शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

सोयाबीन बियाणांचा तुटवडा करून कंपनीने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST

नांदुरघाट : नुकताच मान्सूनचा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु काळ्‍या आईची ओटी ...

नांदुरघाट : नुकताच मान्सूनचा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु काळ्‍या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी व्याजाने कर्जाने पैशाची जमवाजमव करत आहे. एवढे करूनही त्याला पाहिजे ते बियाणे मिळू शकले नाही.

बीड जिल्ह्यातील घाटाच्या वरील भागांमध्ये कापूस क्षेत्र ७० टक्के असते. कापूस पीक खर्चिक झाले. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. वाढत्या तेलाच्या किमती पाहून सोयाबीनकडे शेतकरी वळला. परंतु पेरणीच्या आधीच सोयाबीनचा तुटवडा झाला आहे. महामंडळाचे महाबीज सोयाबीन गायब असून यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा सवाल शेतकरी करीत आहेत. दहा टक्के शेतकऱ्यांनादेखील बियाणे मिळाले नाही. हीच संधी पाहून कंपनीने दिवसाला आपल्या बॅगवरील किमती मोठमोठ्या वाढवून बाजारात एमआरपीवर विक्री सुरू केली. शेतकरी अडचणीत होता. त्याला पेरणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनीने लावलेल्या किमतीत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले.

जवळपास ३७०० रुपयांना ३० किलो सोयाबीनची बॅग शेतकरी विकत घेऊ लागला. शेतकऱ्यांचे तेच बियाणे कंपनीने ४० ते ४५ रुपये किलोने घेऊन १२३ रुपये किलोने कंपनी तेच बियाणे शेतकऱ्यांना विकू लागली. तरीसुद्धा सध्या पेरणीच्या आधीच बियाणांचा तुटवडा निर्माण झाला. एकंदर कंपनीने भरमसाट लूट केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

सोयाबीन बियाणांचा कृत्रिम तुटवडा करून जी लूट चालू आहे, ती म्हणजे मढ्यावरील लोणी खाण्यासारखीच आहे. याला कृषी विभागाचे संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्या संगनमताने वितरकही तुटवडा निर्माण करून अवाच्या सवा दराने बियाणे विकत आहेत. आधीच कोरोनाने मारले व आता या निष्क्रिय व्यवस्थेने मारले.

- नारायण हंगे, पदाधिकारी, मनसे.