शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

दीर, जाऊकडून विवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

माजलगाव : तालुक्यातील राजेगाव जवळील होना नाईक तांडा येथे एका विवाहितेला बळजबरीने विषारी द्रव पाजून खून केल्याची घटना ...

माजलगाव : तालुक्यातील राजेगाव जवळील होना नाईक तांडा येथे एका विवाहितेला बळजबरीने विषारी द्रव पाजून खून केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. दरम्यान, ३० तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. माहेरच्या मंडळींनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दीर, जाऊ यांचा आरोपींत समावेश असून रेशन दुकानाच्या मालकी हक्कावरून ही घटना घडल्याचे समोर आले.

मीना संतोष राठोड ( २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. होना नाईक तांडा येथे ती कुटुंबासमवेत राहायची. राठोड कुटुंबीयाकडे रेशन दुकान आहे. भाऊ वेगवेगळे झाले. त्यानंतर एसटी महामंडळात वाहक असलेल्या विलास प्रभाकर राठोड याने दुकान आठ वर्षांपूर्वी भाऊ संतोष याच्याकडे सोपविले. मात्र, मागील तीन वर्षांपासून विलास दुकान परत मागत होता. संतोष व त्याची पत्नी मीना यांचा यास विरोध होता. या कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विलास प्रभाकर राठोड, कविता विलास राठोड, बाळू शंकर पवार व पारूबाई प्रभाकर राठोड (सर्व रा. होना नाईक तांडा, राजेगाव) यांनी रेशन दुकानासाठी अडसर ठरत असलेल्या मीनासोबत वाद उकरून काढला. कविता राठोडने मीनाचे केस पकडले तर बाळू पवारने दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले. यावेळी पारूबाईने तिचे तोंड उघडले व विलास राठोडने बळजबरीने विषारी द्रव पाजले. यातच ती मृत्युमुखी पडली, अशी फिर्याद मृत मीनाचे वडील पंडित थावरा जाधव (रा. पेरुनाईक तांडा राजेगाव) यांनी दिली. त्यावरून ग्रामीण ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

....

३० तासांनंतर शवविच्छेदन

१० रोजी विष पाजल्यानंतर मीनाला तातडीने दवाखान्यात नेले नाही. रात्री उशिरा तिला तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी ती मृत झाली असल्याचे घोषित केले.

मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी पलायन केले. त्यामुळे माहेरच्यांना संशय आला. खुनाचा गुन्हा नोंदविण्यासाठी त्यांनी ग्रामीण ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर ३० तासांनी गुन्हा नोंदविल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.

....

पोलिसांची हलगर्जी, आरोपींचे पलायन

या प्रकरणात माजलगाव ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. घटनास्थळीही पोलीस उशिराने पोहोचले. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी माहेरच्या मंडळींनाच पोलिसांनी सुनावले. त्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. या सगळ्यात ३० तास उलटले. या दरम्यान चारही आरोपींनी पोबारा केला. पोलिसांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळले असते तर ३० तास शवविच्छेदन रखडले नसते व आरोपींनाही बेड्या पडल्या असत्या.

...

----------

110921\11bed_23_11092021_14.jpg

ठिय्या