शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

अवकाळी पावसामुळे ११०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:03 IST

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले ...

१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले हरभरा पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास आदेश दिले होते. त्यामुसार महसूल व कृषी विभागातर्फे संयुक्त पंचनामे करण्यात आले. यामध्ये परळी, धारूर व केज तालुक्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रावरील २ हजार ३६३ हेक्टर, बागायती ८२५, तर फळपिके १६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे, तर अहवालानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र हे ११०३ इतके आहे. शासननिर्णयाप्रमाणे ११०३ हेक्टरवरील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

चौकट

जनावरे दगावले; नुकसान मात्र नाही

पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये शेळ्या दगावल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र, पाटोदा तालुक्यात पिकांचे नुकसान झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंचनामे न करता अहवाल दिल्याचा आरोप बीडसह अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

अंबाजोगाई तालुक्यातदेखील नुकसान झाले असून, त्याचादेखील समावेश नाही. त्यामुळे उर्वरित तालुक्यांत फेरपंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

कोट

प्रशानाकडून नुकसानभरपाईचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार नुकसानभरपाईसंदर्भात मंत्रालय पातळीवर निर्णय झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.

-संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड