शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

पाचट पेटविलेल्या फडात शेतकऱ्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात ऊस गळितास गेल्याने फडातील उसाची पाचट पेटवली होती. या फडात झोपलेल्या एका ...

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात ऊस गळितास गेल्याने फडातील उसाची पाचट पेटवली होती. या फडात झोपलेल्या एका शेतकऱ्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्यासुमारास तालुक्यातील श्रीराम वस्ती येथे घडली. हा प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

दिगांबर विक्रम पांढरे (वय २७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. १९ मार्चरोजी ते गेवराई येथील रोजंदारीचे काम करून रात्री घरी आले होते. मात्र, त्यांना फोन आल्याने ते घराबाहेर पडल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. रात्रभर घरी न आलेल्या दिगांबर यांचा मृतदेह विश्वंबर जाधव यांच्या उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत आढळून आला. जाधव यांचा ऊस गळितास नुकताच गेल्यामुळे त्यांनी उसाची पाचट पेटवली होती. याच उसाच्या फडात दिगांबर पांढरे यांचा मृत्यू झाला.

दिगांबर यांच्या पश्चात्य आई, पत्नी, तीन महिन्यांचा मुलगा आहे. दिगांबर पांढरे यांच्या वडिलांचे निधन झाले असून, सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

शनिवारी सकाळी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास मृतदेह आणला होता. हा प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. गेवराईचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, तलवाडा पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे घटनास्थळी दाखल होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.