शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

Corona virus In Beed : माजलगावकरांना संचारबंदीत करावा लागतेय पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:30 IST

शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत

ठळक मुद्दे15 दिवसाला एकदा येत आहे पाणीनगराध्यक्ष भ्रष्टाचार प्रकरणात कोठडीत

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : येथील नगरपालिकेला अनेक महिन्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे व सध्या नगराध्यक्ष देखील न्यायालय कोठडीत असल्यामुळे शहराकडे लक्ष देणारे कोणीच राहिले नसल्याने शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ होत असून 15-15 दिवस पाणी मिळत नसल्यामुळे ऐन संचारबंदीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

येथील नगरपालिकेला मागील चार-पाच महिन्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे व आठ-पंधरा दिवसापुरता कोणाकडेतरी चार्ज दिला जातो मात्र ते देखील याठिकाणी येण्यास धजावत नाहीत. ते आले तरी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस या नगरपालिकेला भेटी देतात. यामुळे नगरपालिकेत कोणतेच काम होत नसून कर्मचाऱ्यांवर देखील कोणाचा वचक राहिला नाही. नगराध्यक्ष सहाल चाऊस हे पाणी प्रश्नाकडे जातीने लक्ष देत असत परंतु ते 4 मार्च पासुन भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीतअसल्यामुळे पाणीप्रश्न कडे कोणाचेच लक्ष राहिले नाही. पाणीपुरवठा सभापती हे केवळ नावालाच असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत असून त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसलाच प्रयत्न केला नसल्याचा आरोप नागरिकातुन होत आहे. ऐन संचारबंदीत नागरिकांना बाहेर निघू नयेत असे आदेश असताना मात्र पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. व अनेकांना पाणी भरण्यासाठी लाईन मध्ये उभे राहून पाणी भरण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिक जवळजवळ उभे राहत असून जास्तीत जास्त संपर्कात येत आहेत. यामूळे कोरोनाची लागण लागायला वेळ लागणार नाही.

शहरातील शाहूनगर ,आझादनगर ,सन्मित्र कॉलनी ,आयोध्या नगर , पाटील गल्ली , इदगा मोहल्ला , शिवाजीनगर , तानाजी नगर ,भिमनगर आदी भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असुन शहरात अनेक ठिकाणी हातपंप नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. घरोघरी पोहोच करणारे पाण्याचे जार आत्ता जाऊन आणावे लागत असून त्यांनीही पाण्याच्या जारचा भाव देखील वाढला आहे.

न.प.च्या पाण्यावर अनेक जणांनी केली गडगंज कमाई नगरपालिकेने मुख्य टाकीवरून शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत दोन-तीन ठिकाणी वाल्व बसवले असून याठिकाणी पाण्याची विक्री करणाऱ्यांनी एक डायरेक्ट नळ सुरु केला असून दररोज या नळावरून पन्नास ते शंभर गाड्या या ठिकाणावर भरून घेऊन विक्री केली जातात. यातून हे लोक  गडगंज कमाई करत असून एक रुपयाही नगरपालिकेला टॅक्स भरत नाहीत. उलट जे नागरिक टॅक्स भरतात त्यांना 15 -15 दिवसाला पाणी तर विक्री करणाऱ्या लोकांना दररोज पाणी.

पूर्वीप्रमाणे 4-5 दिवसाला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत व लवकरच पहिल्या प्रमाणे पाणी मिळेल.- भागवत बिघोत, प्रभारी मुख्याधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडWaterपाणी