शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

वन्यप्राण्यांकडून शेतातील उभ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मानवाचे निसर्गासोबत युद्ध चालले आहे. निसर्गाचा समतोल ढासाळत आहे. या बदलामुळे जंगल ...

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मानवाचे निसर्गासोबत युद्ध चालले आहे. निसर्गाचा समतोल ढासाळत आहे. या बदलामुळे जंगल नष्ट होऊ लागले. याचा परिणाम जंगलातील वन्यप्राण्यांवर, पशूंवर होत आहे. त्यांना जंगलात सर्व अन्न मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा आता जंगल सोडून शेतात व गावाकडे वळविला आहे. त्यामुळे शेतातील पिकांसह मानवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे, तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्यप्राणी फस्त करू लागले आहेत. अशा आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

यावर्षी पाऊस लवकर सुरू झाला. यामुळे खरिपाच्या पेरण्या धडाक्यात झाल्या. सध्या शेतात सोयाबीन, ऊस, संकरित ज्वारी, तूर, जवस, उडीद, मूग, अद्रक, बटाटा ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, तर या पिकांना आता विविध संकटांबरोबरच वन्यप्राण्यांनीही ग्रासले आहे. रानडुकरे, हरणांचे कळप शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. हरणांच्या कळपांनी तर तालुक्यात ठिकठिकाणी सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात फस्त केले आहे. रानडुकरांचा मोठा उपद्रव ऊस, पिवळा या पिकांना होऊ लागला आहे. तालुक्यात रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे मोठे पीक बटाटा, हळद, अद्रक, भुईमूग, ही पिके घेण्याचे टाळले जात आहे. जर एकदा रानडुकरांनी या पिकांमध्ये शिरकाव केला तर त्या शेताची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे.

रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात थांबणे अथवा एकटे शेतात जाण्यासाठीही शेतकरी धजावत नाहीत. तालुक्यात आजतागायत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महिनाभरापूर्वी कुरणवाडी येथे एका महिलेवर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेला ८० टाके घ्यावे लागले. अशा अनेक अपघाती घटना वारंवार घडू लागल्या आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अचानक हल्ल्यांमुळे या रानडुकरांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे.

रानडुक्कर अथवा वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी मोठी कसरत शासन दरबारी करावी लागते. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अथवा प्रशासनही म्हणावी तशी दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना या नवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे.

दीड एकर ऊस फस्त

माझ्या शेतातील दीड एकर ऊस रानडुकरांनी फस्त केला आहे. अजूनही नुकसान सुरूच आहे. मोठा खर्च करून उसाची लागवड केली; मात्र या वन्यप्राण्यांमुळे शेती धोक्यात आली आहे. याचा प्रशासनाने बंदोबस्त करावा.

हनुमंत जगताप, शेतकरी, राडी.

उसाचे पीक संकटात

अंबाजोगाई तालुक्यात ग्रीनबेल्ट समजल्या जाणाऱ्या आपेगाव, राडी व धानोरा सर्कल परिसरात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या परिसरात रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज उसाचे नुकसान मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. वनविभाग व प्रशासनाने रानडुकरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे.

अशोक कदम, शेतकरी, तडोळा.