शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; जात पंचायतकडून सात पिढ्या समाजातून बहिष्कृत

By सोमनाथ खताळ | Updated: September 27, 2024 11:44 IST

अडीच लाखांचा दंड न भरल्याने पंचांनी दिला आदेश, नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड : सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना तेव्हा अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसेच पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू, अशा धमक्याही दिल्या. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. अखेर नऊ जणांविरोधात आष्टी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतचा मुद्दा समोर आला आहे.

मालन शिवाजी फुलमाळी (वय ३२, रा. कडा कारखाना, ता. आष्टी) यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. तेव्हा जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना २ लााख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. परंतु, अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी शिवाजी पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्या मार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती. त्याप्रमाणे त्या पती शिवाजी, मुलांसह तेथे पोहचल्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे ८०० ते ९०० लोक अगोदरच जमलेले होते. त्यादिवशी निर्णय झाला नाही.

त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायत बोलावली. सकाळी ११ पंचांसमारे उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा, असे सांगितले. तुम्ही दंड भरला नाहीत तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू, अशा धमक्या दिल्या. शेवटी दंड भरू न शकल्याने पंचांनी मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. त्यामुळे मालन यांनी आष्टी पाेलिस ठाणे गाठत तक्रार केली. त्यावरून २५ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजता नऊ जणांविरोधात सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण ४, ५, ६ तसेच बीएनएस १८९ (२), ३५१ (२) (३), ३५२ अशा कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपींमध्ये यांचा समावेशगंगाधर बाबू पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर), उत्तम हनुमंत फुलमाळी (रा. जेवून आयबत्ती, ता. नेवासा, जि. अहमदनगर), गंगा गंगाराम फुसमाळी (रा. पाटसरा, ता. आष्टी), चिन्नू साहेबराव फुल माळी (रा. डोईठाण, ता. आष्टी), सुभाष फुलमाळी (रा. शनी शिंगणापूर, जि. अहमदनगर), बाबुराव साहेबराव फुलमाळी (रा. निमगाव गांगरडा, ता. कर्जत, जि. अहमदनगर), शेटीबा रामा काकडे (रा. वाळकी, जि. अहमदनगर), सयाजी सायबा फुलमाळी (रा. पिंपळनेर, जि. बीड), गुलाब पालवे (रा. धनगडवाडी, जि. अहमदनगर) यांच्यासह इतर पंचांचा आरोपींत समावेश आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी