शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

खरीप पेरणीसाठी अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST

अंबाजोगाई : राज्यातील शेतकरी कोरोनामुळे पूर्णतः आर्थिकदृष्ट्या खचून गेलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना राबविली; ...

अंबाजोगाई : राज्यातील शेतकरी कोरोनामुळे पूर्णतः आर्थिकदृष्ट्या खचून गेलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना राबविली; पण चालू बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान अजूनही दिलेले नाही. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत होईल, यासाठी प्रोत्साहनपर तत्काळ द्या, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख सुनील जगताप यांनी केली आहे.

-----------------------------

चिखलातून वाहने चालविताना कसरत

अंबाजोगाई : हा रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. या रस्त्यावर शनिमंदिरासमोरच मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून, या ठिकाणाहून वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर पाणी आणि चिखल झाल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. नगरपालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

-----------------------------

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला

अंबाजोगाई : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा फळ व भाजी विक्रेत्यांकडून सर्रास वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली होती. मात्र, गेल्या दीड वर्षापासून ही मोहीम बंद असल्याने दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत आहेत.

-----------------------

ग्रामीण भागासाठी बससेवा सुरू करा

अंबाजोगाई : शहरी भागातील मोठ्या गावांसाठी एस. टी. बससेवा सुरू झाली असून, ग्रामीण भागातील बससेवा कधी सुरू होईल, असा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवाशांनी उपस्थित केला आहे. बससेवा सुरू नसल्याने ग्रामीण प्रवाशांना अद्यापही खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या कमी होते. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी केली आहे.

-------------------------------

विधवा महिलांना योजनांचा लाभ द्या

अंबाजोगाई : कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ देण्याची मागणी येथील सामाजिक संघटनांनी केली आहे.

---------------------------

वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

अंबाजोगाई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात येत्या १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे वसतिगृह अधीक्षकांचे मानधन १० हजार रुपये, स्वयंपाक्यांचे मानधन आठ हजार रुपये, मदतनीस आणि चौकीदारांचे मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये होणार आहे.