शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बांधकाम कामगारांच्या उपासमारीची धग पोंचली माजलगाव तहसीलवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 16:54 IST

वाळु बंद असल्यामुळे शहर व  परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

माजलगाव (बीड ) : वाळू बंद असल्यामुळे शहर व  परिसरातील सर्वच बांधकामे मागील दोन महिन्यांपासुन बंद आहेत. मात्र, यामुळे या कामावर अवलंबून असणा-या बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय शहरात सुरु करावे या मागणीसाठी कामगारांनी आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

तालुक्यातील फक्त एकाच वाळू घाटाच्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित घाटाची प्रक्रिया रखडली आहे. सध्या एकाच ठिकाणाहुन वाळू असल्याने याचे दर मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. महसुल व पोलीस प्रशासनाने चोरट्या वाळू वाहतुकीवर अंकुश बसविल्यामुळे वाळूची उपलब्धता दुरापास्त झाली आहे. प्रशासनाकडून टेंडर धारकांसह वाहनधारकांना नियमाची यादी दाखवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारक व लिलाव धारकांकडून अव्वाच्यासव्वा दराने वाळूची विक्री होत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्यांना बांधकाम करणे कठीण झाले आहे. तर आधीची बांधकामे ठप्प पडली आहेत. मात्र, या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम थेट हातावर पोट असणाऱ्या बांधकाम कामगार व मजुरांवर होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

यामुळे कामगारांनी बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्यालय शहरात सुरु करावे या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान मोंढा भागातून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला. मोर्चात बांधकामाशी संबंधीत सर्व व्यापारी, विविध संघटना आदींचे पदाधिकारी सामिल होते. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तहसीलदार एन. जी. जंपलवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली.  त्यानंतर मोर्चेक-यांच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मोर्चाचे नेतृत्व निलेश काकडे, शेख शकील, शेख करीम, भास्कर घाडगे, मुज्जुभाई आदींनी केले.  तसेच व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, अनंत रुद्रवार, गणेश लोहिया, सुंदर साखरे, संजय सोळंके, सुभाष इंदाणी, संदेश चिद्रवार, सुधाकर देशमुख, सययद कालुभाई , मोगरेकर फरशीवाला, मिर्झा जफर बेग आदींनी सहभाग घेतला. संपूर्ण शहर व्यापलेल्या या मोर्चाची सर्वत्र चर्चा होती. 

जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करू वाळु अभावी बांधकाम व्यवसायिक तसेच मजुरांची होत असलेली परवड आम्ही जाणुन आहोत. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन उर्वरित वाळु घाटाचे लिलाव त्वरित करावेत अशी मागणी करण्यात येईल. - प्रियंका पवार, उपविभागीय अधिकारी, माजलगांव 

टॅग्स :collectorतहसीलदारBeedबीडagitationआंदोलन