शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

coronavirus : उत्तरप्रदेशात अडकलेल्या भाविकांची हाक धनंजय मुंडेंनी ऐकली; स्थानिक प्रशासनाच्या मदतीने केली राहण्या-जेवण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 08:15 IST

उत्तर प्रदेशात अडकलेल्या परळी येथील यात्रेकरूंची मथुरा येथील प्रशासनाने केली राहण्या - जेवण्याची सोय!

ठळक मुद्देजवळपास 90 भाविक अडकले उत्तरप्रदेशातील वृंदावन येथेबीडच्या जिहाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काढला मार्ग

परळी : परळी येथील जवळपास १०० यात्रेकरू भागवत कथेसाठी गेलेले उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे अडकलेले आहेत. देशभरात लागू असलेल्या 'लॉकडाऊन' च्या परिस्थितीत त्यांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून परत आणणे शक्य नसल्यामुळे आता त्यांची मथुरा येथे राहणे, जेवण व आरोग्यविषयक सोय स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसेच स्वतः मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

ना. धनंजय मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी  तसेच अडकलेल्या यात्रेकरूंना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे शंभर लोकांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून स्वगृही आणणे सध्यातरी शक्य होणार नाही, त्यामुळे आहेत तिथचे त्यांची सोय करून त्यांना सुरक्षित ठेवण्यात यावे, तसेच परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना तातडीने परळीला आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे या अडकलेल्या प्रवाशांशी तसेच तेथील प्रशासनाशी कायम संपर्कात असून त्याठिकाणी त्यांची निवास, भोजन व आरोग्यविषयक सुविधा होतील यासाठी प्रयत्नशील आहेत. 

नातेवाईकांना आवाहन

अडकलेल्या या प्रवाशांच्या नातेवाईकांनी त्यांना परत आणावे अशा प्रकारची सोशल मीडिया , मीडिया वरून मागणी केली आहे . मात्र या सर्व प्रवाशांचे वय , करोनाची भीती आणि एकंदर पार्श्वभूमी पाहता त्यांना आत्ता लगेच परत आणणे शक्य नाही मात्र आहे त्या ठिकाणी त्यांची घरच्यासारखी सोय होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणीही नातेवाईकांनी,  हितचिंतकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

आहेत तिथेच सुरक्षित राहा 

दरम्यान लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातून स्थलांतरित असणारे अनेक लोक विविध ठिकानांवरून संपर्क करत असून, स्वगृही/गावी परतण्याबाबत मदतीची विनंती करत आहेत. शासनाने या भीषण आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्यासह देशभरात लॉकडाऊन केले आहे. या व्हायरसवर 'सोशल डिस्टनसींग' हा एकमात्र इलाज सध्यातरी आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण जिथे आहोत तिथेच सुरक्षित राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, शासनाने घालून दिलेले नियम मोडून कुठेही येण्या - जाण्यासाठी प्रयत्न करू नयेत व राज्य शासनाला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन या निमित्ताने ना. मुंडे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड