शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : उत्तरप्रदेशात अडकलेल्या भाविकांची हाक धनंजय मुंडेंनी ऐकली; स्थानिक प्रशासनाच्या मदतीने केली राहण्या-जेवण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 08:15 IST

उत्तर प्रदेशात अडकलेल्या परळी येथील यात्रेकरूंची मथुरा येथील प्रशासनाने केली राहण्या - जेवण्याची सोय!

ठळक मुद्देजवळपास 90 भाविक अडकले उत्तरप्रदेशातील वृंदावन येथेबीडच्या जिहाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काढला मार्ग

परळी : परळी येथील जवळपास १०० यात्रेकरू भागवत कथेसाठी गेलेले उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे अडकलेले आहेत. देशभरात लागू असलेल्या 'लॉकडाऊन' च्या परिस्थितीत त्यांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून परत आणणे शक्य नसल्यामुळे आता त्यांची मथुरा येथे राहणे, जेवण व आरोग्यविषयक सोय स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसेच स्वतः मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

ना. धनंजय मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी  तसेच अडकलेल्या यात्रेकरूंना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे शंभर लोकांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून स्वगृही आणणे सध्यातरी शक्य होणार नाही, त्यामुळे आहेत तिथचे त्यांची सोय करून त्यांना सुरक्षित ठेवण्यात यावे, तसेच परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना तातडीने परळीला आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे या अडकलेल्या प्रवाशांशी तसेच तेथील प्रशासनाशी कायम संपर्कात असून त्याठिकाणी त्यांची निवास, भोजन व आरोग्यविषयक सुविधा होतील यासाठी प्रयत्नशील आहेत. 

नातेवाईकांना आवाहन

अडकलेल्या या प्रवाशांच्या नातेवाईकांनी त्यांना परत आणावे अशा प्रकारची सोशल मीडिया , मीडिया वरून मागणी केली आहे . मात्र या सर्व प्रवाशांचे वय , करोनाची भीती आणि एकंदर पार्श्वभूमी पाहता त्यांना आत्ता लगेच परत आणणे शक्य नाही मात्र आहे त्या ठिकाणी त्यांची घरच्यासारखी सोय होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणीही नातेवाईकांनी,  हितचिंतकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

आहेत तिथेच सुरक्षित राहा 

दरम्यान लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातून स्थलांतरित असणारे अनेक लोक विविध ठिकानांवरून संपर्क करत असून, स्वगृही/गावी परतण्याबाबत मदतीची विनंती करत आहेत. शासनाने या भीषण आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्यासह देशभरात लॉकडाऊन केले आहे. या व्हायरसवर 'सोशल डिस्टनसींग' हा एकमात्र इलाज सध्यातरी आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण जिथे आहोत तिथेच सुरक्षित राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, शासनाने घालून दिलेले नियम मोडून कुठेही येण्या - जाण्यासाठी प्रयत्न करू नयेत व राज्य शासनाला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन या निमित्ताने ना. मुंडे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड