शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:57 IST

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांचे आधार केंद्र आहे. इथे उपचारासाठी मराठवाडयासह दूरदूरहून लोक मोठ्या अपेक्षेने येतात.

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण विभागाने मागवली माहिती

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबईला हालविण्याचा घाट शासनाने घातला आहे. हे डॉक्टर जर मुंबईला प्रतिनियुक्तीवर गेले तर अंबाजोगाईतील रुग्णालय ओस पडते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. अगोदरच अपुऱ्या मनुष्य बळावर सुरू असलेल्या या रुग्णालयाला डॉक्टरांची नितांत आवश्यकता आहे. अशा स्थितीत इथून पुन्हा ५० डॉक्टर हलवले तर रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळित होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांचे आधार केंद्र आहे. इथे उपचारासाठी मराठवाडयासह दूरदूरहून लोक मोठ्या अपेक्षेने येतात. त्यांना चांगले उपचारही मिळतात. रुग्णालयाची दररोजची बाह्यरुग्ण विभागाची रुग्णसंख्या १८०० ते २००० असते. तर निवासी उपचार घेणाऱ्यांची संख्या ७०० ते ७५० असते. अशा स्थितीत रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी आहे या मनुष्यबळावर रुग्णालयाचा गाडा ओढत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या रोडावली असली तरी हे रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी मोठे आधार केंद्र बनलेले आहे. रुग्णालयात सध्या वैद्यकीय शिक्षक, डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या ३५ टक्के जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भराव्यात यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. लातूर येथे नव्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर अंबाजोगाईतील अनेक तज्ञ डॉक्टर लातूर येथे हलविण्यात आले. त्यानंतरही या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. अशी स्थिती असतांनाही वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालायातील ५० डॉक्टर मुंबईला हलविण्याचा घाट घातला आहे. वैद्यकीय शिक्षण संचालकांनी या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली आहे. 

अंबाजोागईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय निर्माण करण्यात आले आहे. या  कामासाठी आणखी डॉक्टरांची आवश्यकता असतांना अंबाजोगाईतील रिक्त जागा भरण्यासाठी शासन अंबाजोगाईतील डॉक्टरांना मुंबईकडे हलविण्याचा घाट घालत आहे.  जर येथील डॉक्टर मोठ्या प्रमाणात मुंबईला रुजू झाले तर अंबाजोगाईच्या रुग्णालयात रुग्णसेवेसाठी मोठा अडसर ठरणार आहे. अगोदरच अंबाजोगाईत महानगरातून येण्यासाठी डॉक्टर धजावत नाहीत. जे इथे राहून सेवा देतात त्यांनाही हलवाचे म्हटले तर हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आगामी काळात ओस पडेल व मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा खंडित होऊ शकते. आहे या सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मोठा ताण निर्माण होऊ शकतो. 

माहिती देण्यास नकारस्वा.रा.ती. रुग्णालयातील ५० डॉक्टरांची प्रतिनियुक्ती मुंबई येथे होणार आहे का? यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नाही. 

अंबाजोगाईतील डॉक्टरांची प्रतिनियुक्ती मुंबईला करू नये - आ. नमिता मुंदडाअंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील ५० डॉक्टर मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबतची माहिती मागविली असल्याचे समजते. अंबाजोगाई हे गोरगरीब रुग्णांसाठी आधारकेंद्र असलेले रुग्णालय आहे. सामान्य रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणाऱ्या या रुग्णालयामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतो. या रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी एका निवेदनाद्वारे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmbajogaiअंबाजोगाईhospitalहॉस्पिटल