शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

प्राचीन काळातील ‘त्या’ बारवांचे होतेय संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : पूर्वीच्या काळी दगडी बारव बांधून त्यात पाण्याची साठवणूक होत असे. आजही या बारवांच्या बांधकामाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : पूर्वीच्या काळी दगडी बारव बांधून त्यात पाण्याची साठवणूक होत असे. आजही या बारवांच्या बांधकामाकडे आकर्षण, उत्कृष्ट प्राचीन कलेचा नमुना म्हणून पाहिले जाते. काळाच्या ओघात ही बारवे नामशेष होत चालली आहेत. परंतु कडा शहरात या बारवांचे आजही जतन केले जात आहे. याकडे मात्र पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

प्राचीन काळातील लोकांनी गावातील वाटसरू व देवस्थानाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दगडी बांधकाम करून बारवं बांधली होती. पण हळूहळू याकडे दुर्लक्ष होऊ लागले. पाण्याचे स्रोत व इतर विद्युत पंपाच्या निर्मिती झाल्याने लोकांचे याकडे दुर्लक्ष झाले. ही मनमोहक बारवं कालबाह्य झाली. कडा शहरात तीन ठिकाणी ही दगडी बारवं होती. यातील दोन कालबाह्य झाली. तर श्रीराम मंदिरालगतच असलेले एकच बारव चांगल्या अवस्थेत आहे. यासाठी शहरातील लोकसहभागातून याची स्वच्छता करून त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. आजही इथे पाहिले तर जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही. पण पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याने जुने, प्राचीन काळातील वास्तू नामशेष होऊ लागल्या आहेत. प्राचीन काळातील वास्तूंचे संवर्धन व जोपासना करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.

कड्यातील बारवाला तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी भेट दिली होती. प्राचीन काळातील वास्तू जोपासलेल्या बारवांची पाहणी करून तिचे संवर्धन केल्यामुळे कडा शहरवासीयांचे त्यांनी कौतुकही केले होते.

....

प्राचीन काळातील लोकांनी ही बारवं बांधली होते. काळाच्या ओघात ते बारवं बुजले आहेत. तरी देखील लोकसहभागातून ग्रामस्थांनी येथील एका बारवाचे संवर्धन केले आहे. अनेक बारवे नामशेष होत असल्याने पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

- शंकर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, कडा.

...

120921\nitin kmble_img-20210912-wa0016_14.jpg

कडा शहरातील राम मंदिराजवळील पुरातन बारवाचे संवंर्धन केले जाते. त्याची पाहणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंदेकर यांंनी केली होती.