शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांकडून शेतातील उभ्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मानवाचे निसर्गासोबत युद्ध चालले आहे. निसर्गाचा समतोल ढासाळत आहे. या बदलामुळे जंगल ...

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मानवाचे निसर्गासोबत युद्ध चालले आहे. निसर्गाचा समतोल ढासाळत आहे. या बदलामुळे जंगल नष्ट होऊ लागले. याचा परिणाम जंगलातील वन्यप्राण्यांवर, पशूंवर होत आहे. त्यांना जंगलात सर्व अन्न मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा आता जंगल सोडून शेतात व गावाकडे वळविला आहे. त्यामुळे शेतातील पिकांसह मानवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावला जात आहे, तर दुसरीकडे शेतातील उभे पीक वन्यप्राणी फस्त करू लागले आहेत. अशा आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

यावर्षी पाऊस लवकर सुरू झाला. यामुळे खरिपाच्या पेरण्या धडाक्यात झाल्या. सध्या शेतात सोयाबीन, ऊस, संकरित ज्वारी, तूर, जवस, उडीद, मूग, अद्रक, बटाटा ही पिके मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, तर या पिकांना आता विविध संकटांबरोबरच वन्यप्राण्यांनीही ग्रासले आहे. रानडुकरे, हरणांचे कळप शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. हरणांच्या कळपांनी तर तालुक्यात ठिकठिकाणी सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात फस्त केले आहे. रानडुकरांचा मोठा उपद्रव ऊस, पिवळा या पिकांना होऊ लागला आहे. तालुक्यात रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. रानडुकरांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे मोठे पीक बटाटा, हळद, अद्रक, भुईमूग, ही पिके घेण्याचे टाळले जात आहे. जर एकदा रानडुकरांनी या पिकांमध्ये शिरकाव केला तर त्या शेताची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे.

रानडुकरांच्या भीतीमुळे शेतात थांबणे अथवा एकटे शेतात जाण्यासाठीही शेतकरी धजावत नाहीत. तालुक्यात आजतागायत रानडुकरांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महिनाभरापूर्वी कुरणवाडी येथे एका महिलेवर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात त्या महिलेला ८० टाके घ्यावे लागले. अशा अनेक अपघाती घटना वारंवार घडू लागल्या आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतकरी व शेतमजुरांवर होणाऱ्या अचानक हल्ल्यांमुळे या रानडुकरांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे.

रानडुक्कर अथवा वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी मोठी कसरत शासन दरबारी करावी लागते. तसेच या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग अथवा प्रशासनही म्हणावी तशी दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना या नवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे.

दीड एकर ऊस फस्त

माझ्या शेतातील दीड एकर ऊस रानडुकरांनी फस्त केला आहे. अजूनही नुकसान सुरूच आहे. मोठा खर्च करून उसाची लागवड केली; मात्र या वन्यप्राण्यांमुळे शेती धोक्यात आली आहे. याचा प्रशासनाने बंदोबस्त करावा.

हनुमंत जगताप, शेतकरी, राडी.

उसाचे पीक संकटात

अंबाजोगाई तालुक्यात ग्रीनबेल्ट समजल्या जाणाऱ्या आपेगाव, राडी व धानोरा सर्कल परिसरात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या परिसरात रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज उसाचे नुकसान मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. वनविभाग व प्रशासनाने रानडुकरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे.

अशोक कदम, शेतकरी, तडोळा.