शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; जात पंचायतकडून सात पिढ्या समाजातून बहिष्कृत

By सोमनाथ खताळ | Updated: September 27, 2024 11:44 IST

अडीच लाखांचा दंड न भरल्याने पंचांनी दिला आदेश, नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड : सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना तेव्हा अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावले. त्यांनीही असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसेच पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू, अशा धमक्याही दिल्या. हा प्रकार २२ सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. अखेर नऊ जणांविरोधात आष्टी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतचा मुद्दा समोर आला आहे.

मालन शिवाजी फुलमाळी (वय ३२, रा. कडा कारखाना, ता. आष्टी) यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. तेव्हा जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना २ लााख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. परंतु, अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी शिवाजी पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांच्या मार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती. त्याप्रमाणे त्या पती शिवाजी, मुलांसह तेथे पोहचल्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे ८०० ते ९०० लोक अगोदरच जमलेले होते. त्यादिवशी निर्णय झाला नाही.

त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायत बोलावली. सकाळी ११ पंचांसमारे उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा, असे सांगितले. तुम्ही दंड भरला नाहीत तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू, अशा धमक्या दिल्या. शेवटी दंड भरू न शकल्याने पंचांनी मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. त्यामुळे मालन यांनी आष्टी पाेलिस ठाणे गाठत तक्रार केली. त्यावरून २५ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजता नऊ जणांविरोधात सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण ४, ५, ६ तसेच बीएनएस १८९ (२), ३५१ (२) (३), ३५२ अशा कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपींमध्ये यांचा समावेशगंगाधर बाबू पालवे (रा. धनगरवाडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर), उत्तम हनुमंत फुलमाळी (रा. जेवून आयबत्ती, ता. नेवासा, जि. अहमदनगर), गंगा गंगाराम फुसमाळी (रा. पाटसरा, ता. आष्टी), चिन्नू साहेबराव फुल माळी (रा. डोईठाण, ता. आष्टी), सुभाष फुलमाळी (रा. शनी शिंगणापूर, जि. अहमदनगर), बाबुराव साहेबराव फुलमाळी (रा. निमगाव गांगरडा, ता. कर्जत, जि. अहमदनगर), शेटीबा रामा काकडे (रा. वाळकी, जि. अहमदनगर), सयाजी सायबा फुलमाळी (रा. पिंपळनेर, जि. बीड), गुलाब पालवे (रा. धनगडवाडी, जि. अहमदनगर) यांच्यासह इतर पंचांचा आरोपींत समावेश आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी