शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

वीज बिलांबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

हातगाडे रस्त्यावर अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांवर ...

हातगाडे रस्त्यावर

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांवर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने हे हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

भाजीपाल्याच्या दरात घसरण

अंबाजोगाई -: ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरांमध्ये अचानकच घसरण झाली आहे. टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दरही कमी झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वीटभट्ट्यांमुळे पर्यावरण धोक्यात

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात व परिसरात मुख्य रस्त्यालगत अनेक वीटभट्ट्या थाटण्यात आल्या आहेत. यातील अनेक वीटभट्ट्यांना रीतसर परवानगी नसतानाही अशा भट्ट्या सुरू आहेत. पर्यावरणाला मोठा धोका निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्या शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर महसूल प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच

अंबाजोगाई : शासकीय कार्यालयाच्या भिंतीवर ‘येथे थुंकू नये’ अशी सूचना लिहिलेली असते; परंतु त्याच शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते. परिणामी शासकीय कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच दिसतात. यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

यंदा कडब्याला जनावरे दुरावणार

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात उसाची लागवड व हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्वारीचे पीक लावल्यानंतर ज्वारी सांभाळणे मोठ्या जिकिरीचे काम आहे. तसेच ज्वारीला बाजारात योग्य भावही मिळत नाही. ज्वारीपेक्षा हरभऱ्याचा पेरा आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरतो. त्यामुळे तालुक्यात ज्वारीचा पेरा अत्यल्प झाला आहे. पेरा कमी झाल्यामुळे जनावरांसाठी लागणारा कडबा यात मोठी तूट निर्माण होईल. यामुळे जनावरे ज्वारीच्या पोषक अशा कडब्याला मुकणार आहेत.

मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालक संभ्रमावस्थेत

अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला असला तरी आपल्या मुलां-मुलींना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत अद्यापही पालकांमध्ये संभ्रम आहे.