शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पेरणीसह शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

By शिरीष शिंदे | Updated: July 8, 2023 13:00 IST

जमिनीची खोल नागरंट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरुन गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.

बीड: समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात आता भर म्हणून की काय, शंखी गोगलगायीने पुन्हा डोकेवर काढले आहे. शंखी गोगलगायींना वेळीच रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापपर्यंत पेरण्या पुर्णपणे झाल्या नाहीत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४ जुलै पर्यंत केवळ १८.३९ टक्केच खरीप हंगामात पेरण्या झाल्या आहेत. १०० मीमी पाऊस झाल्या शिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाने यापुर्वी केले असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अशी गंभीर स्थिती असताना शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे आवश्यक आहे.

शंखी गोगलगाय किडीचे ओळखशंखीच्या पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंखी गर्द, करड्या, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. हि किड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने खाऊन छिद्र पाडते. तसेच नवीन रोपे, कोंब, भाजीपाला वर्गीय पिके, फळे तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यावरही उपजिविका करते.

काय कराव्यात प्रतिबंधात्मक उपाय योजनाजमिनीची खोल नागरंट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरुन गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते. रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावीत शेतातील शंखी गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करुन नष्ट करावीत. १ किलो गुळ १० लिटर पाण्यात टाकुन गुळाचे द्रवण करावे, त्यामध्ये गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळी शेतात, पिकाच्या ओळीत पसरवून ठेवावीत. त्या खाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करुन उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रवणात किंवा केरोसीन मिश्रीत पाण्यात टाकन माराव्यात किंवा खोल खड्ड्यात पुरुन वरुन चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा. लहान गोगलगायीच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी, शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतल्या बाजूने तंबाखू किंवा चुन्याचा ४ ते ५ इंच टाकल्यास गोगलगायींना अटकाव होतो.

रासायनीक उपाय योजनामेटाल्डिहाईडचा २.५ टक्के भुकटीचा वापर गोगलगायींच्या मार्गात किंवा पिकांच्या दोन ओळीत किंवा प्रादुर्भाव क्षेत्रात केल्यास गोगलगायींचे चांगले नियंत्रण करता येते. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषाचा वापर करता येतो. विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी हातांमध्ये रबरी मोजे घालून गोळा करुन १ मीटर खोल खड्ड्यात पुरुन टाकाव्यात. मिथोमिल हे अत्यंत विषारी किटकनाशक असल्याने पाळीव प्राणी तसेच भटके प्राणी किंवा पक्षी अमिषाने मेलेल्या गोगलगायी खाणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावे असे सांगण्यात आले आहे.

सामुहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यकशंखी गोगलगायी नियंत्रणासाठी केवळ एकट्या शेतकऱ्याने प्रयत्न न करता सामुहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या शिफारशी प्रमाणे उपचाराचा अवलंब करावा. केवळ एकच पर्याय वापरुन चालत नाही. उदा. केवळ चुन्याची पट्टी टाकून चालत नाही तर त्यासोबत दुसरा पर्यायही जोडावा लागतो.-बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड