शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पेरणीसह शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

By शिरीष शिंदे | Updated: July 8, 2023 13:00 IST

जमिनीची खोल नागरंट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरुन गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.

बीड: समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात आता भर म्हणून की काय, शंखी गोगलगायीने पुन्हा डोकेवर काढले आहे. शंखी गोगलगायींना वेळीच रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापपर्यंत पेरण्या पुर्णपणे झाल्या नाहीत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४ जुलै पर्यंत केवळ १८.३९ टक्केच खरीप हंगामात पेरण्या झाल्या आहेत. १०० मीमी पाऊस झाल्या शिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाने यापुर्वी केले असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अशी गंभीर स्थिती असताना शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे आवश्यक आहे.

शंखी गोगलगाय किडीचे ओळखशंखीच्या पाठीवर एक ते दीड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंखी गर्द, करड्या, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. हि किड रात्रीच्या वेळेस आक्रमक होऊन पाने खाऊन छिद्र पाडते. तसेच नवीन रोपे, कोंब, भाजीपाला वर्गीय पिके, फळे तसेच इतर सर्व प्रकारच्या पिकांचे अवशेष यावरही उपजिविका करते.

काय कराव्यात प्रतिबंधात्मक उपाय योजनाजमिनीची खोल नागरंट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरुन गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते. रबरी हातमोजे घालून प्रादुर्भावीत शेतातील शंखी गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करुन नष्ट करावीत. १ किलो गुळ १० लिटर पाण्यात टाकुन गुळाचे द्रवण करावे, त्यामध्ये गोणपाटाची पोती भिजवून ती संध्याकाळच्या वेळी शेतात, पिकाच्या ओळीत पसरवून ठेवावीत. त्या खाली लपलेल्या गोगलगायी सकाळी गोळा करुन उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या द्रवणात किंवा केरोसीन मिश्रीत पाण्यात टाकन माराव्यात किंवा खोल खड्ड्यात पुरुन वरुन चुन्याची भुकटी टाकून खड्डा मातीने झाकावा. लहान गोगलगायीच्या नियंत्रणासाठी २० टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी करावी, शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आतल्या बाजूने तंबाखू किंवा चुन्याचा ४ ते ५ इंच टाकल्यास गोगलगायींना अटकाव होतो.

रासायनीक उपाय योजनामेटाल्डिहाईडचा २.५ टक्के भुकटीचा वापर गोगलगायींच्या मार्गात किंवा पिकांच्या दोन ओळीत किंवा प्रादुर्भाव क्षेत्रात केल्यास गोगलगायींचे चांगले नियंत्रण करता येते. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषाचा वापर करता येतो. विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी हातांमध्ये रबरी मोजे घालून गोळा करुन १ मीटर खोल खड्ड्यात पुरुन टाकाव्यात. मिथोमिल हे अत्यंत विषारी किटकनाशक असल्याने पाळीव प्राणी तसेच भटके प्राणी किंवा पक्षी अमिषाने मेलेल्या गोगलगायी खाणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घ्यावे असे सांगण्यात आले आहे.

सामुहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यकशंखी गोगलगायी नियंत्रणासाठी केवळ एकट्या शेतकऱ्याने प्रयत्न न करता सामुहिकरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या शिफारशी प्रमाणे उपचाराचा अवलंब करावा. केवळ एकच पर्याय वापरुन चालत नाही. उदा. केवळ चुन्याची पट्टी टाकून चालत नाही तर त्यासोबत दुसरा पर्यायही जोडावा लागतो.-बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड