शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

थंडी गायब, गहू - हरभरा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि ...

माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी खरीप हंगामदेखील हातातून गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या भरोशावर पिकाची लागवड केली. परंतु रब्बीमध्ये निसर्गाने साथ न दिल्याने रब्बीची पिकेदेखील धोक्यात आली आहेत. थंडी नसल्याने हरभरा आणि गहू पिके ही केवळ उगवली असून, हरभऱ्याचे घाटे फोस तर गव्हाच्या ओंब्यादेखील रिकाम्या राहात असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप पिकाचे पूर्ण नुकसान सहन करत असताना पुन्हा रब्बीने धोका दिला आहे. खरिपाच्या कापसाची तर केवळ एकच वेचणी होऊन पळाट्या शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे जे हाती आले त्यावरच समाधान मानत असताना रब्बीने अस्मानी संकटाचा मारा करत शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यंदा गहू आणि हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु लागवडीच्या केवळ ५ ते १० टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

अद्याप अनुदान मिळाले नाही

शेतकऱ्यांना सुलतानीबरोबरच अस्मानी संकट असताना बहुतांश शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. नवीन कर्जदेखील नाही. जुने कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज मिळण्यासाठी शेतकरी बँकेच्या दारी उभा असताना अद्यापदेखील नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. रब्बी आणि खरीप हातचे गेल्याने खासगी सावकारांचे चांगभले होताना दिसून येत आहे.