शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
4
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
5
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
6
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
7
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
9
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
10
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
11
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
12
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
13
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
14
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
15
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
16
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
17
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
18
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
19
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
20
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

बीड : मागील चौदा महिन्यांपासून कोरोनामुळे आजार आणि अकाली मृत्यूची अनामिक भीती वाढली आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी काय ...

बीड : मागील चौदा महिन्यांपासून कोरोनामुळे आजार आणि अकाली मृत्यूची अनामिक भीती वाढली आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी काय इच्छा, हे नमूद करून नैसर्गिक वारसांमध्ये होणारे ताण-तणाव आणि तंटे टाळण्यासाठी मृत्युपत्र तयार करण्याचे प्रमाण मागील काही महिन्यांमध्ये वाढले आहे.

काही जण दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करत आहेत, तर अनेक जण स्व-पातळीवर मृत्युपत्र तयार करत आहेत. दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करण्यासाठी असलेल्या नियमांमुळे अनेक नागरिक स्वत:च मृत्युपत्र तयार करत असल्याचे दिसून आले आहे. ज्यांचे वय ७० पेक्षा जास्त व गंभीर आजार आहे, अशांनीच मृत्युपत्र करावे, असा हा नियम आहे. त्यामुळे निबंधकांकडे न जाताच स्वत:चे मृत्युपत्र साध्या कागदावर किंवा शंभर रुपयांच्या मुद्रांकावर स्वत: तयार करून आपले इच्छापत्र तयार करीत आहेत.

स्पष्ट आणि योग्य रीतीने संपत्तीचा गोषवारा नमूद करून मृत्युपत्र तयार केले जाते. नैसर्गिक वारसांव्यतिरिक्त अजून कोणाला संपत्ती द्यायची असल्यास मृत्युपत्राचे महत्त्व अधिक असते. मृत्युपत्र साध्या कागदावर केले जाऊ शकते. नोंदणी झाली नाही तरी त्याला मूल्य असते, म्हणजे कायद्याप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक नाही; पण मृत्युपत्रावर कोणी शंका घेऊ नये म्हणून नोंदणीकृत करण्याकडेही अनेकांचा कल आहे.

---------

संपत्ती तसेच बँक बॅलन्स असणाऱ्या इच ॲन्ड एव्हरी... सर्वांनीच मृत्युपत्र केले पाहिजे. कुटुंबाचे नाव लागलेले असते, तेथे हिस्सा मागणारे अनेक जण तयार होतात. असे वाद न्यायालयात जाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मृत्युपत्र केल्यास खरे हक्कदार न्यायापासून वंचित राहणार नाहीत. इच्छापत्र स्वत: लिहू शकता. ते रजिस्टर्ड पोस्टाने दुय्यम निबंधक कार्यालयाला पोहोच करायचे किंवा मजकूर लिहून अथवा टाईप करून त्याचे नोटरी करून आपल्या फाईलमध्ये किंवा विश्वासू व्यक्तीकडे ठेवावे. किंवा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करावी. - ॲड. धीरज भंडारी, बीड

---------

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे चोहीकडे अंधार दिसत असल्याने स्वत:च्या जिवाची भीती वाटते. आपले बरे-वाईट झाले तर मुला-मुलींमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होऊ नये तसेच संपत्ती, बँकेतील जमा रक्कम सोईस्करपणे सुलभतेने वाटली जावी या उद्देशाने अनेकजण मृत्युपत्र तयार करत आहेत. संपत्तीबाबतचे भांडण टळावे आणि कुटुंबातील एकोपा कायम राहावा, यासाठी मृत्युपत्र केले जाते. - ॲड. विजयकुमार कासट, बीड

---------------------

आई- वडिलांकडून सुलभतेने वाटणी

१) एका जोडप्याची (वय ७० पेक्षा जास्त) बीड व पुणे येथे संपत्ती होती. त्यांनी विलडीड (मृत्युपत्र) तयार करून घेतले. मोठ्या मुलाला बीड येथील संपत्ती तर लहान मुलाला पुण्यातील संपत्तीची वाटणी केली. विवाहित मुलीचे सासर सधन असल्याने व तिने या संपत्तीमध्ये हिस्सा मागू नये तसेच मुलांमध्ये बीड व पुण्याच्या संपत्तीबाबत वाद होऊ नये म्हणून हे मृत्युपत्र तयार केले.

कमी वयात मृत्यूपत्र

२) फर्म वडिलांच्या नावावर होती; परंतु मुलाने स्वत: मेहनत घेत संपत्ती व बँक बॅलन्स जमा केला. गतवर्षी कंपनीच्या कामानिमित्त परदेशात गेला. त्यानंतर कोरोनाबाधित झाला. उपचार केले. मृत्यूच्या दाढेतून परत आला. मी मृत्यू पाहून आलो, पण पुढे आपल्या कुटुंबाचे काय, पत्नी, मुले असुरक्षित वाटल्याने त्याने केलेले कष्ट व त्याच्या हिश्शातील कमविलेली संपत्तीची माहिती लिहून मृत्युपत्र तयार केले.

ग्रामीण भागात प्रमाण कमी

३) ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याकडे ९०० एकर शेती आहे. चार मुले सुशिक्षित आहेत. भाविष्यात त्यांच्यात वाद होऊ नयेत म्हणून वडिलांनी संपत्तीवाटणीची तजवीज मृत्युपत्राद्वारे तयार करून ठेवली. शहरी भागाच्या तुलनेत ग्रमीण भागात मृत्युपत्र तयार करणाऱ्यांचे प्रमाण तसे कमीच आहे.

--------------------

कमी वयाच्या लोकांमध्येही मृत्युपत्राची मानसिकता

बीड जिल्ह्यात मागील वर्षी मार्च २०२० आधी ७० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक विलडीड (मृत्युपत्र) तयार करत होते. त्याचे प्रमाणही कमीच होते. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनामिक भीतीपोटी संपत्ती किंवा बँक बॅलन्स असणारे ७० पेक्षा कमी वयाचे ३५ ते ५५ वयोगटातील नागरिकांमध्ये मृत्युपत्र करण्याची मानसिकता वाढली आहे. अलीकडच्या सहा महिन्यांत अशा व्यक्तींचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत आहे. त्याचबरोबर मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

------------