राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘आठ दशके कृतज्ञतेची’ अभियानात स्वाभिमान या नदीमध्ये एकदिवसीय श्रमदान झाले होते. हा प्रकल्प धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा संकल्प त्यावेळी केला होता. आता हा बंधारा ओसंडून वाहत आहे. प्रकल्प ७५ % पूर्ण झाला असून, सुशोभीकरणाचे काम कार्यान्वित आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याआधीच परळी नगरपालिकेस राज्यातून चौथा ‘वसुंधरा पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. नगरपरिषद गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्षा सरोजनी हालगे, मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या सहकार्याने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या पुढाकारातून हे काम झाले.
परळी ते चांदापूर रोडवरील घनशी नदीचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत साखळी सिमेंट बंधारा, नदी सरळीकरण व खोलीकरण काम झाले असून, बंधारा ओसंडून वाहत आहे. या बंधाऱ्याचा जुन्या गावभागाला खूप मोठा लाभ होणार आहे. गुरुवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या जलपूजन कार्यक्रमास आ.संजय दौड, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, शिवाजी शिरसाठ, प्रा.मधुकर आघाव, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, वैजनाथ सोळंके, तुळशीराम पवार, रवींद्र परदेशी, नगरसेवक अय्युब पठाण, गोविंद मुंडे, श्रीकृष्ण कराड, गोपाळ आंधळे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.