शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

CoronaVirus : क्वारंटाईन असताना नगरमधून काढला पळ; आष्टीच्या कोरोनाग्रस्ताचा असा झाला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 10:32 IST

दिल्ली येथील मरकजहुन परतलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात दोघेजण आले आहेत

ठळक मुद्देनगर येथे क्वारंटाईन असताना केले होते पलायनएकाचा अहवाल आहे प्रलंबित

- नितीन कांबळेकडा -  तीन हजार लोकसंख्या असलेल्या एका गावातील दोघे नगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना नगरमध्ये अलगीकरन केले होते. परंतु त्यांनी पहाटेच तेथून पळ काढत गाव गाठले. ही माहिती प्रशासनाला समजताच पुन्हा त्यांना उचलून नगरला दाखल केले. इथे एकाचा अहवाल पोझीटिव्ह आला तर दुसऱ्याचा प्रलंबित आहे. त्या दोघांच्या प्रवासाने गावासह शेजारील गावे देखील भयभीत झाले आहेत.

आष्टी तालुक्यातील  दोघेजण मरकज येथे धार्मिक कार्यक्रमातुन आलेल्या लोकांशी संपर्कात आले. आरोग्य विभागाने तपासणी केली. आणि खबरदारी म्हणून हातावर शिक्के मारून शासकीय रुग्णालयात  क्वाॅरंटाईन केले. पण यानी 2 एप्रिल रोजी मध्यरात्री दवाखान्यातुन पलायन करून नगर जिल्हा सीमा ओलांडून बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील गावा गाठले. गावात आरोग्य विभागाला माहिती देऊन होम क्वाॅरंटाईन करण्यात आलेले दोघे जणांना घराच्या बाहेर न पडण्याच्या सुचना केल्या. ६ एप्रिल ला पुन्हा यांना तपासणी साठी  अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एकाचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या गावात येणार्‍या सर्व सिमा खोदून बंद करण्यात आल्या असुन दोनही कुटुंबातील सदस्य यांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे.

इतर ठिकाणी प्रार्दुभाव होऊ नये म्हणून सुंबेवाडी , धनगरवाडी, काकडवाडी , ढोंबळसांगवी, खरडगव्हाण, लोणी, नांदूर, सोलापूरवाडी , खुंटेफळ , पुंडी , कोयाळ , ही गावे अनिश्चित काळासाठी पुर्ण वेळ बंद करून संचारबंदी लागु करण्यात आली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड