शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी पाससाठी सर्वच तहसील कार्यालयांत गर्दी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:19 IST

बीड : जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात लॉकडाऊन काळात पास देण्याची ऑनलाइन व ऑफलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवास ...

बीड : जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात लॉकडाऊन काळात पास देण्याची ऑनलाइन व ऑफलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रवास पाससाठी कारण महत्त्वाचे असून, त्यासाठीच पास दिला जाणार आहे. मात्र, क्षुल्लक कारणासाठीही पासची मागणी वाढू लागल्याने, तहसील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे, तर गरजूंना पास तत्काळ देण्यात यावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत. मात्र, काही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना योग्य उत्तर दिले जात नसल्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी लॉकडाऊनचा पहिला दिवस होता. त्याच दिवशी प्रवासी पाससाठी मोठी गर्दी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात होती. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातून पासची व्यवस्था केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाइन मदत केंद्र व पास केंद्र याची पूर्व तयारी करणे गरजेची होती. पूर्वतयारी न झाल्याने नागरिकांनी पाससाठी ई-मेलवर मागणी केल्यानंतरही योग्य प्रतिसाद मिळून येत नव्हता, तर व्हॉट्सॲपच्या नंबरवरूनही प्रतिक्रिया दिली जात नव्हती. त्यामुळे संबंधित तहसील कार्यालयात पासच्या मागणीसाठी ऑफलाइन गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली असून, नियोजन न केल्यामुळे अधिकारी, कर्मचारीही भांबावले आहेत. त्यामुळे पास यंत्रणा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून एकखिडकी कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, तर जास्तीतजास्त प्रवासी पास हे ऑनलाइन दिले, तर नागरिकांची सोय होईल व गर्दी होणार नाही, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सुसूत्रता आणणे गरजेचे

लॉकडाऊन करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होतो. त्या संदर्भात सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकारी यांनी सूचनाही दिल्या होत्या. त्या पद्धतीने तहसील कार्यालयात ईमेल आयडी, व्हॉट्सॲप क्रमांक, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाइन यांचे नंबर नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे होते. त्यामुळे पास व्यवस्थेत सुधारणा करून सुसूत्रता आणणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.

लॉकडाऊन नागरिकांसाठीच

लॉकडाऊन कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी केलेले आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संसर्ग कमी होताच टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे व क्षुल्लक कारणास्तव प्रवासी पासचा हट्ट धरू नये, कोरोना काळात आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.