शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

शीवरस्ता दुरूस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अंबाजोगाई : यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. झालेल्या पावसाने अजूनही ...

ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

अंबाजोगाई : यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. झालेल्या पावसाने अजूनही नदीचे पाणी वाहत आहे. परिसरातील छोटे-मोठे तलाव तुडुंब भरले आहेत. विहिरी, इंधन विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. एकंदरीत सर्वत्र पाणीसाठा उपलब्ध झाल्याने परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सध्या शेतकरी नगदी पीक म्हणून उसाला प्राधान्य देत असल्याने या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

भारनियमन बंद करा

अंबाजोगाई : ग्रामीण भागात करण्यात येणारे भारनियमन बंद करावे. यावर्षी रबी हंगाम चांगल्या प्रमाणात येत आहे. पाण्याची उपलब्धता आहे. मात्र, वीज पुरवठा ठप्प राहतो. तर भारनियमनाचा कालावधी मोठ्या प्रमाणात असल्याने उपलब्ध असूनही पिकांना पाणी देता येत नाही. शासनाने भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी केली आहे.

महामार्गावर रिफ्लेक्टर बसवावेत

अंबाजोगाई -: अंबासाखर ते लातूर या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यासाठी या रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवावेत व आवश्यक तिथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केली आहे.

वन्य प्राण्यांचा उपद्रव

अंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यात डोंगराळ भागात हरिण, रानडुक्कर, लांडगा या प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रामुख्याने रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रानडुकरांकडून पिकांचे नुकसान होत आहे. या वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. या प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात

अंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यात सध्या कापसाची वेचणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अतिवृष्टीनंतर दिवाळीच्या हंगामात कापूस मोठ्या प्रमाणात बहरला. मोठ्या प्रमाणात कापूस बहरल्याने सर्वांची वेचणी एकदाच सुरू झाली. प्रत्येकजण आपआपल्या शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याने मोठ्या शेतकऱ्यांना शेतात कापूस वेचण्यासाठी मजूर उपलब्ध होईनात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

बसस्थानकात गर्दी वाढली

अंबाजोगाई -: बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही वाढला आहे. बसस्थानकात दिवाळीनंतर आपआपल्या गावी जाण्यासाठी पाहुण्यांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी होत असली तरी बसस्थानकात सामाजिक अंतर, मास्कचा वापर याबाबत कसलीही दक्षता बाळगण्यात येत नाही. मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा सुरूच आहे. ही वाढती गर्दी कोरोनासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.