शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

बांधकाम कामगारांच्या उपासमारीची धग पोंचली माजलगाव तहसीलवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:54 IST

वाळु बंद असल्यामुळे शहर व  परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

माजलगाव (बीड ) : वाळू बंद असल्यामुळे शहर व  परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय शहरात सुरु करावे या मागणीसाठी कामगारांनी आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

तालुक्यातील फक्त एकाच वाळू घाटाच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित घाटाची प्रक्रिया रखडली आहे. सध्या एकाच ठिकाणाहुन वाळू असल्याने याचे दर मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. महसुल व पोलीस प्रशासनाने चोरट्या वाळू वाहतुकीवर अंकुश बसविल्यामुळे वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. प्रशासनाकडून टेंडर धारकांसह वाहनधारकांना नियमाची यादी दाखवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारक व लिलाव धारकांकडून अव्वाच्यासव्वा दराने वाळूची विक्री होत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्यांना बांधकाम करणे कठीण झाले आहे. तर आधीची बांधकामे ठप्प पडली आहेत. मात्र, या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम थेट हातावर पोट असणाऱ्या बांधकाम कामगार व मजुरांवर होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

यामुळे कामगारांनी बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय शहरात सुरु करावे या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान मोंढा भागातून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. मोर्चात बांधकामाशी संबंधीत सर्व व्यापारी, विविध संघटना आदींचे पदाधिकारी सामिल होते. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तहसीलदार एन. जी. जंपलवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली.  त्यानंतर मोर्चेक-यांच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मोर्चाचे नेतृत्व निलेश काकडे, शेख शकील, शेख करीम, भास्कर घाडगे, मुज्जुभाई आदींनी केले.  तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, अनंत रुद्रवार, गणेश लोहिया, सुंदर साखरे, संजय सोळंके, सुभाष इंदाणी, संदेश चिद्रवार, सुधाकर देशमुख, सययद कालुभाई , मोगरेकर फरशीवाला, मिर्झा जफर बेग आदींनी सहभाग घेतला. संपूर्ण शहर व्यापलेल्या या मोर्चाची सर्वत्र चर्चा होती. 

जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करू वाळु अभावी बांधकाम व्यवसायिक तसेच मजुरांची होत असलेली परवड आम्ही जाणुन आहोत. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन उर्वरित वाळु घाटाचे लिलाव त्वरित करावेत अशी मागणी करण्यात येईल. - प्रियंका पवार, उपविभागीय अधिकारी, माजलगांव 

टॅग्स :collectorतहसीलदारBeedबीडagitationआंदोलन