शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

अवकाळी पावसामुळे ११०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:03 IST

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले ...

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले हरभरा पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास आदेश दिले होते. त्यामुसार महसूल व कृषी विभागातर्फे संयुक्त पंचनामे करण्यात आले. यामध्ये परळी, धारूर व केज तालुक्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रावरील २ हजार ३६३ हेक्टर, बागायती ८२५, तर फळपिके १६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे, तर अहवालानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र हे ११०३ इतके आहे. शासननिर्णयाप्रमाणे ११०३ हेक्टरवरील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

चौकट

जनावरे दगावले; नुकसान मात्र नाही

पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये शेळ्या दगावल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र, पाटोदा तालुक्यात पिकांचे नुकसान झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंचनामे न करता अहवाल दिल्याचा आरोप बीडसह अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

अंबाजोगाई तालुक्यातदेखील नुकसान झाले असून, त्याचादेखील समावेश नाही. त्यामुळे उर्वरित तालुक्यांत फेरपंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

कोट

प्रशानाकडून नुकसानभरपाईचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार नुकसानभरपाईसंदर्भात मंत्रालय पातळीवर निर्णय झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.

-संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड