शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

शेतीमाल खरेदी विक्रीसाठी मोंढा आडत सुरू ठेवा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST

बीड : जिल्हा प्रशासनाने २६ मार्च ते ४ एप्रिल २०२१ दरम्यान बीड जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली असून, सर्वसामान्य ...

बीड : जिल्हा प्रशासनाने २६ मार्च ते ४ एप्रिल २०२१ दरम्यान बीड जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांना गोरगरिबांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या व त्याअंतर्गत आडत, मोंढा बंद राहणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे शेतीमाल गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळे आदींचे खरेदी-विक्री बंद झाल्यावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. सद्या रबी पिकांचे काढणी, मळणी चालू आहे नंतर शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मशागत करायला ट्रॅक्टर, जेसीबी, दुचाकी आदी वाहने आवश्यक आहेत मात्र प्रशासनाने सदर वाहनांवर बंदी घातली आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची २५ रोजी भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात त्यांनी संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या व त्याअंतर्गत मोंढा, आडत दुकाने चालू ठेवून सर्व प्रकारच्या शेतीमालाचे, भाजीपाला, फळे यांचे खरेदी-विक्री चालू ठेवावेत तसेच शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर, जेसीबी, दुचाकी आदी वाहनांना मुबलक प्रमाणात इंधन पुरवठा देऊन संचारबंदी काळात सवलत द्यावी व शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने केली आहे.

===Photopath===

250321\5511252_bed_19_25032021_14.jpg

===Caption===

अपर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी