शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणांचा तुटवडा करून कंपनीने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST

नांदुरघाट : नुकताच मान्सूनचा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु काळ्‍या आईची ओटी ...

नांदुरघाट : नुकताच मान्सूनचा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु काळ्‍या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी व्याजाने कर्जाने पैशाची जमवाजमव करत आहे. एवढे करूनही त्याला पाहिजे ते बियाणे मिळू शकले नाही.

बीड जिल्ह्यातील घाटाच्या वरील भागांमध्ये कापूस क्षेत्र ७० टक्के असते. कापूस पीक खर्चिक झाले. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. वाढत्या तेलाच्या किमती पाहून सोयाबीनकडे शेतकरी वळला. परंतु पेरणीच्या आधीच सोयाबीनचा तुटवडा झाला आहे. महामंडळाचे महाबीज सोयाबीन गायब असून यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा सवाल शेतकरी करीत आहेत. दहा टक्के शेतकऱ्यांनादेखील बियाणे मिळाले नाही. हीच संधी पाहून कंपनीने दिवसाला आपल्या बॅगवरील किमती मोठमोठ्या वाढवून बाजारात एमआरपीवर विक्री सुरू केली. शेतकरी अडचणीत होता. त्याला पेरणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनीने लावलेल्या किमतीत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले.

जवळपास ३७०० रुपयांना ३० किलो सोयाबीनची बॅग शेतकरी विकत घेऊ लागला. शेतकऱ्यांचे तेच बियाणे कंपनीने ४० ते ४५ रुपये किलोने घेऊन १२३ रुपये किलोने कंपनी तेच बियाणे शेतकऱ्यांना विकू लागली. तरीसुद्धा सध्या पेरणीच्या आधीच बियाणांचा तुटवडा निर्माण झाला. एकंदर कंपनीने भरमसाट लूट केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

सोयाबीन बियाणांचा कृत्रिम तुटवडा करून जी लूट चालू आहे, ती म्हणजे मढ्यावरील लोणी खाण्यासारखीच आहे. याला कृषी विभागाचे संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्या संगनमताने वितरकही तुटवडा निर्माण करून अवाच्या सवा दराने बियाणे विकत आहेत. आधीच कोरोनाने मारले व आता या निष्क्रिय व्यवस्थेने मारले.

- नारायण हंगे, पदाधिकारी, मनसे.