शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
3
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
4
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
5
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
7
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
8
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
9
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
10
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
11
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
12
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
13
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
14
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
15
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
16
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
17
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
18
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
19
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
20
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?

coronavirus : उत्तरप्रदेशात अडकलेल्या भाविकांची हाक धनंजय मुंडेंनी ऐकली; स्थानिक प्रशासनाच्या मदतीने केली राहण्या-जेवण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 08:15 IST

उत्तर प्रदेशात अडकलेल्या परळी येथील यात्रेकरूंची मथुरा येथील प्रशासनाने केली राहण्या - जेवण्याची सोय!

ठळक मुद्देजवळपास 90 भाविक अडकले उत्तरप्रदेशातील वृंदावन येथेबीडच्या जिहाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काढला मार्ग

परळी : परळी येथील जवळपास १०० यात्रेकरू भागवत कथेसाठी गेलेले उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे अडकलेले आहेत. देशभरात लागू असलेल्या 'लॉकडाऊन' च्या परिस्थितीत त्यांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून परत आणणे शक्य नसल्यामुळे आता त्यांची मथुरा येथे राहणे, जेवण व आरोग्यविषयक सोय स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसेच स्वतः मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

ना. धनंजय मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी  तसेच अडकलेल्या यात्रेकरूंना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे शंभर लोकांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून स्वगृही आणणे सध्यातरी शक्य होणार नाही, त्यामुळे आहेत तिथचे त्यांची सोय करून त्यांना सुरक्षित ठेवण्यात यावे, तसेच परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना तातडीने परळीला आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे या अडकलेल्या प्रवाशांशी तसेच तेथील प्रशासनाशी कायम संपर्कात असून त्याठिकाणी त्यांची निवास, भोजन व आरोग्यविषयक सुविधा होतील यासाठी प्रयत्नशील आहेत. 

नातेवाईकांना आवाहन

अडकलेल्या या प्रवाशांच्या नातेवाईकांनी त्यांना परत आणावे अशा प्रकारची सोशल मीडिया , मीडिया वरून मागणी केली आहे . मात्र या सर्व प्रवाशांचे वय , करोनाची भीती आणि एकंदर पार्श्वभूमी पाहता त्यांना आत्ता लगेच परत आणणे शक्य नाही मात्र आहे त्या ठिकाणी त्यांची घरच्यासारखी सोय होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणीही नातेवाईकांनी,  हितचिंतकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

आहेत तिथेच सुरक्षित राहा 

दरम्यान लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातून स्थलांतरित असणारे अनेक लोक विविध ठिकानांवरून संपर्क करत असून, स्वगृही/गावी परतण्याबाबत मदतीची विनंती करत आहेत. शासनाने या भीषण आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्यासह देशभरात लॉकडाऊन केले आहे. या व्हायरसवर 'सोशल डिस्टनसींग' हा एकमात्र इलाज सध्यातरी आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण जिथे आहोत तिथेच सुरक्षित राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, शासनाने घालून दिलेले नियम मोडून कुठेही येण्या - जाण्यासाठी प्रयत्न करू नयेत व राज्य शासनाला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन या निमित्ताने ना. मुंडे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड