शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

पाचट पेटविलेल्या फडात शेतकऱ्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात ऊस गळितास गेल्याने फडातील उसाची पाचट पेटवली होती. या फडात झोपलेल्या एका ...

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव शिवारात ऊस गळितास गेल्याने फडातील उसाची पाचट पेटवली होती. या फडात झोपलेल्या एका शेतकऱ्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्यासुमारास तालुक्यातील श्रीराम वस्ती येथे घडली. हा प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

दिगांबर विक्रम पांढरे (वय २७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. १९ मार्चरोजी ते गेवराई येथील रोजंदारीचे काम करून रात्री घरी आले होते. मात्र, त्यांना फोन आल्याने ते घराबाहेर पडल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. रात्रभर घरी न आलेल्या दिगांबर यांचा मृतदेह विश्वंबर जाधव यांच्या उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत आढळून आला. जाधव यांचा ऊस गळितास नुकताच गेल्यामुळे त्यांनी उसाची पाचट पेटवली होती. याच उसाच्या फडात दिगांबर पांढरे यांचा मृत्यू झाला.

दिगांबर यांच्या पश्चात्य आई, पत्नी, तीन महिन्यांचा मुलगा आहे. दिगांबर पांढरे यांच्या वडिलांचे निधन झाले असून, सर्व जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

शनिवारी सकाळी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास मृतदेह आणला होता. हा प्रकार घातपाताचा असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. गेवराईचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड, तलवाडा पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे घटनास्थळी दाखल होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.