शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

वन्यप्राण्यांकडून शेतातील उभ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मानवाचे निसर्गासोबत युद्ध चालले आहे. निसर्गाचा समतोल ढासाळत आहे. या बदलामुळे जंगल ...

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मानवाचे निसर्गासोबत युद्ध चालले आहे. निसर्गाचा समतोल ढासाळत आहे. या बदलामुळे जंगल नष्ट होऊ लागले. याचा परिणाम जंगलातील वन्यप्राण्यांवर, पशूंवर होत आहे. त्यांना जंगलात सर्व अन्न मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा आता जंगल सोडून शेतात व गावाकडे वळविला आहे. त्यामुळे शेतातील पिकांसह मानवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे, तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्यप्राणी फस्त करू लागले आहेत. अशा आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

यावर्षी पाऊस लवकर सुरू झाला. यामुळे खरिपाच्या पेरण्या धडाक्यात झाल्या. सध्या शेतात सोयाबीन, ऊस, संकरित ज्वारी, तूर, जवस, उडीद, मूग, अद्रक, बटाटा ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, तर या पिकांना आता विविध संकटांबरोबरच वन्यप्राण्यांनीही ग्रासले आहे. रानडुकरे, हरणांचे कळप शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. हरणांच्या कळपांनी तर तालुक्यात ठिकठिकाणी सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात फस्त केले आहे. रानडुकरांचा मोठा उपद्रव ऊस, पिवळा या पिकांना होऊ लागला आहे. तालुक्यात रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे मोठे पीक बटाटा, हळद, अद्रक, भुईमूग, ही पिके घेण्याचे टाळले जात आहे. जर एकदा रानडुकरांनी या पिकांमध्ये शिरकाव केला तर त्या शेताची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे.

रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात थांबणे अथवा एकटे शेतात जाण्यासाठीही शेतकरी धजावत नाहीत. तालुक्यात आजतागायत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महिनाभरापूर्वी कुरणवाडी येथे एका महिलेवर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेला ८० टाके घ्यावे लागले. अशा अनेक अपघाती घटना वारंवार घडू लागल्या आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अचानक हल्ल्यांमुळे या रानडुकरांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे.

रानडुक्कर अथवा वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी मोठी कसरत शासन दरबारी करावी लागते. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अथवा प्रशासनही म्हणावी तशी दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना या नवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे.

दीड एकर ऊस फस्त

माझ्या शेतातील दीड एकर ऊस रानडुकरांनी फस्त केला आहे. अजूनही नुकसान सुरूच आहे. मोठा खर्च करून उसाची लागवड केली; मात्र या वन्यप्राण्यांमुळे शेती धोक्यात आली आहे. याचा प्रशासनाने बंदोबस्त करावा.

हनुमंत जगताप, शेतकरी, राडी.

उसाचे पीक संकटात

अंबाजोगाई तालुक्यात ग्रीनबेल्ट समजल्या जाणाऱ्या आपेगाव, राडी व धानोरा सर्कल परिसरात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या परिसरात रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज उसाचे नुकसान मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. वनविभाग व प्रशासनाने रानडुकरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे.

अशोक कदम, शेतकरी, तडोळा.