शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

थंडी गायब, गहू - हरभरा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि ...

माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी खरीप हंगामदेखील हातातून गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या भरोशावर पिकाची लागवड केली. परंतु रब्बीमध्ये निसर्गाने साथ न दिल्याने रब्बीची पिकेदेखील धोक्यात आली आहेत. थंडी नसल्याने हरभरा आणि गहू पिके ही केवळ उगवली असून, हरभऱ्याचे घाटे फोस तर गव्हाच्या ओंब्यादेखील रिकाम्या राहात असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप पिकाचे पूर्ण नुकसान सहन करत असताना पुन्हा रब्बीने धोका दिला आहे. खरिपाच्या कापसाची तर केवळ एकच वेचणी होऊन पळाट्या शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे जे हाती आले त्यावरच समाधान मानत असताना रब्बीने अस्मानी संकटाचा मारा करत शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यंदा गहू आणि हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु लागवडीच्या केवळ ५ ते १० टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

अद्याप अनुदान मिळाले नाही

शेतकऱ्यांना सुलतानीबरोबरच अस्मानी संकट असताना बहुतांश शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. नवीन कर्जदेखील नाही. जुने कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज मिळण्यासाठी शेतकरी बँकेच्या दारी उभा असताना अद्यापदेखील नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. रब्बी आणि खरीप हातचे गेल्याने खासगी सावकारांचे चांगभले होताना दिसून येत आहे.