शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बीडमध्ये शेतीच्या वाटणीवरून पुतणीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:44 IST

सख्ख्या भावासोबत शेतीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून चुलत्याने पत्नी आणि सासरच्या व्यक्तींच्या मदतीने पुतणीचा विष पाजून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथे घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी पाच जणांवर गुन्हा खुनाचा नोंदविण्यात आला.

ठळक मुद्दे चुलता-चुलतीसहित पाच जणांवर खुनाचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सख्ख्या भावासोबत शेतीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून चुलत्याने पत्नी आणि सासरच्या व्यक्तींच्या मदतीने पुतणीचा विष पाजून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथे घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी पाच जणांवर गुन्हा खुनाचा नोंदविण्यात आला. अद्याप सर्व आरोपी फरार आहेत.

बबिता व्यंकटी भताने (वय १९) असे या प्रकरणातील मयत युवतीचे नाव आहे. परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथील व्यंकटी हरिभाऊ भताने आणि सख्खा भाऊ विठ्ठल हरिभाऊ भताने यांची शेजारी-शेजारी प्रत्येकी साडेआठ एकर शेतजमीन आहे. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता विठ्ठल भताने जेसीबी मशिनच्या साह्याने बांध फोडून व्यंकटी यांच्या ताब्यातील जमिनीपैकी अर्धा एकरवर कब्जा करू लागला. यावरून दोघा भावांत वाद सुरु झाला. यावेळी विठ्ठलची पत्नी जयश्री हिने व्यंकटी यांच्या हाताला चावा देखील घेतला. परंतु, भावकीतील अन्य लोकांनी मध्यस्थी करून भांडण तत्काळ सोडविले आणि एकत्र बसून आपापसात तडजोडीने वाद मिटविण्याचे ठरले.

२५ नोव्हेंबर रोजी विठ्ठलचे सासरे आणि मेहुणे अस्वलआंब्यात आल्याचे व्यंकटी यांना समजले. हे सर्वजण वाद मिटविण्यासाठी आले असतील असे समजून रात्री ११ वाजता व्यंकटी भताने गावातील चार प्रतिष्ठित माणसांना बैठकीस बोलाविण्यासाठी गेले. त्यानंतर विठ्ठल भताने हा त्याचा सासरा सोपान गणपती नागरगोजे, मेहुणे बालासाहेब आणि गोविंद सोपान नागरगोजे (तिघेही रा. माळहिवरा) व पत्नी जयश्री यांच्यासमवेत व्यंकटी भताने यांच्या घरात घुसला. यावेळी घरात फक्त व्यंकटी यांची पत्नी ठकूबाई आणि मुलगी बबिता या दोघीच होत्या.

पाचही आरोपींनी व्यंकटी कुठे गेला, त्याचे हातपाय तोडून गळ्यात टाकूत, त्याची जीभ कापूत असे म्हणत ठकूबाई यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगी बबिता आईला वाचविण्यासाठी मध्ये पडली असता पाचही आरोपींनी संगनमताने तिला खाली पाडून बळजबरीने विषारी द्रव पाजले. हे पाहून ठकूबाईंनी आरडाओरड सुरु केल्याने शेजारची माणसे तिथे आल्यामुळे सर्व आरोपींनी पळ काढला.

ठकूबाईंनी शेजारच्या लोकांच्या साह्याने अत्यावस्थ बबिताला तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु सोमवारी रात्री ११.४५च्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे बबिताची आई ठकूबाई व्यंकटी भताने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून सोपान गणपती नागरगोजे, बालासाहेब सोपान नागरगोजे, गोविंद सोपान नागरगोजे, विठ्ठल हरिभाऊ भताने आणि जयश्री विठ्ठल भताने यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.