शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

दीर, जाऊकडून विवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

माजलगाव : तालुक्यातील राजेगाव जवळील होना नाईक तांडा येथे एका विवाहितेला बळजबरीने विषारी द्रव पाजून खून केल्याची घटना ...

माजलगाव : तालुक्यातील राजेगाव जवळील होना नाईक तांडा येथे एका विवाहितेला बळजबरीने विषारी द्रव पाजून खून केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. दरम्यान, ३० तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. माहेरच्या मंडळींनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दीर, जाऊ यांचा आरोपींत समावेश असून रेशन दुकानाच्या मालकी हक्कावरून ही घटना घडल्याचे समोर आले.

मीना संतोष राठोड ( २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. होना नाईक तांडा येथे ती कुटुंबासमवेत राहायची. राठोड कुटुंबीयाकडे रेशन दुकान आहे. भाऊ वेगवेगळे झाले. त्यानंतर एसटी महामंडळात वाहक असलेल्या विलास प्रभाकर राठोड याने दुकान आठ वर्षांपूर्वी भाऊ संतोष याच्याकडे सोपविले. मात्र, मागील तीन वर्षांपासून विलास दुकान परत मागत होता. संतोष व त्याची पत्नी मीना यांचा यास विरोध होता. या कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विलास प्रभाकर राठोड, कविता विलास राठोड, बाळू शंकर पवार व पारूबाई प्रभाकर राठोड (सर्व रा. होना नाईक तांडा, राजेगाव) यांनी रेशन दुकानासाठी अडसर ठरत असलेल्या मीनासोबत वाद उकरून काढला. कविता राठोडने मीनाचे केस पकडले तर बाळू पवारने दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले. यावेळी पारूबाईने तिचे तोंड उघडले व विलास राठोडने बळजबरीने विषारी द्रव पाजले. यातच ती मृत्युमुखी पडली, अशी फिर्याद मृत मीनाचे वडील पंडित थावरा जाधव (रा. पेरुनाईक तांडा राजेगाव) यांनी दिली. त्यावरून ग्रामीण ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

....

३० तासांनंतर शवविच्छेदन

१० रोजी विष पाजल्यानंतर मीनाला तातडीने दवाखान्यात नेले नाही. रात्री उशिरा तिला तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी ती मृत झाली असल्याचे घोषित केले.

मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी पलायन केले. त्यामुळे माहेरच्यांना संशय आला. खुनाचा गुन्हा नोंदविण्यासाठी त्यांनी ग्रामीण ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर ३० तासांनी गुन्हा नोंदविल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.

....

पोलिसांची हलगर्जी, आरोपींचे पलायन

या प्रकरणात माजलगाव ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. घटनास्थळीही पोलीस उशिराने पोहोचले. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी माहेरच्या मंडळींनाच पोलिसांनी सुनावले. त्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. या सगळ्यात ३० तास उलटले. या दरम्यान चारही आरोपींनी पोबारा केला. पोलिसांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळले असते तर ३० तास शवविच्छेदन रखडले नसते व आरोपींनाही बेड्या पडल्या असत्या.

...

----------

110921\11bed_23_11092021_14.jpg

ठिय्या