शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

अवकाळी पावसामुळे ११०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:03 IST

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले ...

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले हरभरा पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास आदेश दिले होते. त्यामुसार महसूल व कृषी विभागातर्फे संयुक्त पंचनामे करण्यात आले. यामध्ये परळी, धारूर व केज तालुक्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रावरील २ हजार ३६३ हेक्टर, बागायती ८२५, तर फळपिके १६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे, तर अहवालानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र हे ११०३ इतके आहे. शासननिर्णयाप्रमाणे ११०३ हेक्टरवरील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

चौकट

जनावरे दगावले; नुकसान मात्र नाही

पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये शेळ्या दगावल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र, पाटोदा तालुक्यात पिकांचे नुकसान झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंचनामे न करता अहवाल दिल्याचा आरोप बीडसह अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

अंबाजोगाई तालुक्यातदेखील नुकसान झाले असून, त्याचादेखील समावेश नाही. त्यामुळे उर्वरित तालुक्यांत फेरपंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

कोट

प्रशानाकडून नुकसानभरपाईचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार नुकसानभरपाईसंदर्भात मंत्रालय पातळीवर निर्णय झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.

-संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड