शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेला कोरोनाचा अडसर; जिल्ह्यात ७ हजार कर्मचारी कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा, तालुका, केंद्र आणि गावपातळीवर बैठका झाल्या आहेत. या शोधमोहिमेत बालरक्षक, प्राथमिक, ...

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा, तालुका, केंद्र आणि गावपातळीवर बैठका झाल्या आहेत. या शोधमोहिमेत बालरक्षक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, डायटचे अधिव्याख्याता, प्राचार्य आदी घटकांना सामील आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क, अधिकार अधिनियम २००९ राज्यात १ एप्रिल २०१० रोजी लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ३ ते १८ वयोगटातील प्रत्येक बालकांस शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कुटुंबांचे स्थलांतर होते. वंचित समाजातील, भूमिहीन अथवा अल्पभूधारक कुटुंब रोजगारासाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह कर्नाटक व गुजरात येथे स्थलांतर करतात. ऊस तोडणीसह, वीटभट्टी, शेत, बांधकामांवर तसेच इतर ठिकाणी मजुरी करतात.

बीड येथे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हास्तरीय बैठक घेऊन कृती कार्यक्रम आखून या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर तालुका स्तरावर तहसीलदारांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे, तर केंद्र शाळेच्या स्तरावर बैठक घेऊन शिक्षकांच्या कार्यक्षेत्रात गाव स्तरावर त्यांनी सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी अंगणवाडी सविका, मदतनीसांची मदत घेतली जात आहे.

-------

शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी जिल्ह्यातील महसूल व पोलीस यंत्रणेकडून ठोस कृती कार्यक्रम आखून राबविण्याबाबत तत्परता दिसून आलेली नाही. दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे सोपस्कर काही ठिकाणी पार पाडले जात आहेत. याचा बहुतांश भार शिक्षकांवरच पडत आहे. त्यामुळे १० मार्चपर्यंत शोध मोहीम पूर्ण हाईल का? यावर प्रश्नचिन्ह आहे.

------

शहरालगत बार्शी रोड, तेलगाव रोड, नाळवंडी रस्ता, गांधी नगर, हनुमान नगर भागात झोपडी किंवा पाल ठोकून शेकडो कुटुंब राहतात. मोलमजुरी करून, कागद- कचरा वेचून, भंगार गोळा करून मिळणाऱ्या पैशावर या कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. पाचवीला पुजलेली गरिबी आणि विविध अडचणींसोबतच आर्थिक संकटाला या कुटुंबांना तोंड द्यावे लागते. जिथे खायचीच भ्रांत तिथे मुलांच्या शिक्षण व आरोग्याकडे अशा कुटुंबांचे जाणीव असूनही दुर्लक्ष होते.

------------

शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम जिल्ह्यात १ मार्चपासून सुरू झाली आहे. १२ मार्चपर्यंत अहवाल येतील. शिक्षक तसेच इतर विभागातील कर्मचारी वाडी- वस्ती तांड्यावर जाऊन चौकशी करून, माहिती घेऊन सर्वेक्षण करीत आहेत. कोरोनामुळे सर्वेक्षणात कुठल्याही अडचणी आलेल्या नाहीत. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.)

-------

ग्रामसेवक हे शाळा व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. शाळा नियंत्रण, गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे शिक्षण व आरोग्य, स्वच्छता, पाणी या बाबतीत त्यांचे लक्ष असते. भावी पिढी असल्याने ती उभारण्यासाठी ग्रामसेवक जबाबदारीने काम करतात. शाळाबाह्य मुले शोधकामी त्यांच्याकडून शाळा समिती व प्रशासनाला माहिती कळविली जाते. -भाऊसाहेब मिसाळ, सचिव. बीड तालुका ग्रामसेवक संघटना.

-------

७००० विविध विभागातील कर्मचाऱ्यांकडून शाळाबाह्य मुले शोधण्याचे काम होत आहे.

----------