शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

वसंतराव नाईक तांडा योजनेचे अध्यक्षपद देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बंजारा समाजाला डावलून अन्याय केला आहे. बंजारा समाजावर झालेला अन्याय दूर ...

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बंजारा समाजाला डावलून अन्याय केला आहे. बंजारा समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या अध्यक्षपदाची निवड तत्काळ करून बंजारा समाजाला या योजनेचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी गोर सेना प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार केला जातो. भटक्या असलेल्या समाजाला सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी समस्येची जाणीव असलेल्या प्रतिनिधीला जिल्हा नियोजन समिती प्रतिनिधित्व देणे आवश्यक होते. मात्र नुकत्याच जिल्हा नियोजन समिती निवडण्यात आली परंतु बंजारा समाजाच्या एकाही व्यक्तीला स्थान देण्यात आलेले नाही. बीड जिल्ह्यात बंजारा समाजाचे निर्णायक मतदान आहे. निवडणुकीच्या दरम्यान ओबीसीच्या नावाखाली बंजारा समाजाला सतत खोटी आश्वासने देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने महाराष्ट्रात निर्णायक मतदान केले आहे. असे असताना राज्याच्या मंत्री मंडळात एकही बंजारा समाजाचा मंत्री नाही. त्यामुळे बंजारा समाजाची सत्ताधाऱ्याविरोधात नाराजी वाढत आहे.

बीड जिल्ह्यातही पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सत्ताधारी आमदारांना विजयी करण्यात बंजारा समाजाने सिंहाचा वाटा उचलला आहे. जिल्हा नियोजन समितीत एकाही बंजारा समाजाला स्थान देण्यात आलेले नाही. बंजारा समाजावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या अध्यक्षांची निवड तत्काळ करावी व बंजारा समाजाला या समितीचे अध्यक्षपद द्यावे जेणेकरून बंजारा समाजाला न्याय मिळेल, अशी मागणी संपत चव्हाण यांनी केली आहे.