शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

CoronaVirus: गाव-वाड्या सुरक्षित करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर; जनजागृतीसह सर्वेक्षणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 20:06 IST

नोंदणी,  फवारणी, जनजागृतीसह , काळजी घेण्याचे घरोघरी जाऊन केले जातेय आवाहन

- नितीन कांबळे 

कडा : प्रशासन आणि जनता यातील मुख्य दुवा म्हणून ओळखले जाणारे ग्रामसेवक हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गाव, खेडी, वस्ती, वाडी, सुरक्षित करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ग्रामीण भागात जनजागृती सोबतच नोंदणी,सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आष्टी तालुक्यात  125  ग्रामपंचायती असुन  78  ग्रामसेवक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली गावे सुरक्षित राहावीत यासाठी फक्त जनजागृती न करता बाहेरून आलेले नातेवाईक, पाहुणे,  स्थानिक नागरिक यांची चौकशी करून नोंद करून घेणे, ग्रामपंचायती अंतर्गत गाव वस्ती, वाडीत जंतूनाशक फवारणी, सॅनिटायझर वाटप,पाणीपुरवठा शुद्धीकरण करून सुरळीत  करणे,सोडियम हायपोक्लोराईड ,हात धुण्यासाठी डेटॉल साबणाचे वाटप करणे,लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत व कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे.यासह घरोघरी जाऊन जनजागृती केली जात आहे. 

 तालुक्यातील सर्वच ग्रामसेवक हे कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला सुरक्षा कवच असल्याचे दिसुन येत आहे. शासनाने जिव धोक्यात घालणाऱ्या ग्रामसेवक यांचा देखील विमा कवचसाठी विचार करणे गरजेचे असल्याचे धामणगांव येथील ग्रामसेवक गोवर्धन गिरी यांनी सांगितले.

ग्रामसेवकांना विमा जाहीर करावाकोरोनाच्या  कालावधीत काम करताना  सुरक्षा म्हणून ग्रामसेवकास एक कोटींचा विमा शासनाने जाहीर करावा.अशी मागणी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बळीराम  उबाळे ,उपाध्यक्ष  मधुकर शेळके,सचिव  तिडके ,  आष्टी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब वाणी, उपाध्यक्ष आबासाहेब खिलारे,सचिव ,त्र्यंबक  मुळीक यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड