शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

कोराेनाने सबकुछ छिना... मेरे पास माँ है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

अनिल भंडारी बीड : कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत प्रशासनाकडे प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील ३०३ मुलांचे मातृपितृ छत्र हरवले. यापैकी २७४ मुलांच्या ...

अनिल भंडारी

बीड : कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत प्रशासनाकडे प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील ३०३ मुलांचे मातृपितृ छत्र हरवले. यापैकी २७४ मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला. अशा विदारक परिस्थितीमुळे आता आईलाच पालकत्वाची दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. कोरोना महामारीत अनेकांवर आभाळ कोसळले. मातृ-पितृछत्र हरवलेल्या मुलांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ७ जूनपर्यंत कोरोनामुळे २०५८ मृत्यूची नोंद झालेली आहे. तर आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त माहितीनुसार कोरोना संसर्गाच्या लाटेत जिल्ह्यातील ३०३ बालकांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार २७४ मुलांचे वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यामुळे या कुटुंबांवर आभाळ कोसळले आहे. घरातील कर्त्या वडिलांचे छत्र हरवल्यामुळे मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आईवर आली आहे. आता आईलाच आयुष्याच्या परीक्षेत दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागणार आहेत. तर बाबा दूर देशी गेला तरी आईच सांभाळ करणार, असा विश्वास मुलांमध्ये आहे. दु:खाला मागे सारत उद्याच्या संकटांशी सामना करण्यासाठी मुलांच्या पुनर्वसनाबरोबरच त्यांच्या आईला सामाजिक, शासकीय आणि मानसिक पातळीवर बळ देण्याची गरज आहे.

आभाळच फाटले जोडायचे कसे?

१) धारूर तालुक्यातील मुस्लीम समाजातील एक कुटुंब कामानिमित्त औरंगाबादला राहत होते. टेलरिंगचे काम करणारे वडील घरातील कर्ता माणूस होते. घरात पत्नीसह सतरा वर्षांची मोठी मुलगी, तर पंधरा आणि नऊ वर्षांची दोन मुले. वडिलांना टेलर कामातून मिळणाऱ्या रोजगारातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह, शिक्षण सुरू होते; पण कोरोनाच्या लाटेने या घरातला कर्ता माणूस गेला आणि कुटुंबाचे आभाळ फाटले. हे कुटुंब आता गावाकडे आले आहे. तीन मुलांचा सांभाळ, त्यांचे शिक्षण करताना आईलाच फाटलेले आभाळ शिवण्याचे काम करावे लागणार आहे.

--------

अकाली वैधव्यात चिमुकलीच आशेचा किरण

२) शोभाचे (बदललेले नाव) दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. पतीसोबत पुण्याला राहत होती. नंतर शोभा बाळंतपणासाठी माहेरी आली. कन्यारत्न जन्माला आले. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र पसरलेला होता. त्या- त्या ठिकाणच्या प्रशासनाचे निर्बंध होते. पुणे तर हॉटस्पॉट. पाच महिन्यांपूर्वी पतीचे कोरोनामुळे निधन झाले. लेकीला पाहण्याआधीच बाबा दूर देशी निघून गेला. हा पहिला धक्का बसलेला असतानाच शोभा आणि तिच्या चिमुकलीचा सासरच्या मंडळीने स्वीकार केला नसल्याने दुसरा धक्का बसला. अकाली कोसळलेले वैधव्य आणि वर्षभराच्या चिमुकलीच्या भविष्याचा प्रश्न शोधत शोभा सध्या माहेरीच दु:ख पचवित आहे.

------

३) तुटपुंजा शेतीच आधार, चार लेकरांचा भार

अंबाजोगाई तालुक्यातील एका कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोनाने हिरावला. घरात पत्नी, २ वर्ष, ४ वर्ष, ७ वर्ष आणि ११ वर्ष वयाच्या चार लेकरांचे छत्र हरपले. आता मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आईवर आली आहे. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. आहे त्या तुटपुंजा शेतीचाच आधार, त्यावरच लेकरांचा भार सांभाळावा लागणार आहे. आयुष्यभराचे दु:ख गिळत शेतीतूनच तिला उभारी घ्यावी लागणार आहे.

४) लेकीच्या लग्नाआधीच पित्याचा निरोप

बीड जिल्ह्यातील एका कुटुंबात दोन मुली, दोन जुळी मुले आहेत. मोठी मुलगी १७ तर दुसरी १५ वर्षांची मुले ७ वर्षांची. येत्या दोन वर्षात मोठीचे लग्न करण्याचे स्वप्न पिता पाहत होता. परंतु कोरोनाच्या लाटेने या कुटुंबातील पिता हिरावला. जेमतेम शेती असलेल्या या कुटुंबातील आईला दुहेरी पालकत्वाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

--------------

शासनाच्या निर्देशानुसार कोरोनामुळे आई- वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून बालगृह तसेच बाल संगोपन योजनेतून लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.

तसेच त्यांच्या आईला शासनाच्या निराधार, विधवा, कुटुंब सहायता योजनेतून प्राधान्यक्रमाने लाभ मिळवून देण्याबाबत आयुक्तांचे निर्देश आहेत.

त्यानुसार माहिती घेण्याचे काम सुरू असून तालुकानिहाय तहसील कार्यालयांना यादी पाठवून सहानुभूतीपूर्वक लाभ देण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे परिविक्षा अधिकारी एस. एस. निर्मळ यांनी सांगितले.

--------

आई- वडिलांचे छत्र हरवले

आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात ३०३ पैकी ३ मुलांचे आई आणि वडिलांचा मृत्यू झाला. तर २६ मुलांचे मातृछत्र आणि २७४ मुलांचे पितृछत्र हरवले आहे. हे आकडे काळीज चिरणारे आहेत.

----------