शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाईसाठी ५१४ कोटी ८० लक्ष रुपयांची मागणी; बीड जिल्हाधिकाऱ्यांचा राज्यशासनास प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:23 IST

जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले

बीड : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे जिल्ह्यातील सात लाख 56 हजार 926 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. याच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडे 514 कोटी 80 लक्ष 54 हजार रुपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे.

जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले होते यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश गाव पातळीवरील यंत्रणांना दिले होते या अनुषंगाने प्राप्त झालेली माहिती एकत्रित करून  जिल्ह्यातील बाधित क्षेत्र, शेतकऱ्यांची संख्या आणि नुकसान भरपाई देण्यासाठी अपेक्षित निधी यांची तालुकानिहाय माहिती यासोबत सादर करण्यात आली आहे .

जिल्ह्यातील 8 लाख 24 हजार 759 शेतकऱ्यांची या अतिवृष्टीचा फटका बसला असून पेरणी झालेल्या 7 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत पीक हातातून गेले आहे. यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन , कापूस , मका , बाजरी, ज्वारी, तूर, मूग, द्राक्ष , पपई ह्यासह विविध अशी माहिती यासह सादर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी महसूल, कृषी व ग्रामविकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कमीत कमी वेळात पंचनामे करून अहवाल सादर केले आहेत.

असे आहे तालुकानिहाय नुकसानगेवराई तालुक्यातील 1 लाख 36 हजार 521 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 128510 शेतकऱ्यां साठी 79 कोटी 77 लक्ष 55 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. बीड तालुक्यातील 1 लाख 34 हजार 032 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 130918 शेतकऱ्यां साठी 84 कोटी 76 लक्ष 20 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. केज तालुक्यातील 1 लाख 05 हजार 216 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 101018शेतकऱ्यां साठी 67 कोटी 31 लक्ष 25 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. आष्टी तालुक्यातील 1 लाख 23 हजार 200 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 74545 शेतकऱ्यांसाठी 38कोटी 18 लक्ष 80 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. माजलगाव तालुक्यातील 76 हजार 490 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 69066 शेतकऱ्यां साठी 46 कोटी 26 लक्ष 65 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. अंबाजोगाई तालुक्यातील 77 हजार 935 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 68248 शेतकऱ्यां साठी 47कोटी 56 लक्ष 39 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे.

पाटोदा तालुक्यातील 66 हजार 454 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 57162 शेतकऱ्यां साठी 33कोटी 39 लक्ष 95 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. परळी तालुक्यातील 61हजार 101 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 68248 शेतकऱ्यां साठी 38कोटी 28लक्ष 33हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. शिरूर कासार तालुक्यातील 54 हजार 576 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 57313 शेतकऱ्यां साठी 38 कोटी 18 लक्ष 88 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. धारूर तालुक्यातील46 हजार 802 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 45769 शेतकऱ्यां साठी 27 कोटी 39 लक्ष 24 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे. वडवणी तालुक्यातील 33हजार 571 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झालेल्या 32331शेतकऱ्यां साठी 19 कोटी 42 लक्ष 21 हजार रुपये नुकसान भरपाई निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडFarmerशेतकरीagricultureशेती