शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री ग्रामसडक कामांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश येवता : केज व गेवराई विधानसभा मतदार संघातील तत्कालीन ...

उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश

येवता : केज व गेवराई विधानसभा मतदार संघातील तत्कालीन राज्य सरकारने मंजूर केलेली ११० कोटींची ३४ कामे महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याप्रकरणी केज तालुक्यातील विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे व भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढत याप्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तत्कालीन राज्य सरकारने जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांना मंजुरी व प्रशासकीय मान्यता दिली होती; परंतु २७ मार्च रोजी राज्य शासनाने केज व गेवराई विधानसभा मतदार संघातील एकूण ११० कोटींच्या ३४ रस्त्यांची कामे अचानक रद्द केली. रद्द केलेली कामे ही निविदा प्रक्रिया संपून अंतिम टप्प्यात आलेली होती. राज्य शासनाच्या निर्णयाच्या नाराजीने केज तालुक्यातील विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे व भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात ॲड. आकाश गाडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली.

याचिकेत वेळोवेळी सुनावणी होऊन प्रकरण ११ जानेवारी रोजी राज्य शासनाच्या उत्तरासाठी ठेवण्यात आले. याचिकाकर्त्यातर्फे राज्य शासनाने कोणताही आधार नसताना ११० कोटींची ३४ कामे ही रद्द केली आहेत व त्यासाठी कोणतेही ठोस कारण दिलेले नाही, तसेच ही कामे रद्द करणे म्हणजे मूळ योजनेच्या विरुद्ध असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. याचिकाकर्त्यांच्या मागणीवर सरकार आठवड्याभरात बैठक घेऊन कामासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. एकंदर परिस्थिती विचारात घेऊन न्यायालयाने विजयकांत मुंडेंनी दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढली.

राज्य सरकारने याचिकाकर्त्यांच्या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच राज्य सरकारने अनुचित निर्णय घेतल्यास या निर्णयाला परत आव्हान देण्याची परवानगीदेखील न्यायालयाने याचिकाकर्त्यास दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी न्यायालयात जमा केलेली रक्कम दोन लाख रुपये त्यांना परत घेण्याची परवानगी दिली. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. आकाश गाडे यांनी बाजू मांडली.

राज्य शासनाचा निर्णय अन्यायकारक

केज व गेवराई विधानसभा मतदार संघातील तत्कालीन राज्य सरकारने मंजूर केलेली ११० कोटींची ३४ कामे महाविकास आघाडी सरकारने इतरत्र वळवल्याने आम्ही राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने केज व गेवराई मतदार संघातील रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.