शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी? - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोना होऊन गेलेल्या लोकांना इतरही आजार आहेत. त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्यात संभ्रम आहे. परंतु, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोना होऊन गेलेल्या लोकांना इतरही आजार आहेत. त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्यात संभ्रम आहे. परंतु, हे रूग्ण जर भूल देण्यासाठी तंदरूस्त असतील तर २० दिवसानंतर त्यांच्या शस्त्रक्रिया करता येऊ शकतात. ज्यांना अत्यावश्यक आहे जसे की, शस्त्रक्रिया केली तरच ते वाचू शकतात, अशांची शस्त्रक्रिया तत्काळ करू शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सामान्यांनी मनातील संभ्रम दूर करून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला वेळोवेळी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना कोमॉर्बिडीटी व इतर आजार आहेत. अनेकांना शस्त्रक्रियांचीही गरज आहे. परंतु, आपल्याला आताच कोरोना होऊन गेला आहे, आता शस्त्रक्रिया केली तर काही त्रास होईल का? असा प्रश्न त्यांना पडत आहे. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना संपर्क केला. त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर २० दिवसांनी शस्त्रक्रिया करण्यास मुभा आहे. परंतु, संबंधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी, शरीर तंदरूस्त असणे गरजेचे आहे. भूल देण्यासाठी रूग्णाच्या शरिराने प्रतिसाद दिल्यावर शस्त्रक्रिया करण्यास काहीच अडचण नाही. ज्यांना कोरोना झाला आहे अथवा २० दिवस झालेले नाहीत, त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत त्या - त्या वेळची तपासणी करून शस्त्रक्रिया करू शकतो. शस्त्रक्रिया केली नाही तर त्या रूग्णाच्या जिवाला धोका असेल तर त्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगितले.

हट्ट धरू नका, सर्व तपासण्या करा

काही लोक शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे हट्ट धरतात. परंतु, असे करणे आरोग्यासाठी लाभदायक कमी आणि घातकच जास्त ठरू शकते. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना आणि रूग्णाची परिस्थिती पाहूनच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो. मुद्दाम कोणी टाळाटाळ करत असेल तर त्याची रितसर तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी याबाबतही जागरूक राहावे.

--

कोरोना होऊन गेल्यावर २० दिवसांनी शस्त्रक्रिया करू शकतो. परंतु, त्यासाठी रुग्णाचे शरीर भूल देण्यासाठी तंदुरूस्त असावे. तसेच कोरोनाबाधित अथवा नुकताच मुक्त झालेल्या रूग्णाच्या शस्त्रक्रियेबाबत खूपच गरज असेल (शस्त्रक्रिया केली नाही तर जिवाला धोका होईल) तरच ती करता येऊ शकते. मनातील गैरसमज दूर करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड