शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus In Beed : माजलगावकरांना संचारबंदीत करावा लागतेय पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:30 IST

शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत

ठळक मुद्दे15 दिवसाला एकदा येत आहे पाणीनगराध्यक्ष भ्रष्टाचार प्रकरणात कोठडीत

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : येथील नगरपालिकेला अनेक महिन्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे व सध्या नगराध्यक्ष देखील न्यायालय कोठडीत असल्यामुळे शहराकडे लक्ष देणारे कोणीच राहिले नसल्याने शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ होत असून 15-15 दिवस पाणी मिळत नसल्यामुळे ऐन संचारबंदीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

येथील नगरपालिकेला मागील चार-पाच महिन्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे व आठ-पंधरा दिवसापुरता कोणाकडेतरी चार्ज दिला जातो मात्र ते देखील याठिकाणी येण्यास धजावत नाहीत. ते आले तरी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस या नगरपालिकेला भेटी देतात. यामुळे नगरपालिकेत कोणतेच काम होत नसून कर्मचाऱ्यांवर देखील कोणाचा वचक राहिला नाही. नगराध्यक्ष सहाल चाऊस हे पाणी प्रश्नाकडे जातीने लक्ष देत असत परंतु ते 4 मार्च पासुन भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीतअसल्यामुळे पाणीप्रश्न कडे कोणाचेच लक्ष राहिले नाही. पाणीपुरवठा सभापती हे केवळ नावालाच असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत असून त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसलाच प्रयत्न केला नसल्याचा आरोप नागरिकातुन होत आहे. ऐन संचारबंदीत नागरिकांना बाहेर निघू नयेत असे आदेश असताना मात्र पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. व अनेकांना पाणी भरण्यासाठी लाईन मध्ये उभे राहून पाणी भरण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिक जवळजवळ उभे राहत असून जास्तीत जास्त संपर्कात येत आहेत. यामूळे कोरोनाची लागण लागायला वेळ लागणार नाही.

शहरातील शाहूनगर ,आझादनगर ,सन्मित्र कॉलनी ,आयोध्या नगर , पाटील गल्ली , इदगा मोहल्ला , शिवाजीनगर , तानाजी नगर ,भिमनगर आदी भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असुन शहरात अनेक ठिकाणी हातपंप नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. घरोघरी पोहोच करणारे पाण्याचे जार आत्ता जाऊन आणावे लागत असून त्यांनीही पाण्याच्या जारचा भाव देखील वाढला आहे.

न.प.च्या पाण्यावर अनेक जणांनी केली गडगंज कमाई नगरपालिकेने मुख्य टाकीवरून शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत दोन-तीन ठिकाणी वाल्व बसवले असून याठिकाणी पाण्याची विक्री करणाऱ्यांनी एक डायरेक्ट नळ सुरु केला असून दररोज या नळावरून पन्नास ते शंभर गाड्या या ठिकाणावर भरून घेऊन विक्री केली जातात. यातून हे लोक  गडगंज कमाई करत असून एक रुपयाही नगरपालिकेला टॅक्स भरत नाहीत. उलट जे नागरिक टॅक्स भरतात त्यांना 15 -15 दिवसाला पाणी तर विक्री करणाऱ्या लोकांना दररोज पाणी.

पूर्वीप्रमाणे 4-5 दिवसाला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत व लवकरच पहिल्या प्रमाणे पाणी मिळेल.- भागवत बिघोत, प्रभारी मुख्याधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडWaterपाणी