शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पाचट पेटविलेल्या फडात शेतकऱ्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात ऊस गळितास गेल्याने फडातील उसाची पाचट पेटवली होती. या फडात झोपलेल्या एका ...

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात ऊस गळितास गेल्याने फडातील उसाची पाचट पेटवली होती. या फडात झोपलेल्या एका शेतकऱ्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्यासुमारास तालुक्यातील श्रीराम वस्ती येथे घडली. हा प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

दिगांबर विक्रम पांढरे (वय २७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. १९ मार्चरोजी ते गेवराई येथील रोजंदारीचे काम करून रात्री घरी आले होते. मात्र, त्यांना फोन आल्याने ते घराबाहेर पडल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. रात्रभर घरी न आलेल्या दिगांबर यांचा मृतदेह विश्वंबर जाधव यांच्या उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत आढळून आला. जाधव यांचा ऊस गळितास नुकताच गेल्यामुळे त्यांनी उसाची पाचट पेटवली होती. याच उसाच्या फडात दिगांबर पांढरे यांचा मृत्यू झाला.

दिगांबर यांच्या पश्चात्य आई, पत्नी, तीन महिन्यांचा मुलगा आहे. दिगांबर पांढरे यांच्या वडिलांचे निधन झाले असून, सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

शनिवारी सकाळी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास मृतदेह आणला होता. हा प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. गेवराईचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, तलवाडा पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे घटनास्थळी दाखल होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.