शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे ११०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:03 IST

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले ...

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले हरभरा पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास आदेश दिले होते. त्यामुसार महसूल व कृषी विभागातर्फे संयुक्त पंचनामे करण्यात आले. यामध्ये परळी, धारूर व केज तालुक्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रावरील २ हजार ३६३ हेक्टर, बागायती ८२५, तर फळपिके १६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे, तर अहवालानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र हे ११०३ इतके आहे. शासननिर्णयाप्रमाणे ११०३ हेक्टरवरील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

चौकट

जनावरे दगावले; नुकसान मात्र नाही

पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये शेळ्या दगावल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र, पाटोदा तालुक्यात पिकांचे नुकसान झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंचनामे न करता अहवाल दिल्याचा आरोप बीडसह अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

अंबाजोगाई तालुक्यातदेखील नुकसान झाले असून, त्याचादेखील समावेश नाही. त्यामुळे उर्वरित तालुक्यांत फेरपंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

कोट

प्रशानाकडून नुकसानभरपाईचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार नुकसानभरपाईसंदर्भात मंत्रालय पातळीवर निर्णय झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.

-संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड