार रुपये, मदतनीस आणि चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये होणार आहे.