शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा

By शिरीष शिंदे | Updated: September 9, 2023 19:15 IST

बीड जिल्ह्यातील १८० अतिरिक्त विमा भरणारे रडारावर

बीड : जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याची भारतीय कृषी विमा कंपनीने तपासणी सुरू केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर तब्बल २ हजार ७९२ एकरचा पीक विमा काढून क्षेत्र संरक्षित केले आहे. तर जिल्ह्यातील जवळपास १८० शेतकऱ्यांनी ६१ एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर अधिक विमा भरला आहे.

जिल्ह्यातील काही भागात काही ठिकाणी अतिरिक्त पीक विमा भरण्याची बाब भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर रिमोट सेन्सिंगचा आधार घेत ग्राऊंड ट्रुथिंग करण्याचे आदेश दिले होते. १५ दिवसांच्या कालावधीत विमा कंपनीने केलेल्या तपासणीत अतिरिक्त पीक विमा भरून त्याचे पैसे लाटण्याच्या उद्देशाने विमा भरल्याचे दिसून येत आहे.

अतिरिक्त विम्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याशेतकऱ्यांनी पीक विमा भरताना सातबाऱ्यावर पिकाच्या नमूद क्षेत्रापैकी अधिक क्षेत्र दाखवून विमा भरला आहे. कमी जमीन असताना जास्त जमीन व त्यावर लावण्यात आलेल्या पिकांचे क्षेत्र अधिक दाखवून पीक विमा भरण्यात आला आहे. अतिरिक्त विम्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यात आल्या आहेत.

घोटाळ्यात सीएससी चालक सहभागी?पीक विमा घोटाळ्यात सीएससी चालक सहभागी असल्याचा संशय विमा अधिकाऱ्यांना आहे. परभणी जिल्ह्यातील एका सीएससी चालकाने वडवणी तालुक्यातील एका गावातील पीक विमा भरला आहे. विमा अर्ज भरल्यानंतर व्हेरिफिकेशनच्या वेळी नेट बंद करणे, वेगवेगळे प्रकार हॅकिंग करणे असे प्रयोग केले आहेत. पीक विमा अर्ज भरताना सातबाऱ्याची पडताळणी होते, शेवटी यादीमध्ये पंच होते. परंतु अयोग्य पद्धतीने भरलेले फॉर्म पूर्णत: भरले गेले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत समोर आलेली प्रकरणेअंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर अतिरिक्त विमा भरला आहे. एका शेतकऱ्याने सोयाबीनसाठी ४५८ हेक्टर, दुसऱ्या शेतकऱ्याने २१२ हेक्टर तर तिसऱ्या शेतकऱ्याने ४५९ हेक्टर असा एकूण १,१३० हेक्टर म्हणजेच २,७९२ एकरचा विमा काढला आहे. या तिन्ही शेतकऱ्यांनी सदरील पीक विमा रद्द करण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. नजरचुकीने अकृषिक जमिनीवर विमा भरला असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.

१८० शेतकऱ्यांनी भरला अतिरिक्त विमाजिल्ह्यातील जवळपास १८० शेतकऱ्यांनी २५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर विमा भरला आहे. त्यांच्याकडे एवढी शेती नसतानाही केवळ विमाच काढला नाही तर अतिरिक्त विमा भरून विम्याचा लाभ घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु विमा कंपनीच्या वेळीच लक्षात आल्याने अतिरिक्त विमा घोटाळा प्रकरण समोर आले आहे.

पीक विमा रॅकेट सक्रियजिल्ह्यात पीक विम्याचा धंदा करण्याची माफियागिरी सुरू झाली असून हे माफिया सक्रिय झाले आहेत. मागच्या वर्षी पीक विमा कंपनीने अतिरिक्त पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार होते; परंतु विमा भरणारे शेतकरी असल्याच्या भावनेतून कारवाई झाली नव्हती; परंतु आता पुन्हा असेच प्रकरण समोर आले आहे. काही मोजक्या लोकांमुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो. परिणामी पीक विमा कंपनी या घोटाळेबाज शेतकऱ्यांचा हवाला देत संबंधित मंडळातील सर्वच शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रोखून धरते. अतिरिक्त पीक विमा भरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाBeedबीडFarmerशेतकरी