शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पीक विम्याचे निकष बदलण्याची मागणी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : तालुक्यात गतवर्षीपासून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खरीप हंगामातील पिकांचा विमा भरणा करतात. परंतु, पीकविमा कंपन्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : तालुक्यात गतवर्षीपासून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खरीप हंगामातील पिकांचा विमा भरणा करतात. परंतु, पीकविमा कंपन्यांनी आपले निकष बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी विम्यापासून वंचित राहिले. कंपनीच्या धाेरणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्यामुळे शासन व कंपनीने पीक विम्याचे निकष बदलण्याची मागणी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष परमेश्वर तिडके यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे .

धारुर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराळ क्षेत्र आहे. या क्षेत्रातील जमीन ही मुरमाड व बरड्या स्वरूपाची आहे. येथील शेतकरी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, बाजरी, हायब्रीड ज्वारी, तूर, आदी पिके घेतात. ही पिके बहुतांश पावसावर अवलंबून आहेत. यामुळे पिकास संरक्षण म्हणून दरवर्षी शेतकरी विमा कंपनीकडे पैसे भरतात. परंतु, गतवर्षी विमा कंपन्यांनी पीक विम्याचे निकष बदललेले आहेत. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो काढून ७२ तासांच्या आत फोटो अपलोड करणे बंधनकारक केले आहे. यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गतवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्यामुळे त्यांना फोटो अपलोड करता आले नाहीत. तर काही शेतकऱ्यांकडे मोबाईल असूनही त्यांना हे फोटो कसे अपलोड करायचे याची माहिती नाही, तसेच धारूर तालुका डोंगराळ परिसर असल्यामुळे अनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्यामुळे या ठिकाणाहून नुकसानीचे फोटो अपलोड करता येत नाहीत. यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कंपनीने सध्याचे निकष बदलून पूर्वीप्रमाणेच मंडलाधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी प्रशासनासह पालकमंत्री व लोकप्रतिनिधींकडे निवेदनाद्वारे केली आहे.

== धारूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी खरिपाचा पीक विमा भरतात. बहुतांश शेतकऱ्यांकडे अँड्राॅराईड मोबाईल नाहीत, तर काहीजणांकडे असूनही अज्ञानपणा व तांत्रिक अडचणींमुळे नुकसानीचे फोटो अपलोड करता येत नाहीत. या वर्षी शासनाने पूर्वीप्रमाणेच पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ द्यावा. - परमेश्वर तिडके, अध्यक्ष राष्ट्रवादी किसान सेल धारूर