शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच ‘त्या’ मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:11 IST

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांचा आरोप : प्रकरण दडपण्यासाठी मध्यरात्री १ वाजता केले शवविच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हे प्रकरण दडपविण्यासाठी नातेवाईकांच्या इच्छेविरोधात दबावतंत्र वापरुन मध्यरात्री १ वाजताच मीरा यांचे शवविच्छेदन केले. डॉक्टरांच्या सर्व हालचालीवरून या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथील रहिवासी असलेले रामेश्वर भगवानअप्पा एखंडे हे गेल्या २५ वर्षांपासून माजलगाव येथे स्थायिक आहेत. हलाखीची परिस्थिती असल्याने पानटपरीच्या व्यवसायातून ते उपजीविका भागवतात. त्यांचे २० वर्षांपूर्वी परळी येथील मीरा यांच्याशी विवाह झाला. आतापर्यंत त्यांना ७ मुली झाल्या. कमी शिक्षण व अज्ञान असल्याने त्यांना वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा होता. आजपर्यंत मीरा यांची जवळपास ७ वेळा प्रसुती झाली. विशेष म्हणजे एकही सीझर झाले नाही. त्या आठव्यांदा गर्भवती राहिल्या. प्रसुतीसाठी त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता तुम्हाला वेळ आहे, तुम्ही थांबा...असे सांगितले. त्यानुसार मीरा या आपल्या नातेवाईकासह तेथेच थांबल्या. याचदरम्यान त्यांना कळा सुरू झाल्या. डॉक्टरांना सांगितल्यानंतरही तब्बल सहा तास याकडे कोणीच लक्ष दिले नाही. याचवेळी त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर यंत्रणा हलली आणि मीरा यांना प्रसुतीगृहात घेतले. अतिरक्तस्त्राव झाल्याने सदरील बाळ गर्भातच दगावले. त्यानंतर मीरा यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ डॉक्टरांनी वेळेवर तपासणी आणि उपचार केले नाहीत, म्हणूनच मृत्यू झाल्याचा आरोप मीरा यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ्रसदर बाळाचे पावणेचार किलो वजन असल्यामुळे सिझेरियन आवश्यक होते. मात्र, डॉक्टरांनी निर्णय घेण्यात वेळ घातला आणि सिझरेयिन करण्याचे टाळले. ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियेयासाठी आवश्यक सामुग्री नसल्यामुळे डॉक्टरांनी टाळल्याचे समोर येत आहे.डॉक्टरांकडून नातेवाईकांची दिशाभूल४प्रसुतीदरम्यान मृत्यू झालेल्या मीरा यांची प्रसुतीची आठवी वेळ असल्याने त्यांच्या गर्भशयाची पिशवी कमजोर झाल्याने असा प्रकार झाला आहे. ‘एवढे लेकरं होवू द्यायची काय गरज’ असे सांगून सिझेरियन केले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे म्हणत डॉक्टरांनी नातेवाईकांची दिशाभूल केल्याचे सांगण्यात येते.आईला पाहूनमुलींचा हंबरडा४सकाळी आपली आई किती चांगली होती. आम्हा सर्वांना बोलून गेली. रात्री आपल्या आईचा मृतदेहच पाहण्याची वेळ या अभागी सात बहिणींना आल्याने त्यांनी आई...आई...म्हणत हंबरडा फोडला. यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या दुर्दैवी घटनेने मन हेलावून गेले होते.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल