शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

थंडी गायब, गहू - हरभरा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि ...

माजलगाव : यंदाच्या वर्षी पाहिजे तेवढ्या प्रमाणात थंडी न झाल्याने रब्बी पिके पूर्णतः संकटात सापडली असून, हरभरा आणि गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी खरीप हंगामदेखील हातातून गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या भरोशावर पिकाची लागवड केली. परंतु रब्बीमध्ये निसर्गाने साथ न दिल्याने रब्बीची पिकेदेखील धोक्यात आली आहेत. थंडी नसल्याने हरभरा आणि गहू पिके ही केवळ उगवली असून, हरभऱ्याचे घाटे फोस तर गव्हाच्या ओंब्यादेखील रिकाम्या राहात असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप पिकाचे पूर्ण नुकसान सहन करत असताना पुन्हा रब्बीने धोका दिला आहे. खरिपाच्या कापसाची तर केवळ एकच वेचणी होऊन पळाट्या शिल्लक राहिल्या होत्या. त्यामुळे जे हाती आले त्यावरच समाधान मानत असताना रब्बीने अस्मानी संकटाचा मारा करत शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यंदा गहू आणि हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु लागवडीच्या केवळ ५ ते १० टक्केच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

अद्याप अनुदान मिळाले नाही

शेतकऱ्यांना सुलतानीबरोबरच अस्मानी संकट असताना बहुतांश शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. नवीन कर्जदेखील नाही. जुने कर्ज भरल्यानंतर नवीन कर्ज मिळण्यासाठी शेतकरी बँकेच्या दारी उभा असताना अद्यापदेखील नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. रब्बी आणि खरीप हातचे गेल्याने खासगी सावकारांचे चांगभले होताना दिसून येत आहे.