शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

दुकान उघउायचंय तर कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:36 IST

बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता व्यापाऱ्यांनाही कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी ...

बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता व्यापाऱ्यांनाही कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी चाचणी करणे अनिवार्य असून चाचणीशिवाय दुकान उघडल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सोमवारी याबाबत आदेश काढले आहेत

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संसर्ग वाढत असतानाही नागरिक गाफिलच राहात आहेत. प्रशासनाकडून वारंवार उपाययोजना करून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही. आता प्रशासनाने पुन्हा एकदा व्यापाऱ्यांची सरसकट कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक केले आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच व्यापारी, व्यावसायिक, दुकानदारांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय दुकाने उघडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. यासाठी तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचनाही केल्याचे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, गतवर्षी राबविलेल्या विशेष मोहिमेत व्यापारी, दुकानदारांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले होते. जे बाधित आहेत ते लवकर निष्पन्न होऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता यावेळी व्यापारी किती प्रतिसाद देतात, हे वेळच ठरविणार आहे.

महाशिवारात्रीदिवशी फळविक्रेत्यांना परवानगी, पण..

महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी बाजारपेठ अथवा इतर ठिकाणी एका जागेवर १० फळविक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यात १० फुटांचे अंतर असणे बंधनकारक आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांना ही परवानगी दिली जाणार असून जे कोरोना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.