शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

coronavirus : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:57 IST

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांचे आधार केंद्र आहे. इथे उपचारासाठी मराठवाडयासह दूरदूरहून लोक मोठ्या अपेक्षेने येतात.

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण विभागाने मागवली माहिती

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हालविण्याचा घाट शासनाने घातला आहे. हे डॉक्टर जर मुंबईला प्रतिनियुक्तीवर गेले तर अंबाजोगाईतील रुग्णालय ओस पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. अगोदरच अपुऱ्या मनुष्य बळावर सुरू असलेल्या या रुग्णालयाला डॉक्टरांची नितांत आवश्यकता आहे. अशा स्थितीत इथून पुन्हा ५० डॉक्टर हलवले तर रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळित होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांचे आधार केंद्र आहे. इथे उपचारासाठी मराठवाडयासह दूरदूरहून लोक मोठ्या अपेक्षेने येतात. त्यांना चांगले उपचारही मिळतात. रुग्णालयाची दररोजची बाह्यरुग्ण विभागाची रुग्णसंख्या १८०० ते २००० असते. तर निवासी उपचार घेणाऱ्यांची संख्या ७०० ते ७५० असते. अशा स्थितीत रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी आहे या मनुष्यबळावर रुग्णालयाचा गाडा ओढत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या रोडावली असली तरी हे रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी मोठे आधार केंद्र बनलेले आहे. रुग्णालयात सध्या वैद्यकीय शिक्षक, डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या ३५ टक्के जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भराव्यात यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. लातूर येथे नव्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर अंबाजोगाईतील अनेक तज्ञ डॉक्टर लातूर येथे हलविण्यात आले. त्यानंतरही या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. अशी स्थिती असतांनाही वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालायातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याचा घाट घातला आहे. वैद्यकीय शिक्षण संचालकांनी या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली आहे. 

अंबाजोागईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय निर्माण करण्यात आले आहे. या  कामासाठी आणखी डॉक्टरांची आवश्यकता असतांना अंबाजोगाईतील रिक्त जागा भरण्यासाठी शासन अंबाजोगाईतील डॉक्टरांना मुंबईकडे हलविण्याचा घाट घालत आहे.  जर येथील डॉक्टर मोठ्या प्रमाणात मुंबईला रुजू झाले तर अंबाजोगाईच्या रुग्णालयात रुग्णसेवेसाठी मोठा अडसर ठरणार आहे. अगोदरच अंबाजोगाईत महानगरातून येण्यासाठी डॉक्टर धजावत नाहीत. जे इथे राहून सेवा देतात त्यांनाही हलवाचे म्हटले तर हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आगामी काळात ओस पडेल व मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा खंडित होऊ शकते. आहे या सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मोठा ताण निर्माण होऊ शकतो. 

माहिती देण्यास नकारस्वा.रा.ती. रुग्णालयातील ५० डॉक्टरांची प्रतिनियुक्ती मुंबई येथे होणार आहे का? यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नाही. 

अंबाजोगाईतील डॉक्टरांची प्रतिनियुक्ती मुंबईला करू नये - आ. नमिता मुंदडाअंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबतची माहिती मागविली असल्याचे समजते. अंबाजोगाई हे गोरगरीब रुग्णांसाठी आधारकेंद्र असलेले रुग्णालय आहे. सामान्य रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणाऱ्या या रुग्णालयामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो. या रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी एका निवेदनाद्वारे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmbajogaiअंबाजोगाईhospitalहॉस्पिटल