शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच ‘त्या’ मातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:11 IST

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांचा आरोप : प्रकरण दडपण्यासाठी मध्यरात्री १ वाजता केले शवविच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हे प्रकरण दडपविण्यासाठी नातेवाईकांच्या इच्छेविरोधात दबावतंत्र वापरुन मध्यरात्री १ वाजताच मीरा यांचे शवविच्छेदन केले. डॉक्टरांच्या सर्व हालचालीवरून या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.पाथरी तालुक्यातील अंधापुरी येथील रहिवासी असलेले रामेश्वर भगवानअप्पा एखंडे हे गेल्या २५ वर्षांपासून माजलगाव येथे स्थायिक आहेत. हलाखीची परिस्थिती असल्याने पानटपरीच्या व्यवसायातून ते उपजीविका भागवतात. त्यांचे २० वर्षांपूर्वी परळी येथील मीरा यांच्याशी विवाह झाला. आतापर्यंत त्यांना ७ मुली झाल्या. कमी शिक्षण व अज्ञान असल्याने त्यांना वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा होता. आजपर्यंत मीरा यांची जवळपास ७ वेळा प्रसुती झाली. विशेष म्हणजे एकही सीझर झाले नाही. त्या आठव्यांदा गर्भवती राहिल्या. प्रसुतीसाठी त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता तुम्हाला वेळ आहे, तुम्ही थांबा...असे सांगितले. त्यानुसार मीरा या आपल्या नातेवाईकासह तेथेच थांबल्या. याचदरम्यान त्यांना कळा सुरू झाल्या. डॉक्टरांना सांगितल्यानंतरही तब्बल सहा तास याकडे कोणीच लक्ष दिले नाही. याचवेळी त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर यंत्रणा हलली आणि मीरा यांना प्रसुतीगृहात घेतले. अतिरक्तस्त्राव झाल्याने सदरील बाळ गर्भातच दगावले. त्यानंतर मीरा यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ डॉक्टरांनी वेळेवर तपासणी आणि उपचार केले नाहीत, म्हणूनच मृत्यू झाल्याचा आरोप मीरा यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ्रसदर बाळाचे पावणेचार किलो वजन असल्यामुळे सिझेरियन आवश्यक होते. मात्र, डॉक्टरांनी निर्णय घेण्यात वेळ घातला आणि सिझरेयिन करण्याचे टाळले. ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियेयासाठी आवश्यक सामुग्री नसल्यामुळे डॉक्टरांनी टाळल्याचे समोर येत आहे.डॉक्टरांकडून नातेवाईकांची दिशाभूल४प्रसुतीदरम्यान मृत्यू झालेल्या मीरा यांची प्रसुतीची आठवी वेळ असल्याने त्यांच्या गर्भशयाची पिशवी कमजोर झाल्याने असा प्रकार झाला आहे. ‘एवढे लेकरं होवू द्यायची काय गरज’ असे सांगून सिझेरियन केले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे म्हणत डॉक्टरांनी नातेवाईकांची दिशाभूल केल्याचे सांगण्यात येते.आईला पाहूनमुलींचा हंबरडा४सकाळी आपली आई किती चांगली होती. आम्हा सर्वांना बोलून गेली. रात्री आपल्या आईचा मृतदेहच पाहण्याची वेळ या अभागी सात बहिणींना आल्याने त्यांनी आई...आई...म्हणत हंबरडा फोडला. यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या दुर्दैवी घटनेने मन हेलावून गेले होते.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल