शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शीवरस्ता दुरूस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अंबाजोगाई : यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. झालेल्या पावसाने अजूनही ...

ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

अंबाजोगाई : यावर्षी अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. झालेल्या पावसाने अजूनही नदीचे पाणी वाहत आहे. परिसरातील छोटे-मोठे तलाव तुडुंब भरले आहेत. विहिरी, इंधन विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. एकंदरीत सर्वत्र पाणीसाठा उपलब्ध झाल्याने परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सध्या शेतकरी नगदी पीक म्हणून उसाला प्राधान्य देत असल्याने या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

भारनियमन बंद करा

अंबाजोगाई : ग्रामीण भागात करण्यात येणारे भारनियमन बंद करावे. यावर्षी रबी हंगाम चांगल्या प्रमाणात येत आहे. पाण्याची उपलब्धता आहे. मात्र, वीज पुरवठा ठप्प राहतो. तर भारनियमनाचा कालावधी मोठ्या प्रमाणात असल्याने उपलब्ध असूनही पिकांना पाणी देता येत नाही. शासनाने भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी केली आहे.

महामार्गावर रिफ्लेक्टर बसवावेत

अंबाजोगाई -: अंबासाखर ते लातूर या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यासाठी या रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवावेत व आवश्यक तिथे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केली आहे.

वन्य प्राण्यांचा उपद्रव

अंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यात डोंगराळ भागात हरिण, रानडुक्कर, लांडगा या प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रामुख्याने रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रानडुकरांकडून पिकांचे नुकसान होत आहे. या वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. या प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे मोठ्या जिकिरीचे काम झाले आहे. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात

अंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यात सध्या कापसाची वेचणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अतिवृष्टीनंतर दिवाळीच्या हंगामात कापूस मोठ्या प्रमाणात बहरला. मोठ्या प्रमाणात कापूस बहरल्याने सर्वांची वेचणी एकदाच सुरू झाली. प्रत्येकजण आपआपल्या शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याने मोठ्या शेतकऱ्यांना शेतात कापूस वेचण्यासाठी मजूर उपलब्ध होईनात, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

बसस्थानकात गर्दी वाढली

अंबाजोगाई -: बसस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही वाढला आहे. बसस्थानकात दिवाळीनंतर आपआपल्या गावी जाण्यासाठी पाहुण्यांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी होत असली तरी बसस्थानकात सामाजिक अंतर, मास्कचा वापर याबाबत कसलीही दक्षता बाळगण्यात येत नाही. मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा सुरूच आहे. ही वाढती गर्दी कोरोनासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.