शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दीर, जाऊकडून विवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

माजलगाव : तालुक्यातील राजेगाव जवळील होना नाईक तांडा येथे एका विवाहितेला बळजबरीने विषारी द्रव पाजून खून केल्याची घटना ...

माजलगाव : तालुक्यातील राजेगाव जवळील होना नाईक तांडा येथे एका विवाहितेला बळजबरीने विषारी द्रव पाजून खून केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. दरम्यान, ३० तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. माहेरच्या मंडळींनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दीर, जाऊ यांचा आरोपींत समावेश असून रेशन दुकानाच्या मालकी हक्कावरून ही घटना घडल्याचे समोर आले.

मीना संतोष राठोड ( २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. होना नाईक तांडा येथे ती कुटुंबासमवेत राहायची. राठोड कुटुंबीयाकडे रेशन दुकान आहे. भाऊ वेगवेगळे झाले. त्यानंतर एसटी महामंडळात वाहक असलेल्या विलास प्रभाकर राठोड याने दुकान आठ वर्षांपूर्वी भाऊ संतोष याच्याकडे सोपविले. मात्र, मागील तीन वर्षांपासून विलास दुकान परत मागत होता. संतोष व त्याची पत्नी मीना यांचा यास विरोध होता. या कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत. दरम्यान, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विलास प्रभाकर राठोड, कविता विलास राठोड, बाळू शंकर पवार व पारूबाई प्रभाकर राठोड (सर्व रा. होना नाईक तांडा, राजेगाव) यांनी रेशन दुकानासाठी अडसर ठरत असलेल्या मीनासोबत वाद उकरून काढला. कविता राठोडने मीनाचे केस पकडले तर बाळू पवारने दोन्ही हात घट्ट पकडून ठेवले. यावेळी पारूबाईने तिचे तोंड उघडले व विलास राठोडने बळजबरीने विषारी द्रव पाजले. यातच ती मृत्युमुखी पडली, अशी फिर्याद मृत मीनाचे वडील पंडित थावरा जाधव (रा. पेरुनाईक तांडा राजेगाव) यांनी दिली. त्यावरून ग्रामीण ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

....

३० तासांनंतर शवविच्छेदन

१० रोजी विष पाजल्यानंतर मीनाला तातडीने दवाखान्यात नेले नाही. रात्री उशिरा तिला तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी ती मृत झाली असल्याचे घोषित केले.

मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी पलायन केले. त्यामुळे माहेरच्यांना संशय आला. खुनाचा गुन्हा नोंदविण्यासाठी त्यांनी ग्रामीण ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर ३० तासांनी गुन्हा नोंदविल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.

....

पोलिसांची हलगर्जी, आरोपींचे पलायन

या प्रकरणात माजलगाव ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. घटनास्थळीही पोलीस उशिराने पोहोचले. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी माहेरच्या मंडळींनाच पोलिसांनी सुनावले. त्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. या सगळ्यात ३० तास उलटले. या दरम्यान चारही आरोपींनी पोबारा केला. पोलिसांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळले असते तर ३० तास शवविच्छेदन रखडले नसते व आरोपींनाही बेड्या पडल्या असत्या.

...

----------

110921\11bed_23_11092021_14.jpg

ठिय्या